शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

राज्यात संस्कृत अकादमी स्थापणार

By admin | Updated: January 3, 2016 03:35 IST

संस्कृत ही ज्ञान भाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, ....

मुख्यमंत्र्यांची घोषणा : शालेय शिक्षणात संस्कृत समावेशासाठी लवकरच धोरणनागपूर : संस्कृत ही ज्ञान भाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक भवनात आयोजित संस्कृत भारती विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते जयराम व्यंकटेश पल्लेवार यांनी लिहिलेल्या भारतरत्नमंजरी या संस्कृत काव्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, प्रचार व प्रसार प्रमुख श्री.श.देवपुजारी, प्रांत मंत्री संजय लाभे, महानगर अध्यक्ष मधुसूदन पेन्ना व विजय पल्लेवार आदी उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागात संस्कृत भाषेचे बीएड महाविद्यालय सुरू करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.शालेय शिक्षणात संकृत भाषेचा समावेश कसा करता येईल, यासाठी शिक्षणमंत्र्यासोबत चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल. संस्कृतमध्ये अनेक विषयाचे ज्ञान दडलेले आहे. परंतु ही भाषा आत्मसात न केल्याने अनेक विषयांच्या ज्ञानापासून आपण वंचित राहिलो. ही भाषा विद्वानापुरती मर्यादित राहिल्याने त्याचा प्रचार व प्रसार झाला नाही. इंग्रज राजवटीत संस्कृत भाषेच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचे जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करून संस्कृत भाषेला दूर ठेवण्यात आले.पल्लेवार लिखित भारतरत्नमंजरी या काव्यपुस्तिकेतील सुंदर रचना इंग्रजी व हिंदीत आहे. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचण्यात आलेली सुंदर रचना वाचून यापेक्षा दुसरे पुष्प त्यांना कोणीच वाहिलेले नसेल. एवढे वास्तव वर्णन यात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इंग्रज येण्यापूर्वी भारतात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी १२५०० विद्यालये तर ७४२ महाविद्यालये होती. यात १ लाख ८० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होेते. अशी माहिती त्यांनी दिली.भाषांना राजाश्रय व लोकांश्रय प्राप्त झाला तरच त्या टिकून राहतात. संस्कृत भाषा टिकवून ठेवण्यासाठी व त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संस्कृत भारतीकडून होत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. संस्कृत विद्यापीठ या भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उषा वैद्य म्हणाल्या. संस्कृत केवळ प्राचीन गं्रथात अडकून न राहता नव्या योजना आखून त्यावर संशोधन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाला पल्लेवार कुटुंबीयाकडून १ लाखाचा निधी देण्यात आला आहे. विद्यापीठ कक्षाला पल्लेवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविक श्री.श.देवपुजारी यांनी संस्कृत भाषा राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात सहाव्या वर्षापासून अनिवार्य करण्यात यावी. संस्कृतच्या पाठ्यक्रमाची पुनर्रचना, व गुरुकुलांना शासनाने अनुदान देण्याची मागणी प्रास्ताविकातून केली. संस्कृत भाषेच्या शलाका परीक्षेत व्दितीय आल्याबद्धल सार्थक घोरपडे या विद्यार्थ्यासह लीना रस्तोगी, चंद्रगुप्त कर्णेकर, संपदा म्हाळगी व आभा भिमनवार आदंीना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौररव करण्यात आला. संचालन पौर्णिमा बाराहाते यांनी तर आभार छाया भास्करराव यांनी मानले. रजनी दुद्दलवार व उषा गेडाम यांचीही भाषणे झाली. मधुसूदन पेन्ना यांनी पल्लेवार यांच्या काव्यपुस्तिकेचे विवेचन केले. (प्रतिनिधी)