शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: July 17, 2014 01:04 IST

आजघडीला वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अन्नसुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी ही धोक्याची घंटी असून, यातून मार्ग काढण्यासाठी

सुहास वाणी : ‘नीरी’त जुवारकर स्मृती व्याख्यान नागपूर : आजघडीला वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अन्नसुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी ही धोक्याची घंटी असून, यातून मार्ग काढण्यासाठी संशोधकांनी जास्तीतजास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिवाय नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत तेलंगणा राज्यातील पाटणचेरू येथील ‘आयसीआरआयसॅट’चे ( इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अ‍ॅरिड ट्रॉपिक्स) संचालक डॉ. सुहास वाणी यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) आयोजित करण्यात आलेल्या डॉ. अशोक जुवारकर स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मुख्य वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित व संशोधन आणि विकास नियोजन विभागाचे प्रमुख प्रकाश कुंभारे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.गेल्या काही काळापासून पाणी आणि जमिनीची उपलब्धता कमी होत आहे. यामुळे अन्न उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यावर उपाययोजना शोधताना संशोधकांनी शेतकऱ्यांजवळ तंत्रज्ञानाचा हात नेला पाहिजे. शिवाय शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहत अधिकाधिक प्रगत पद्धतींचा अवलंब झाला पाहिजे, असेदेखील डॉ. वाणी म्हणाले. दरम्यान, पडिक जमिनींची संख्या वाढत असून येथे सुपीक जमीन निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असे मत डॉ. हेमंत पुरोहित यांनी व्यक्त केले. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले तर जया सब्जीवाले यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)