शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

विजेच्या धक्क्यामुळे जीव जाऊ नये

By admin | Updated: January 12, 2017 01:46 IST

विजेच्या धक्क्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, अशी भूमिका महावितरणचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी मांडली.

प्रसाद रेशमे यांनी मांडली भूमिका : ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक, वीज सुरक्षा सप्ताह सुरू नागपूर : विजेच्या धक्क्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, अशी भूमिका महावितरणचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी मांडली. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित वीज सुरक्षा सप्ताहाला बुधवारपासून सुरुवात झाली. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. वीज निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे, महावितरणचे मुख्य अभियंता रफीक शेख, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र प्रमुख अतिथी होते. विजेपासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवायचे, याबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. विजेच्या धक्क्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, असा संकल्प महावितरणने केला आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे रेशमे यांनी सांगितले. खोंडे यांनी जनजागृतीच्या माध्यमातून विजेचे अपघात कमी केले जाऊ शकतात, असे मत व्यक्त केले. रफीक शेख यांनी सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व सांगितले. वीज आपल्यासाठी जेवढी आवश्यक आहे, तेवढीच धोकादायकही आहे. विजेचे अपघात कमी करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे, याकडे विकास मिश्र यांनी लक्ष वेधले. वीज निरीक्षक उमाकांत धोटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, मनीष वाठ, ‘एसएनडीएल’चे बिझनेस हेड गौतम सेठ, मनपाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, वीज कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष शरद दुरुगकर, सचिव सचिन सावलकर, आर. पी. देशमुख, देवा ढोरे, अशोक ढोरे, विजय कारेमोरे, अनिल मानापुरे, अशोक पराड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) जनजागृती रॅली सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर नागपूर वीज निरीक्षक, वीज निरीक्षक मंडळाचे अधीक्षक अभियंता व वीज कंत्राटदार संघटना यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. कस्तूरचंद पार्क, रामझुला, जगनाडे चौक, घाट रोड, अजनी, खामला, बजाजनगर, लोकमत चौक, झिरो माईल चौक, कस्तूरचंद पार्क असा रॅलीचा मार्ग होता.