शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
4
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
5
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
6
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
7
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
8
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
9
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
10
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
11
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
12
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
13
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
14
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
15
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
16
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
17
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
18
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
19
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
20
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

कृषी विभाग भाड्याच्या घरात!

By admin | Updated: August 22, 2015 02:53 IST

कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या उत्थानाची धुरा खांद्यावर असलेला नागपूर कृषी विभाग स्वतंत्र्याच्या ६० वर्षानंतरही स्वत:च भाड्याच्या घरात आश्रित असल्याचे ....

ही तर थट्टाच : कधी मिळणार हक्काची इमारत

जीवन रामावत नागपूरकृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या उत्थानाची धुरा खांद्यावर असलेला नागपूर कृषी विभाग स्वतंत्र्याच्या ६० वर्षानंतरही स्वत:च भाड्याच्या घरात आश्रित असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कृषीविषयक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या, यासाठी कृषी विभागाची राज्यस्तरापासून तर गावपातळीपर्यंत रचना करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात नागपूरसह उमरेड, रामटेक व काटोल असे चार उपविभागीय (एसडीएओ) कार्यालये आणि १३ तालुका कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. परंतु यापैकी केवळ एक उपविभागीय व तीन तालुका कार्यालयांचा अपवाद वगळता इतर सर्व कार्यालये भाड्याच्या घरात सुरू आहेत. या कृषी विभागाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. मात्र अजूनपर्यंत या विभागाला स्वत:च्या हक्काची जागा मिळालेली नाही, ही या विभागाची तसेच शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल. जिल्ह्यात नागपूर (ग्रामीण), कामठी, हिंगणा, सावनेर, काटोल, नरखेड, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड, भिवापूर व कुही येथे तालुका कार्यालये आहेत. परंतु यापैकी केवळ नागपूर (ग्रामीण), मौदा व कामठी या तीनच कार्यालयांना शासकीय इमारतीत जागा मिळाली आहे. याशिवाय इतर सर्व कार्यालये भाड्याच्या इमारतीत असल्याने तेथे सोयी-सुविधांचा फार मोठा अभाव आहे. अनेक तालुका कार्यालये नजरेस सुद्धा पडत नाही. त्यामुळे शेतकरीसुद्धा त्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र असे असताना या कार्यालयांच्या भाड्यापोटी लाखो रुपये मोजले जात आहेत. त्यामुळे कृषी विभागाची ही दैनावस्था कधी संपणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात सुमारे २ लाख ६० हजार खातेधारक शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी २७ मंडळ कार्यालये आणि ३०० पेक्षा अधिक कृषी सहायकांची फौज आहे. पण उप विभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांप्रमाणेच या मंडळ अधिकारी व कृषी सहायकांना सुद्धा बसण्यासाठी कुठेही स्वत:च्या हक्काची कार्यालये उपलब्ध नाहीत. यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी सहायक हा स्वत:च ‘चालते फिरते’ कार्यालय बनला आहे. शिवाय एका कृषी सहायकाला किमान पाच ते सहा गावांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. अशा स्थितीत तो ज्या गावात जाईल तेथे-तेथे त्याला दफ्तर सोबत घेऊन फिरावे लागते. कृषी विभागाला हक्काचे कार्यालय हवे कृषी सहायक हा गावपातळीवरील महत्त्वाचा कर्मचारी आहे. त्याचा थेट शेतकऱ्यांशी संबंध येतो. त्यामुळे त्याला बसण्यासाठी निश्चित कार्यालय असलेच पाहिजे. परंतु सध्या तशी कुठेही व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होते. कृषी सहायक हा कुठे बसतो, हेच शेतकऱ्यांना माहीत नसते. यासाठी तलाठी व ग्रामसेवकांप्रमाणे कृषी सहायकाला सुद्धा ग्रामपंचायतीत कार्यालय उपलब्ध करू न दिले पाहिजे. शिवाय तालुकास्तरावर प्रशासकीय इमारत तयार करू न त्यात तालुका कार्यालयांना जागा देण्यात यावी. यामुळे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल, शिवाय शेतकऱ्यांनाही एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालये मिळतील.रवींद्र मनोहरे, कृषी उपसंचालक