शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

‘अ‍ॅडीनो’ विषाणूमुळे डोळ्याची साथ

By admin | Updated: June 25, 2017 02:00 IST

उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून कन्जेक्टिव्हायटिस’च्या (डोळे येणे) रुग्णांची संख्या वाढली आहे.

मेडिकल : रोज १५वर रुग्णांवर उपचार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून कन्जेक्टिव्हायटिस’च्या (डोळे येणे) रुग्णांची संख्या वाढली आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात या विषाणुजन्य आजाराचे दररोज १५वर रुग्ण येत आहेत. यात लहान मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. ‘अ‍ॅडीनोव्हायरस’ या विषाणुमुळे होणाऱ्या या आजाराच्या रुग्णात गंभीर आजाराचे रुग्णही आढळून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरातील वातावरणात दमटपणा वाढलेला आहे. हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. सर्दी- पडसे, खोकला, ताप अशा आजारांबरोबरच दरवर्षी या दिवसांत डोळे येण्याचीही साथ पसरते. डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रु माल, त्याने वापरलेले डोळ्यांचे ड्रॉप्स आदी वस्तू वापरणे, यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यत: प्रथम एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही असे म्हटले जाते. त्यात तथ्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, एकदा डोळे येऊन गेले की त्या साथीविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते हे खरे, पण म्हणून पुन्हा संसर्ग होणारच नाही असे नाही. डोळे येण्याची लक्षणे मेडिकलच्या नेत्र रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, या आजारात डोळे लाल होणे किंवा डोळ्यात रक्तस्राव होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यातून चिपड येणे, सकाळी डोळे चिकटलेले असणे, डोळ्याला खाज व जळजळ होणे, डोळ्याला धूसर किंवा अंधुक दिसणे, पापण्यांवर सूज येणे, प्रकाश सहन न होणे, डोळे दुखणे तसेच ताप, सर्दी व घशाचे आजार होणे आदी लक्षणे दिसून येतात.