शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण जनता यंदाही पाण्यासाठी तडफडणार

By admin | Updated: March 15, 2017 02:27 IST

दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.

 टंचाई नियोजनाकडे प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : जिल्ह्यातील १२३५ गावांवर टंचाईचे सावट नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे टंचाई निवारण्याच्या कामाचे नियोजन उन्हाळा सुरू होण्यापूर्वी झाल्यास, त्याची झळ ग्रामीण जनतेला फारशी पोहचत नाही. यंदा जिल्ह्यातील १२३५ गावांवर टंचाईचे सावट असल्याचे वर्तविण्यात येत आहे. टंचाई निवारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २६ कोटी ६५ लाख ६९ हजार रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. टंचाईचे पुढचे नियोजन जि.प. ला करायचे आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने यंदाही ग्रामीण जनता पाण्यासाठी तडफणार असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याची झळ लागायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी जि. प. प्रशासन पाणीटंचाई निर्मूलनार्थ उपाययोजना करते. मात्र या उपाययोजना कागदावरून पुढे सरकल्या नसल्याचे समोर आले आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी २६ कोटी ६५ लाख ६९ हजार रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिल्यानंतरही जि. प. कडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाही़ साहायक भूवैज्ञानिक विभागाकडून विंधन विहिरी आणि विहिरी कुठे खोदायच्या, याचे सर्व्हेक्षणच पूर्ण झाले नाही़ त्यांच्या आराखड्यावरच पुढील उपाययोजनांची अंमलबजावणी शक्य असते़ परंतू जि. प. ने हा अहवाल तातडीने देण्यासाठी पाठपुरावाच केला नसल्याची माहिती आहे़ सध्या पाणीटंचाई कृती आराखड्याचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू आहे़ दुसऱ्या टप्प्याचा कालावधी समाप्त व्हायला केवळ दोन आठवडे शिल्लक आहे़ जि. प. च्या पाणीपुरवठा विभागाची अद्यापही पाणीप्रश्नावर बैठकही झाली नाही़ मार्च महिन्यात ८९५ गावांत पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर एप्रिल ते जूनच्या कालावधीत ३४० गावे टंचाईच्या वर्गवारीत येणार आहे़ परंतु मार्च महिन्यातील उपाययोजना वेळेवर न झाल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे़ यामध्ये नळ योजना, विशेष दुरुस्ती, विंधन विहिरी, विशेष विंधन विहिरी दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना, विहीर खोलीकरण, बुडक्या खोदणे, टँकरव्दारे पुरविणे, खासगी विहीर अधिग्रहण, आदी उपाययोजनांचा समावेश आहे़ दुसरीकडे पाणीटंचाई प्रशासन कधी सोडवेल, या मागणीचा अर्जांचा ढीग जि. प. च्या पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी लागला आहे़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांची उचलबांगडी नागपूर जीवन प्राधिकरणला करण्यात आली़ प्रभार लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सहारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दोन्ही विभागाचा प्रभार सांभाळताना त्यांची तारेवरची कसरत होत आहे़ त्याचाच फटका पाणीटंचाई कृती आराखड्यालाही बसला आहे़ (प्रतिनिधी) तहान लागल्यावर विहीर खोदणार का? येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना ग्रामीण जनतेला करावा लागणार आहे. परंतु अद्यापही जि.प. टंचाई संदर्भात एकही बैठक झालेली नाही. जिल्ह्यात दरवर्षी भेडसावणारी पाणी टंचाई लक्षात घेता जि.प. टंचाईवर विशेष सभा बोलाविणे गरजेचे आहे. परंतु यासंदर्भात कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही. ऐन उन्हाळ्यात तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा सवाल जि.प. सदस्य नाना कंभाले यांनी केला आहे.