शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

केवळ १७ टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा

By admin | Updated: June 30, 2014 00:48 IST

नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात चालू वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यात चाललेल्या एकूण १४४ प्रकरणांच्या खटल्यात केवळ २४ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण १७ तर

न्यायालय : पाच महिन्याचा लेखाजोखाराहुल अवसरे - नागपूरनागपूर जिल्हा सत्र न्यायालयात चालू वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यात चाललेल्या एकूण १४४ प्रकरणांच्या खटल्यात केवळ २४ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण १७ तर निर्दोष सुटण्याचे प्रमाण ८३ टक्के आहे. ही प्रकरणे भारतीय दंड विधान आणि विशेष कायद्यांतर्गतची आहेत. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खुनाचे एकूण ३५ खटले चालले. त्यापैकी २५ प्रकरणातील आरोपी सबळ पुराव्या अभावी संशयाचा लाभ मिळून निर्दोष सुटले तर १० प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली, ३ आरोपींना दोन ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा झाली. जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. खुनातील शिक्षेचे प्रमाण २८.५७ टक्के आहे. बलात्काराचे एकूण १३ खटले चालून केवळ ३ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. शिक्षेचे प्रमाण २३ टक्के आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का), अमली पदार्थविरोधी कायदा, वीज कायदा, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतची प्रकरणे विशेष न्यायालयांमध्ये चालतात. त्यापैकी अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गतच्या केवळ एका प्रकरणात शिक्षा झालेली असून ११ प्रकरणे निर्दोष सुटलेली आहेत. वीज कायद्यांतर्गतची सर्व तेराही प्रकरणे निर्दोष सुटलेली आहेत. मोक्का, लाचलुचपत प्रतिबंधक आणि जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतच्या कोणत्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.