शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वृक्षवेली हिरवे हिरवे, चिमण्यांचा किलबिलाट चोहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:51 IST

कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे दिसताहेत निसर्गाच्या अद्भूत छटा

प्रवीण खापरे /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘‘ऐसे गजबले रस्ते, गर्दीच गर्दी चोहीकडे,ध्वनी-धुळीच्या मापदंडात, वृक्षवेली-पशूपक्षी सारेच काळवंडले!’’... अशी स्थिती ऐरवी सर्वत्र दिसून येते. कुणालाच कुणाची फिकीर नाही. प्रत्येकच जण आपल्याच गरजांच्या व्यस्ततेत गुंतलेले असतात. शहरात असणाऱ्यांना आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवाकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही तेथे वृक्षवेली-पशूपक्षी यांच्या अस्तित्त्वाचे काय देणे-घेणे असणार! माणूस जन्मला काय की मेला काय, आपल्याशिवाय आपल्या गरजांशिवाय निसर्गही आहे, याचे भान त्याला मुळीच नाही. त्याला भानावर आणण्याची किमया एका दूष्ट दैत्याने केली. कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे.ऐरवी रस्ते गजबजलेले असतात. गाड्यांचा आवाज, हॉर्नचे कर्णकर्कश स्वर, सायलेन्सरमधून निघणारा काळाशार धूरात सगळेच माखलेले असतात. दिवसभर राबराबून घरी गेल्यावर मनुष्य स्वत:ला स्नान घालतो आणि मळ दूर करतो. घरात निवांत बसून दिवसभराचा गोंगाट शमवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पशू-पक्ष्यांना शहरात मानवासारखी ही सुविधा नाही. पाणी नाही, जंगल नसल्याने त्यांना स्वत:चे घर नाही. वृक्षवेलींचेही तसेच. शहरात अधामधात कुठेतरी उगवलेल्या या वृक्षांना महिनोनमहिने तोच गोंगाट सतत सहन करावा लागतो तर प्रदुषणाच्या धुराचे आवरण पानफुलांवर आच्छादलेले असतात. ही धूळ स्वच्छ करण्यासाठी या वृक्षवेलींना पावसाची चातकासारखी प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, कोरोनामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या लॉकडाऊनने वृक्षवेली-पशूपक्ष्यांना जणू संजीवनीच दिली आहे. माणसाने स्वत:ला कोंडून घेतले आहे. माणूस घरात दडपून बसल्याने गाड्या रस्त्यावर उतरत नाही आणि म्हणून निसर्गाला मोकळा श्वास घेता येत आहे. रस्त्यांवरील निरव शांततेने गोंगाड कधीचा पळाला आहे. शहर स्वच्छ असल्याचे दिसायला लागले आहे. जणू शांघाय, सिंगापूर नागपुरातच अवतरले आहे, असे सौंदर्य शहराचे दिसायला लागले आहे. वृक्षांची पानेफुले प्रदुषणमुक्तीचा आस्वाद घेत आहेत. ऐरवी प्रदुषणामुळे वृक्षवेलींची हिरवी पानेही डांबरासारखी भासत होती. आता मात्र ती स्वत:च्या अस्सल हिरव्याकंच रंगात रंगलेली आहेत. वृक्षवेलींच्या याच पाना-फुलांवर हुंदडणाºया पक्षांना प्रदुषण ओसरल्याने शुद्ध भोजन आणि रसग्रहण करता येत आहे. पक्षीच नव्हे तर मधूमक्षीकेसारख्या छोट्या किटकांनाही शुद्धतेचा आस्वाद घेता येत आहे. त्यामुळे कदाचित या काळात निर्माण झालेले मधही अतिशय शुद्ध असेल. चिमण्यांच्या चिवचिवाटाचे तरंग वातावरणात उसळी मारत आहेत आणि इतका स्वच्छ स्वर शहरी माणूस प्रथमच ऐतक आहे. प्रदुषणमुक्तीमुळे निरभ्र झालेल्या आकाशात पांढºया शुभ्र ढगांना छेद देत संध्याकाळी आपल्या घरट्यांकडे परतणारे पक्षांचे थवे आल्हाद देत आहेत. कुत्री, गार्इंचे घोळक्यांच्या असण्याचा वेगळाचा आभास मानवाला घेता येत आहे. पुस्तकांच्या पानात वाचलेल्या कोकीळेचा आवाज प्रत्येकाच्या कर्ण इंद्रियेतून हृदयातचा ठाव घेत आहे. ‘कुहू कुहू’ हा कोकीळ स्वर कधी कुणी ऐकलाय का? नसेल ऐकला तर तो या काळात कर्णपटलांवर पडत असल्याचा अनुभव घेता येतो. इवलीशी खारूताई बघता येत आहे. रस्ते निरव असल्याने रस्त्याच्या कडेने असलेल्या वृक्षांच्या सावलीत ती निवांत दाणा खुडताना दिसत आहे. एकूणच.. कोरोना नावाची महामारी संपूर्ण मनुष्य समाजाला घातक ठरत असली तरी त्या भयाने मनुष्याला निसर्गाच्या जवळ नेले आहे.‘‘नाही गजबजलेले रस्ते, निरव शांतता सगळीकडेगोंगाट नाही-धुळ नाही, आल्हाद अवतरले चोहीकडे’’... निसर्गाची ही रया कायम ठेवण्यासाठी, कोरोना प्रकरणातून माणूस धडे घेईल का, असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या