शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत व्हावी पर्यावरणाबद्दल चर्चा

By admin | Updated: October 11, 2015 03:19 IST

मागील २० वर्षात वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले.

मान्यवरांचे मत : विनोबा विचार केंद्रात चर्चासत्राचे आयोजननागपूर : मागील २० वर्षात वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले. ऋतुचक्र बदलून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामसभेत चर्चा होऊन ही चर्चा देशपातळीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.विदर्भ वनाधिकार संघटना, प्रदूषणग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघटना अणि कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने अमरावती मार्गावरील विनोबा विचार केंद्रात ‘कोळसा, ऊर्जा आणि भारत देशातील वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कष्टकरी जन आंदोलनाचे नेते विलास भोंगाडे होते. प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणाचे अभ्यासक सौमित्र घोष, सौम्या दत्ता, बँक इन्फॉर्मेशन सेंटरचे राजेश कुमार, डॉ. योगेश दुधपचारे उपस्थित होते. यावेळी बोलताना सौम्या दत्ता म्हणाले, मागील २० वर्षांपासून वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. देशभरात ७० ते ८० टक्के लोक विस्थापित झाले. यात ५० टक्के आदिवासींचा समावेश आहे. शासनाने २०११ पर्यंत २ लाख मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे खदानी वाढल्या. जमीन आणि पाण्याचा वापर वाढला. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावल्याची माहिती त्यांनी दिली. सौमित्र घोष म्हणाले, २० वर्षात औद्योगिक क्रांती आणि वीज प्रकल्पांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढून त्याचा वातावरणावर विपरीत परिणाम झाला. ऋतुचक्र बदलल्यामुळे शेतकरी, आदिवासी, लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. कार्बन डाय आॅक्साईडच्या उत्सर्जनामुळे कोरडा, ओला दुष्काळ निर्माण होऊन मानवी जीवनावर त्याचे परिणाम दिसू लागले. या बदलांवर व्यापक चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामसभेच्या पातळीवर चर्चा होऊन ही चर्चा वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याची गरज आहे. पॅरिसमध्ये डिसेंबर २०१५ मध्ये होणाऱ्या परिषदेत भारताच्या भूमिकेत स्थानिकांचे मत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चासत्रात डॉ. योगेश दुधपचारे, राजेश कुमार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन प्रवीण मोते यांनी केले. आभार एकनाथ गजभिये यांनी मानले. यशस्वितेसाठी निशांत माटे, प्रेम शामकुवर यांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रात वणी, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)