शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

ग्रामसभेत व्हावी पर्यावरणाबद्दल चर्चा

By admin | Updated: October 11, 2015 03:19 IST

मागील २० वर्षात वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले.

मान्यवरांचे मत : विनोबा विचार केंद्रात चर्चासत्राचे आयोजननागपूर : मागील २० वर्षात वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले. ऋतुचक्र बदलून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामसभेत चर्चा होऊन ही चर्चा देशपातळीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.विदर्भ वनाधिकार संघटना, प्रदूषणग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघटना अणि कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने अमरावती मार्गावरील विनोबा विचार केंद्रात ‘कोळसा, ऊर्जा आणि भारत देशातील वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कष्टकरी जन आंदोलनाचे नेते विलास भोंगाडे होते. प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणाचे अभ्यासक सौमित्र घोष, सौम्या दत्ता, बँक इन्फॉर्मेशन सेंटरचे राजेश कुमार, डॉ. योगेश दुधपचारे उपस्थित होते. यावेळी बोलताना सौम्या दत्ता म्हणाले, मागील २० वर्षांपासून वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. देशभरात ७० ते ८० टक्के लोक विस्थापित झाले. यात ५० टक्के आदिवासींचा समावेश आहे. शासनाने २०११ पर्यंत २ लाख मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे खदानी वाढल्या. जमीन आणि पाण्याचा वापर वाढला. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावल्याची माहिती त्यांनी दिली. सौमित्र घोष म्हणाले, २० वर्षात औद्योगिक क्रांती आणि वीज प्रकल्पांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढून त्याचा वातावरणावर विपरीत परिणाम झाला. ऋतुचक्र बदलल्यामुळे शेतकरी, आदिवासी, लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. कार्बन डाय आॅक्साईडच्या उत्सर्जनामुळे कोरडा, ओला दुष्काळ निर्माण होऊन मानवी जीवनावर त्याचे परिणाम दिसू लागले. या बदलांवर व्यापक चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामसभेच्या पातळीवर चर्चा होऊन ही चर्चा वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याची गरज आहे. पॅरिसमध्ये डिसेंबर २०१५ मध्ये होणाऱ्या परिषदेत भारताच्या भूमिकेत स्थानिकांचे मत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चासत्रात डॉ. योगेश दुधपचारे, राजेश कुमार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन प्रवीण मोते यांनी केले. आभार एकनाथ गजभिये यांनी मानले. यशस्वितेसाठी निशांत माटे, प्रेम शामकुवर यांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रात वणी, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)