शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

राज्यात संस्कृत अकादमी स्थापणार

By admin | Updated: January 3, 2016 03:35 IST

संस्कृत ही ज्ञान भाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, ....

मुख्यमंत्र्यांची घोषणा : शालेय शिक्षणात संस्कृत समावेशासाठी लवकरच धोरणनागपूर : संस्कृत ही ज्ञान भाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक भवनात आयोजित संस्कृत भारती विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते जयराम व्यंकटेश पल्लेवार यांनी लिहिलेल्या भारतरत्नमंजरी या संस्कृत काव्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, प्रचार व प्रसार प्रमुख श्री.श.देवपुजारी, प्रांत मंत्री संजय लाभे, महानगर अध्यक्ष मधुसूदन पेन्ना व विजय पल्लेवार आदी उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागात संस्कृत भाषेचे बीएड महाविद्यालय सुरू करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.शालेय शिक्षणात संकृत भाषेचा समावेश कसा करता येईल, यासाठी शिक्षणमंत्र्यासोबत चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल. संस्कृतमध्ये अनेक विषयाचे ज्ञान दडलेले आहे. परंतु ही भाषा आत्मसात न केल्याने अनेक विषयांच्या ज्ञानापासून आपण वंचित राहिलो. ही भाषा विद्वानापुरती मर्यादित राहिल्याने त्याचा प्रचार व प्रसार झाला नाही. इंग्रज राजवटीत संस्कृत भाषेच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचे जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करून संस्कृत भाषेला दूर ठेवण्यात आले.पल्लेवार लिखित भारतरत्नमंजरी या काव्यपुस्तिकेतील सुंदर रचना इंग्रजी व हिंदीत आहे. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचण्यात आलेली सुंदर रचना वाचून यापेक्षा दुसरे पुष्प त्यांना कोणीच वाहिलेले नसेल. एवढे वास्तव वर्णन यात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इंग्रज येण्यापूर्वी भारतात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी १२५०० विद्यालये तर ७४२ महाविद्यालये होती. यात १ लाख ८० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होेते. अशी माहिती त्यांनी दिली.भाषांना राजाश्रय व लोकांश्रय प्राप्त झाला तरच त्या टिकून राहतात. संस्कृत भाषा टिकवून ठेवण्यासाठी व त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संस्कृत भारतीकडून होत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. संस्कृत विद्यापीठ या भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उषा वैद्य म्हणाल्या. संस्कृत केवळ प्राचीन गं्रथात अडकून न राहता नव्या योजना आखून त्यावर संशोधन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाला पल्लेवार कुटुंबीयाकडून १ लाखाचा निधी देण्यात आला आहे. विद्यापीठ कक्षाला पल्लेवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविक श्री.श.देवपुजारी यांनी संस्कृत भाषा राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात सहाव्या वर्षापासून अनिवार्य करण्यात यावी. संस्कृतच्या पाठ्यक्रमाची पुनर्रचना, व गुरुकुलांना शासनाने अनुदान देण्याची मागणी प्रास्ताविकातून केली. संस्कृत भाषेच्या शलाका परीक्षेत व्दितीय आल्याबद्धल सार्थक घोरपडे या विद्यार्थ्यासह लीना रस्तोगी, चंद्रगुप्त कर्णेकर, संपदा म्हाळगी व आभा भिमनवार आदंीना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौररव करण्यात आला. संचालन पौर्णिमा बाराहाते यांनी तर आभार छाया भास्करराव यांनी मानले. रजनी दुद्दलवार व उषा गेडाम यांचीही भाषणे झाली. मधुसूदन पेन्ना यांनी पल्लेवार यांच्या काव्यपुस्तिकेचे विवेचन केले. (प्रतिनिधी)