शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
3
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
5
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
6
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
7
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
9
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
10
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
11
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
12
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
13
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
14
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
15
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
16
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
17
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
18
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
19
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
20
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

संस्कार, मूल्य, निसर्गाचे पतन करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भगवान महावीर यांनी त्यांच्या जीवनचरित्रातून संस्कार, मानवी मूल्ये आणि निसर्गासोबत प्रेम करण्याचा संदेश दिला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भगवान महावीर यांनी त्यांच्या जीवनचरित्रातून संस्कार, मानवी मूल्ये आणि निसर्गासोबत प्रेम करण्याचा संदेश दिला. ‘जगा आणि जगू द्या’ हा त्यांचा प्रमुख संदेश असून, त्याच्या आधारावरच जगात सुख-शांती प्रस्थापित होऊ शकते. लहान मुलांना संस्कारित करण्याची आवश्यकता आहे. मूल्यांचा अभाव असेल तर आयुष्याचे अधःपतन होईल. स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाला हानी पोहोचविणे आपल्याला पतनाकडे ढकलत आहे. कोरोना महामारी त्याचाच परिणाम आहे, असे मत लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणकाच्या निमित्ताने रविवारी महावीर इंटरनॅशनलच्या नाशिक शाखेतर्फे ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य वक्ता म्हणून विजय दर्डा बोलत होते. ‘महावीरांचे सिद्धान्त आणि विज्ञानाचे महत्त्व’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. नवीन पिढी सुसंस्कारित व्हावी या दृष्टीने साधू-संतांनी महावीरांचे विचार व सिद्धान्त जनमानसापर्यंत पोहोचवायला हवेत. जेव्हा एखाद्याच्या कार्यक्षेत्रात, त्याच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तणाव निर्माण होतो व त्यातून आपल्याला मोठे नुकसान होते. निसर्गाला नुकसान पोहोचविण्याचा फटका आपल्याला कोरोना महामारीच्या रूपात बसला आहे. सर्व साधू-संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे भगवान महावीर यांच्या सिद्धान्तांचे पालन केले तर सकल जैन समाज मजबूत होईल. आपण प्रेम, दया, करुणेचे भाव प्रत्येकाच्या हृदयात जागृत करू शकतो, असे प्रतिपादन दर्डा यांनी केले. वाणीभूषण प्रीतिसुधाजी म. सा. भगवतीस्वरूप आहेत, असे म्हणत १९९४ साली नागपुरात झालेल्या त्यांच्या चातुर्मासाच्या आठवणींवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमात वाणीभूषण प्रीतिसुधाजी म. सा., क्रांतिकारी मधुस्मिता म. सा., मंगलप्रभाजी म. सा., इत्यादी साध्वी उपस्थित होत्या. मंगलाचरण व भगवान महावीर यांच्या वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंगलपाठाने समारोप झाला. महिलाप्रमुख डॉ. संगीता बाफना यांनी संचालन केले. महावीर इंटरनॅशनल नाशिक शाखेचे अध्यक्ष अनिल नाहर, सचिव राजेंद्र बाफना यांनीदेखील कार्यक्रमाचे संचालन केले. ललित सुराणा यांनी तांत्रिक सहकार्य केले.

भगवानांचे सिद्धान्त आत्मसात करा : छाजेड

आज सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. आपण अज्ञात शत्रूसोबत लढतो आहोत. दोन हजार वर्षांअगोदर भगवान महावीर यांनी आपल्याला जे तत्त्वज्ञान दिले, त्या माध्यमातून आपण हा लढा जिंकू शकतो. विचार व आचार कसे असावेत, याचा संदेश त्यांनी दिला. आपण त्याचे अनुसरण करू शकतो. ‘जगा आणि जगू द्या,’ या संदेशाला आत्मसात करून भगवानांना वंदन करावे, असे प्रतिपादन नाशिकचे माजी आमदार व कार्यक्रमाचे उद्घाटक जयप्रकाश छाजेड यांनी केले.

सेवा आणि समर्पणाचा आदर्श प्रस्थापित करा : मुथा

आज आपण पाश्चात्त्य संस्कृतीकडे जात आहोत. धर्म आणि समाजासाठी आपल्याला भगवान महावीर यांच्या जीवनापासून शिकवण घ्यायला हवी. भगवान महावीर यांच्या संदेशानुसार आपण सर्वांच्या सेवेत लागले पाहिजे. यातूनच भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्याचे सार्थक होईल. कोरोनाकाळात शक्य होईल तितकी मदत लोकांपर्यंत पोहोचवा. जैन समाजाने त्याग, सेवा व समर्पणाच्या माध्यमातून देश व जगासमोर आदर्श प्रस्थापित करावा, असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक, समाजसेवक व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शांतिलाल मुथा यांनी व्यक्त केले.