शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

वनविभागामुळे रखडला विकास

By admin | Updated: February 16, 2015 02:22 IST

इंग्रजांच्या काळात वनांचे राखीव, संरक्षित व झुडपी असे वर्गीकरण करण्यात आले. तेव्हा संरक्षित आणि झुडपी जंगलावर लोकांचा अधिकार होता.

नागपूर : इंग्रजांच्या काळात वनांचे राखीव, संरक्षित व झुडपी असे वर्गीकरण करण्यात आले. तेव्हा संरक्षित आणि झुडपी जंगलावर लोकांचा अधिकार होता. मात्र १९८० मध्ये नवीन वनकायदा आला, तेव्हा वनांवरील लोकांचा अधिकार काढून घेण्यात आला. १०० टक्के जंगल हे वनविभागाच्या अखत्यारीत आले. वनखात्यामुळे विदर्भातील ९० टक्के सिंचनाचे प्रकल्प रखडले. सर्वाधिक खनिज संपदा असतानाही एकही उद्योग निर्माण होऊ शकला नाही. विदर्भाच्या मागासलेपणाला वनविभाग जबाबदार असल्याचा आरोप आमदार शोभा फडणवीस यांनी केला. जनमंचतर्फे आयोजित जनसंवाद या कार्यक्रमात वेगळा विदर्भ कशासाठी? या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख वक्ता म्हणून शोभा फडणवीस बोलत होत्या. व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, महासचिव राजीव जगताप उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना शोभा फडणवीस यांनी विदर्भाच्या क्षमतेची माहिती दिली. विदर्भावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. विदर्भाच्या विकासासाठी वेगळ्या विदर्भाची आवश्यकता पटवून दिली. राज्याच्या पर्यावरणाचा समतोल केवळ १९.९ टक्के जंगलावर आधारित आहे. हे जंगल केवळ विदर्भात आहे. १९८० मध्ये नवीन वनकायदा झाला तेव्हा राज्यात ३१ टक्के जंगल होते. २०१२-१३ मध्ये केवळ २०.२० टक्के जंगल राहिले. २०१३-१४ मध्ये जंगलाचे क्षेत्र १९.९ टक्क्यांवर आले. पुण्यातील लवासा सिटीसाठी अजित पवारांनी विना परवानगीने २० किलोमीटरचे जंगल कापले. विदर्भात जंगलामुळे अडलेल्या प्रकल्पासाठी एक इंचही जंगल कापू दिले नाही. जंगलामुळे विदर्भातील ११ सिंचन प्रकल्पाला मंजूरी मिळू शकली नाही. ऐतिहासिक मालगुजारी तलावाचा वापर जंगलामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे विदभाचे कृषी क्षेत्र अविकसित राहिले. विदर्भात १३ टक्के ओलित व ८७ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. येथील शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे विदर्भाला आत्महत्येचा क लंक लागला आहे. गोदावरी तंटा लवादाने विदर्भाच्या वाट्याला हजारो अब्ज घनफूट पाणी उपलब्ध केले. वनविभागामुळे यातून एक थेंबही पाणी विदर्भाला मिळाले नाही. प्रदूषणाचे भूत विदर्भाच्या डोक्यावर आहे. हे सर्व मुद्दे विदर्भाच्या विकासाला मारक ठरले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले. संचालन राम आकरे व आभार राजीव जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)