शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

‘एलजीबीटी’च्या मानवाधिकारासाठी लढणार ‘गौरव’

By admin | Updated: June 12, 2017 02:25 IST

आपला देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगाने प्रगती करतोय. आधुनिक आणि उदात्त विचारसरणीही आता जनमानसात रुजायला लागली आहे.

व्हीव्ह पॉझिटिव्ह अ‍ॅक्शनचा पुढाकार : मुंबई, नागपूर व औरंगाबाद कार्यक्षेत्र आनंद डेकाटे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपला देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेगाने प्रगती करतोय. आधुनिक आणि उदात्त विचारसरणीही आता जनमानसात रुजायला लागली आहे. परंतु प्रगतीच्या या पर्वातही लेस्बियन, गे, बीसेक्सुअल आणि ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) (एलजीबीटी) हे शब्द मात्र सर्वसामान्यांना खटकतात, किंबहुना अनेकदा ते हेटाळणीचाच विषय ठरतात. परंतु ही सुद्धा माणसे आहेत, त्यांनाही मन, भावना आहेत याचा कुणी विचारच करीत नाही. त्यामुळे अशा वर्गाच्या मूलभूत अधिकारासाठी लढायला या वर्गातीलच लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘गौरव’ या संस्थेने पुढाकार घेतला असून मुंबई, नागपूर व औरंगाबाद या क्षेत्रात संस्थेचे कार्यही सुरू झाले आहे.‘गौरव’ ही एलजीबीटी समूहाच्या व्यक्तींनी पुढकार घेऊन समूहासाठी बनवलेली ही संस्था आहे. या संस्थेतर्फे विविध कार्य केले जातात. यात प्रामुख्याने एड्स जनजागृती, मानवाधिकार, एलजीबीटीबाबत माहिती देणे आदी कार्य करते. यासंदर्भात प्रशिक्षणाचेही कार्य केले जाते. एलजीबीटी समूह आपल्या अधिकारासाठी अनेक वर्षांपासून लढत आहेत. परंतु आपल्या देशात त्याचे स्वरूप फार व्यापक नाही. अलीकडील काही वर्षात हा समूह उघडपणे पुढे आला आहे. ते आता आपल्या लैंगिक समस्या व अधिकारांवर बोलू लागले आहेत. काही एनजीओतर्फे त्यांना योग्य प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. अशीच एक संघटना म्हणजे व्हीव्ह पॉझिटिव्ह अ‍ॅक्शन ही संघटना होय. ही संघटना आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना मदत करते. या संस्थेने आता पहिल्यांदाच एलजीबीटी समूहाच्या मानवाधिकारांसाठी काम करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी गौरव या संस्थेवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी हा कार्यक्रम आहे. या दोन वर्षात मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथील एलजीबीटी समूहातील लोकांमध्ये मानवाधिकाराबाबत जनजागृती करणे, लैंगिक समस्यांसह त्यांना कायद्याची माहिती देणे, न्यायालयीन क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करणे, प्रशिक्षण कार्यक्रम घेणे आदी कार्य केले जातील. एकूणच समाजापासून दुरावलेल्या या समूहालाही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून त्यांच्या मानवाधिकाराचे रक्षण केले जाणार आहे. एलजीबीटी समूहाच्या मानवाधिकारासह आरोग्यबाबतही आम्हाला जनजागृती करावयाची आहे. मुंबई, नागपूर व औरंगाबाद हे आमचे कार्यक्षेत्र आहे. आम्हाला केवळ एलजीबीटी समूहासाठीच काम करायचे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील संख्याही निश्चित झाली आहे. मुंबईत २२०० , नागपुरात ११०० आणि औरंगाबाद येथे हजार लोकांसाठीच आम्हाला काम करायचे आहे. - अमित, प्रोजेक्ट मॅनेजर, गौरव