शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

हिंगणा ‘एमआयडीसी’ला हवी नवी ऊर्जा

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

आजारी युनिटस्मुळे विदर्भाचे औद्योगिक चित्र दारुण आहे. हिंगणा एमआयडीसी येथील अर्ध्यापेक्षा जास्त युनिट बंद आहेत.

कारखान्यांऐवजी आॅटोमोबाईल शोरूम : ‘एमआयडीसी’ने कारवाई करावीनागपूर : आजारी युनिटस्मुळे विदर्भाचे औद्योगिक चित्र दारुण आहे. हिंगणा एमआयडीसी येथील अर्ध्यापेक्षा जास्त युनिट बंद आहेत. त्यासाठी सरकारचे उदासीन धोरण कारणीभूत आहे. नवीन उद्योग विदर्भात आणण्यासाठी सरकार धडपडत असताना अस्तित्वातील उद्योगांकडे सरकारने सपशेल कानाडोळा केल्याचे दिसत आहे. राज्याच्या औद्योगिक धोरणात विदर्भातील उद्योग क्षेत्राला प्राधान्य आणि औद्योगिक विकासाला नवी ऊर्जा मिळाल्यास हिंगणा येथील औद्योगिक वसाहतीला संजीवनी मिळेल, असा विश्वास हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कॅ. एस. रणवीर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात उद्योजकांना येणाऱ्या समस्या शासनाकडून सोडविल्या जातील, अशी अपेक्षा आहे. आवश्यक ‘सीईटीपी’ सुरू व्हावाप्रत्येक औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असलेल्या ‘कॉमन इफ्ल्युएन्ट ट्रीटमेंट प्लॅन्ट’ला (सीईटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिरवी झेंडी दिली. पण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प अद्याप सुरू केलेला नाही. प्रदूषण मंडळाने ‘एमआयडीसी’ला वेगळी पाईपलाईन टाकण्यास सांगितले आहे. हे काम पाच वर्षांत पूर्ण करायचे आहे. एमआयडीसीने पैसे नसल्याचे कारण सांगून या महत्त्वपूर्ण मुद्याकडे कानाडोळा केला आहे. हिंगणा एमआयडीसीमध्ये हा प्रकल्प नसल्यामुळे येथील उद्योजकाला टाकाऊ रसायने टॅन्करने बुटीबोरी औद्योगिक परिसरात तब्बल ३४ कि़मी. न्यावी लागतात. त्यासाठी टॅन्करमागे ४०० रुपये प्रक्रिया शुल्क आणि रसायने वाहून नेण्यासाठी २५०० ते ३००० रुपये खर्च येतो. येथील उद्योजकांना गेल्या ५० वर्षांपासून हा खर्च सोसावा लागत आहे. यावर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे. यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना कित्येकदा निवेदने दिली आहेत. त्यांना या प्रश्नाची जाण आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यास हा प्रश्न क्षणातच सुटेल, असे रणवीर यांनी सांगितले. वीजदराचा प्रश्न नेहमीचाचउद्योजकांना वाढीव वीजदराचा नेहमीच सामना करावा लागतो. तब्बल १० रुपये युनिट दराने वीज खरेदी करावी लागते. लगतच्या राज्याच्या तुलनेत विजेचे प्रतियुनिट दर ४ रुपये महाग आहेत. अशा स्थितीत स्पर्धेत उद्योग कसे उभे राहतील, हा गंभीर प्रश्न आहे. मिहानला ४.३९ रुपये दरात वीज मिळते. आम्हालाही त्याच दरात वीज उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून येथील उद्योगांना नवी ऊर्जा मिळेल आणि स्पर्धेत सक्षमतेने उभे राहतील.