शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

शासकीय रुग्णालये की ‘पब्लिक टॉयलेट’

By admin | Updated: October 10, 2015 02:56 IST

जिथे अनुदान आणि शासकीय पैसा मिळतो तेथील काम योग्य पद्धतीने होत नाही. एकदा एका रुग्णालयात गेलो असता हे शासकीय रुग्णालय आहे की ‘पब्लिक टॉयलेट’ असा प्रश्न पडला, ...

नितीन गडकरी : श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सवनागपूर : जिथे अनुदान आणि शासकीय पैसा मिळतो तेथील काम योग्य पद्धतीने होत नाही. एकदा एका रुग्णालयात गेलो असता हे शासकीय रुग्णालय आहे की ‘पब्लिक टॉयलेट’ असा प्रश्न पडला, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रुग्णालयांचे वास्तव मांडले. सोबतचआयुर्वेदात गुणात्मक बदल करीत संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतीय वैद्यक समन्वय समितीद्वारा संचालित श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सव आणि रसऔषधीवरील चर्चसत्राचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे प्र-कुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर, भारतीय वैद्यक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश शर्मा, सचिव डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय, सहसचिव वैद्य वेदप्रकाश शर्मा, महाविद्यालयाचे प्राचार्य व स्वर्ण जयंती महोत्सवाचे संयोजक वैद्य मनीषा कोठेकर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, होमिओपॅथी, आयुर्वेदपॅथीच्या ज्या डॉक्टरांना आपल्याच पॅथीवर विश्वास नाही, जे अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करतात, त्यांनी आपली ‘डिग्री’ सोडावी. प्रत्येक पॅथीचे एक वेगळे महत्त्व आहे. विदर्भात ७० ते ८० टक्के जंगल आहेत. यातील वनौषधी शोधून त्याचा विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतल्यास अनेकांना रोजगार मिळू शकतो. विशेषत: या भागातील १५ हजार युवकांना या माध्यमातून रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आयुर्वेदाची माहिती संस्कृत भाषेत आहे आणि आपल्याकडे संस्कृत भाषावाचकांची संख्या कमी आहे. त्यामुळे आयुर्वेदाला मर्यादा निर्माण होतात. त्या भाषेतील आयुर्वेदाच्या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. आयुर्वेद जगभर पोहोचविण्यासाठी आणि त्याला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)रसशास्त्राला समजून घ्याप्र-कुलगुरु डॉ. राजदेरकर म्हणाले, आयुर्वेद सर्व वेदांची जननी आहे. वेद म्हणजे अभ्यास. परंतु अलीकडच्या काळात याचा अभ्यासच होत नसल्याचे दिसून येते. रसशास्त्राला समजून घेणे आवश्यक आहे. अ‍ॅलोपॅथीचा डॉक्टर असतानाही मला रसशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, एवढे ते महत्त्वाचे आहे. आपल्या औषधांवर विश्वास ठेवा. रुग्णांना माणूस समजून उपचार करा. ‘बायोडाटा’ वाढविण्यासाठी संशोधन करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. स्वागतपर भाषण सुरेश शर्मा यांनी केले. त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसारखीच (एम्स) आयुर्वेदाच्या विकासासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. उद्बोधन प्राचार्य वैद्य मनिषा कोठेकर यांनी केले. सुरुवातीला रसऔषधीवरील राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक आयोजन समितीचे सचिव डॉ. रमण बेलगे यांनी केले. संचालन डॉ. मृत्युंजय शर्मा यांनी केले तर आभार वैद्य गोविंदप्रसाद उपाध्याय यांनी मानले.