शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

ग्रामसभेत व्हावी पर्यावरणाबद्दल चर्चा

By admin | Updated: October 11, 2015 03:19 IST

मागील २० वर्षात वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले.

मान्यवरांचे मत : विनोबा विचार केंद्रात चर्चासत्राचे आयोजननागपूर : मागील २० वर्षात वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले. ऋतुचक्र बदलून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामसभेत चर्चा होऊन ही चर्चा देशपातळीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.विदर्भ वनाधिकार संघटना, प्रदूषणग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघटना अणि कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने अमरावती मार्गावरील विनोबा विचार केंद्रात ‘कोळसा, ऊर्जा आणि भारत देशातील वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कष्टकरी जन आंदोलनाचे नेते विलास भोंगाडे होते. प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणाचे अभ्यासक सौमित्र घोष, सौम्या दत्ता, बँक इन्फॉर्मेशन सेंटरचे राजेश कुमार, डॉ. योगेश दुधपचारे उपस्थित होते. यावेळी बोलताना सौम्या दत्ता म्हणाले, मागील २० वर्षांपासून वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. देशभरात ७० ते ८० टक्के लोक विस्थापित झाले. यात ५० टक्के आदिवासींचा समावेश आहे. शासनाने २०११ पर्यंत २ लाख मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे खदानी वाढल्या. जमीन आणि पाण्याचा वापर वाढला. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावल्याची माहिती त्यांनी दिली. सौमित्र घोष म्हणाले, २० वर्षात औद्योगिक क्रांती आणि वीज प्रकल्पांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढून त्याचा वातावरणावर विपरीत परिणाम झाला. ऋतुचक्र बदलल्यामुळे शेतकरी, आदिवासी, लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. कार्बन डाय आॅक्साईडच्या उत्सर्जनामुळे कोरडा, ओला दुष्काळ निर्माण होऊन मानवी जीवनावर त्याचे परिणाम दिसू लागले. या बदलांवर व्यापक चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामसभेच्या पातळीवर चर्चा होऊन ही चर्चा वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याची गरज आहे. पॅरिसमध्ये डिसेंबर २०१५ मध्ये होणाऱ्या परिषदेत भारताच्या भूमिकेत स्थानिकांचे मत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चासत्रात डॉ. योगेश दुधपचारे, राजेश कुमार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन प्रवीण मोते यांनी केले. आभार एकनाथ गजभिये यांनी मानले. यशस्वितेसाठी निशांत माटे, प्रेम शामकुवर यांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रात वणी, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)