शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: July 17, 2014 01:04 IST

आजघडीला वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अन्नसुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी ही धोक्याची घंटी असून, यातून मार्ग काढण्यासाठी

सुहास वाणी : ‘नीरी’त जुवारकर स्मृती व्याख्यान नागपूर : आजघडीला वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अन्नसुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी ही धोक्याची घंटी असून, यातून मार्ग काढण्यासाठी संशोधकांनी जास्तीतजास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिवाय नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत तेलंगणा राज्यातील पाटणचेरू येथील ‘आयसीआरआयसॅट’चे ( इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अ‍ॅरिड ट्रॉपिक्स) संचालक डॉ. सुहास वाणी यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) आयोजित करण्यात आलेल्या डॉ. अशोक जुवारकर स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मुख्य वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित व संशोधन आणि विकास नियोजन विभागाचे प्रमुख प्रकाश कुंभारे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.गेल्या काही काळापासून पाणी आणि जमिनीची उपलब्धता कमी होत आहे. यामुळे अन्न उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यावर उपाययोजना शोधताना संशोधकांनी शेतकऱ्यांजवळ तंत्रज्ञानाचा हात नेला पाहिजे. शिवाय शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत अधिकाधिक प्रगत पद्धतींचा अवलंब झाला पाहिजे, असेदेखील डॉ. वाणी म्हणाले. दरम्यान, पडिक जमिनींची संख्या वाढत असून येथे सुपीक जमीन निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असे मत डॉ. हेमंत पुरोहित यांनी व्यक्त केले. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले तर जया सब्जीवाले यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)