शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

मेट्रो रेल्वेसाठी भूगर्भ सर्वेक्षण

By admin | Updated: May 16, 2015 02:31 IST

मेट्रो रेल्वे उड्डाणपुलावरून (एलिवेटेड) धावणार आहे. त्यासाठी मोठमोठे पिलर उभारले जातील. मेट्रो रेल्वेचा सर्व भार या पिलरवर असेल.

जमिनीच्या खालचा स्तर तपासणार : प्रत्येक १०० मीटरवर नमुने घेणारनागपूर : मेट्रो रेल्वे उड्डाणपुलावरून (एलिवेटेड) धावणार आहे. त्यासाठी मोठमोठे पिलर उभारले जातील. मेट्रो रेल्वेचा सर्व भार या पिलरवर असेल. त्यामुळे पिलर उभारण्यात येणारी जमीन कशी आहे, ती ओलावा धरून ठेवणारी आहे की कठीण खडकाची आहे, नेमकी कोणती जागा पिलर उभारण्यासाठी योग्य आहे, हे ठरविण्यासाठी मेट्रो रेल्वे मार्गावरील जमिनीचे भूगर्भ सर्वेक्षण केले जाणार आहे. शनिवारी या कामाची सुरुवातही होत आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत प्रकल्पाच्या आजवरच्या वाटचालीची माहिती दिली. या वेळी दीक्षित म्हणाले, पूर्व-पश्चिम व उत्तर - दक्षिण असे दोन मार्ग मिळून सुमारे ३८ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. तत्पूर्वी खबरदारी म्हणून भूगर्भ सर्वेक्षण (जिओ टेक्निकल सर्वे) केला जाणार आहे. अहमदाबादच्या ‘आनंदजीवाला’ या कंपनीला १ कोटी रुपयांमध्ये हे काम देण्यात आले आहे. नागपूर शहरात जमिनीखाली चार मीटरपर्यंत काळी माती आहे. खाली सुमारे १५ ते २० मीटरपर्यंत कठीण खडक नाही. मेट्रो रेल्वेचे वजन सांभाळायला मजबूत फाऊंडेशन हवे. त्यामुळे प्रत्येक १०० मीटरवर जमिनीत १५० एमएमचा ड्रील करून भूगर्भातील मातीचे नमूने घेतले जातील. अशाप्रकारे एकूण ३७० ठिकाणी जमिनीची तपासणी केली जाईल. दोन महिन्यात ही तपासणी आटोपून भूगर्भ सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाईल. अहवालाच्या आधारवर पिलरचे डिझाईन कसे, फाऊंडेशनचा किती मजबूत करायचे या सर्व बाबी निश्चित होतील.आज कामाचा शुभारंभ नागपूर : सुरुवातीला खापरी ते सीताबर्डी या मार्गाचे काम सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे खापरी परिसरात सर्वप्रथम भूगर्भ सर्वेक्षण केले जाईल. शनिवारी दुपारी १ वाजता झिरो माईलजवळ आयोजित कार्यक्रमात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ होणार आहे. ‘लोकसंवादा’तून जाणणार अपेक्षा मेट्रो रेल्वे नागपूरकरांना आपलीशी वाटावी यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लहान लहान बाबींवर विचार करीत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘माझी मेट्रो’ ही कॅचलाईन वापरली जात आहे. आता या प्रकल्पाबाबत नागरिकांच्या असलेल्या अपेक्षा, सूचना जाणून घेण्यासाठी ‘लोकसंवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे अधिकारी थेट नागरिकांमध्ये जातील. त्यांच्याशी चर्चा करतील व त्यांची मते जाणून घेतील. यामुळे आपली मते विचारात घेऊन हा प्रकल्प उभारला जात आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होईल. सर्वप्रथम खापरी परिसरात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चिचभवन येथील दत्तभवन सभागृहात शनिवारी सायंकाळी पहिला ‘लोकसंवाद’ कार्यक्रम होणार आहे. (प्रतिनिधी)