शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाळलेला कचरा आठवड्यातून दोन दिवसच गोळा करणार

By admin | Updated: June 4, 2017 01:43 IST

शहरात ५ जूनपासून ओला व वाळलेला कचरा वेगवेगळा गोळा केला जाणार आहे.

ओला कचऱ्याचे दररोज संकलन : पहिल्या दिवशी फक्त अडीच हजार जोडी डस्टबीनचे वितरण,प्रत्येक नगरसेवकाच्या निधीतून दोन लाख कपात लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ५ जूनपासून ओला व वाळलेला कचरा वेगवेगळा गोळा केला जाणार आहे. आता प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानातील नियमावलीचे कारण समोर करीत फक्त ओला कचरा दररोज तर वाळलेला कचरा आठवड्यातून दोनच दिवस गोळा केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज कचरा संकलित केला जातो. यापुढे मात्र तसे होणार नाही. त्यामुळे पुढील पाच दिवस वाळलेला कचरा घरात कसा साठवून ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलनासाठी डस्टबीनची व्यवस्था झालेली नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचीही पूर्ण व्यवस्था नाही. असे असले तरी ओला व वाळलेला कचरा वेगवेगळा गोळा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, नागपूर महापालिका कचरा संकलनाची नवी व्यवस्था लागू करीत आहे. यासाठी पाहिजे तशी पूर्वतयारी झालेली नाही. मात्र, प्रशासनातर्फे ही व्यवस्था लागू करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. कचरा संकलनाच्या व्यवस्थेची माहिती देण्यासाठी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले उपस्थित होते. या वेळी पार्डीकर म्हणाले, पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक झोनमध्ये २५० जोडी डस्टबीन वितरित केले जातील. यानंतर ३० जूनपर्यंत आलेल्या मागणीनुसार डस्टबीन उपलब्ध करून दिले जातील. केंद्र सरकारच्या दर करारानुसार एक जोडी डस्टबीनची किंमत २५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी सांगितले की, ५.५० लाख जोडी डस्टबीन खरेदी करण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिका एवढी रक्कम स्वत: खर्च करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाच्या निधीतून दोन लाख रुपये यासाठी वळते केले जातील. याशिवाय महापौर निधीतून ५० लाख रुपये, उपमहापौर व स्थायी समिती निधीतून प्रत्येकी २५ लाख रुपये वळते केले जातील. अशाप्रकारे चार कोटी रुपये उपलब्ध होतील. याशिवाय शहरातील तीन खासदारांनी आपल्या निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये तसेच नऊ आमदारांनी प्रत्येकी ५ लाख रुपये द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वर्षभरात होणार व्यवस्था पुढील तीन महिन्यात ३० टक्के घरे व व्यावसायिक ठिकाणांहून कचरा गोळा करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात ही व्यवस्था लागू होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल. ओला व वाळलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था विकसित करण्याचे काम सुरू आहे, असा दावा संदीप जोशी यांनी केला. भांडेवाडी कचरा वेचणाऱ्यांना प्रवेशस्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा वेचणाऱ्यांना कचरा संकलन पॉर्इंटपर्यंत जाऊन वाळलेल्या कचऱ्यातून कचरा वेचण्याची तरतूद करण्यात आली आहे. शहरात महापालिकेचे दहा झोन असले तरी कचरा गोळा करण्याचे १० पॉर्इंट नाही. संपूर्ण शहराचा कचरा भांडेवाडी येथे गोळा केला जातो. त्यामुळे आता भांडेवाडीत कचरा वेचणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार भांडेवाडी येथे कचरा वेचणाऱ्यांना प्रवेश दिला जाऊ शकत नाही.