शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

विजेच्या धक्क्यामुळे जीव जाऊ नये

By admin | Updated: January 12, 2017 01:46 IST

विजेच्या धक्क्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, अशी भूमिका महावितरणचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी मांडली.

प्रसाद रेशमे यांनी मांडली भूमिका : ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक, वीज सुरक्षा सप्ताह सुरू नागपूर : विजेच्या धक्क्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, अशी भूमिका महावितरणचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी मांडली. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित वीज सुरक्षा सप्ताहाला बुधवारपासून सुरुवात झाली. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. वीज निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे, महावितरणचे मुख्य अभियंता रफीक शेख, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र प्रमुख अतिथी होते. विजेपासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवायचे, याबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. विजेच्या धक्क्यामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, असा संकल्प महावितरणने केला आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे रेशमे यांनी सांगितले. खोंडे यांनी जनजागृतीच्या माध्यमातून विजेचे अपघात कमी केले जाऊ शकतात, असे मत व्यक्त केले. रफीक शेख यांनी सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व सांगितले. वीज आपल्यासाठी जेवढी आवश्यक आहे, तेवढीच धोकादायकही आहे. विजेचे अपघात कमी करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे, याकडे विकास मिश्र यांनी लक्ष वेधले. वीज निरीक्षक उमाकांत धोटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, मनीष वाठ, ‘एसएनडीएल’चे बिझनेस हेड गौतम सेठ, मनपाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, वीज कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष शरद दुरुगकर, सचिव सचिन सावलकर, आर. पी. देशमुख, देवा ढोरे, अशोक ढोरे, विजय कारेमोरे, अनिल मानापुरे, अशोक पराड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) जनजागृती रॅली सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर नागपूर वीज निरीक्षक, वीज निरीक्षक मंडळाचे अधीक्षक अभियंता व वीज कंत्राटदार संघटना यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. कस्तूरचंद पार्क, रामझुला, जगनाडे चौक, घाट रोड, अजनी, खामला, बजाजनगर, लोकमत चौक, झिरो माईल चौक, कस्तूरचंद पार्क असा रॅलीचा मार्ग होता.