शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

दुबार पेरणीसाठी मदत करणार !

By admin | Updated: July 11, 2014 01:22 IST

पावसाने प्रदीर्घ उसंत घेतल्याने खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याबाबत शासन

पालकमंत्र्यांचे संकेत : २० टक्के क्षेत्रावरील पेरणी बुडणारनागपूर : पावसाने प्रदीर्घ उसंत घेतल्याने खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याबाबत शासन विचार करेल. याबाबत अंतिम निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मोघे बोलत होते. जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत २ लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यापैकी २० टक्के क्षेत्रावरील पेरणी उलटण्याची शक्यता असून तेथे दुबार पेरणी करावी लागेल. २०१३ मध्ये १० जुलैपर्यंत २८३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत फक्त ९१ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती नाजूक आहे.सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई नसली तरी पुढच्या काही दिवसातही पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. सध्या जिल्ह्यात १४ टँकर सुरू असून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे, असे मोघे म्हणाले. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना शासन मदत करणार का? असा सवाल मोघे यांना केला असता राज्यभरातील परिस्थिती बघता शासन याबाबत विचार करू शकते. अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात दृष्काळसदृश्य स्थिती आहे. सरकारने यासंदर्भात सर्वेक्षण केले आहे. दुष्काळ जाहीर करण्याबाबत काही निकष आहेत. त्यानुसार शासन निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी नेहमीच शासनाने शेतकऱ्यांची मदत केली आहे. प्रथम अतिवृष्टीसाठी व त्यानंतर गारपीट झाल्यावर अशी एकूण सात हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. टंचाईग्रस्त भागात करावयाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पावसाला विलंब झाल्याने त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन व विजय आदमने उपस्थित होते. (प्रतिनिधी)