शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

कृषी विभाग भाड्याच्या घरात!

By admin | Updated: August 22, 2015 02:53 IST

कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या उत्थानाची धुरा खांद्यावर असलेला नागपूर कृषी विभाग स्वतंत्र्याच्या ६० वर्षानंतरही स्वत:च भाड्याच्या घरात आश्रित असल्याचे ....

ही तर थट्टाच : कधी मिळणार हक्काची इमारत

जीवन रामावत नागपूरकृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या उत्थानाची धुरा खांद्यावर असलेला नागपूर कृषी विभाग स्वतंत्र्याच्या ६० वर्षानंतरही स्वत:च भाड्याच्या घरात आश्रित असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कृषीविषयक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या, यासाठी कृषी विभागाची राज्यस्तरापासून तर गावपातळीपर्यंत रचना करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात नागपूरसह उमरेड, रामटेक व काटोल असे चार उपविभागीय (एसडीएओ) कार्यालये आणि १३ तालुका कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. परंतु यापैकी केवळ एक उपविभागीय व तीन तालुका कार्यालयांचा अपवाद वगळता इतर सर्व कार्यालये भाड्याच्या घरात सुरू आहेत. या कृषी विभागाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. मात्र अजूनपर्यंत या विभागाला स्वत:च्या हक्काची जागा मिळालेली नाही, ही या विभागाची तसेच शेतकऱ्यांची थट्टाच म्हणावी लागेल. जिल्ह्यात नागपूर (ग्रामीण), कामठी, हिंगणा, सावनेर, काटोल, नरखेड, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड, भिवापूर व कुही येथे तालुका कार्यालये आहेत. परंतु यापैकी केवळ नागपूर (ग्रामीण), मौदा व कामठी या तीनच कार्यालयांना शासकीय इमारतीत जागा मिळाली आहे. याशिवाय इतर सर्व कार्यालये भाड्याच्या इमारतीत असल्याने तेथे सोयी-सुविधांचा फार मोठा अभाव आहे. अनेक तालुका कार्यालये नजरेस सुद्धा पडत नाही. त्यामुळे शेतकरीसुद्धा त्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र असे असताना या कार्यालयांच्या भाड्यापोटी लाखो रुपये मोजले जात आहेत. त्यामुळे कृषी विभागाची ही दैनावस्था कधी संपणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात सुमारे २ लाख ६० हजार खातेधारक शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी २७ मंडळ कार्यालये आणि ३०० पेक्षा अधिक कृषी सहायकांची फौज आहे. पण उप विभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांप्रमाणेच या मंडळ अधिकारी व कृषी सहायकांना सुद्धा बसण्यासाठी कुठेही स्वत:च्या हक्काची कार्यालये उपलब्ध नाहीत. यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी सहायक हा स्वत:च ‘चालते फिरते’ कार्यालय बनला आहे. शिवाय एका कृषी सहायकाला किमान पाच ते सहा गावांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. अशा स्थितीत तो ज्या गावात जाईल तेथे-तेथे त्याला दफ्तर सोबत घेऊन फिरावे लागते. कृषी विभागाला हक्काचे कार्यालय हवे कृषी सहायक हा गावपातळीवरील महत्त्वाचा कर्मचारी आहे. त्याचा थेट शेतकऱ्यांशी संबंध येतो. त्यामुळे त्याला बसण्यासाठी निश्चित कार्यालय असलेच पाहिजे. परंतु सध्या तशी कुठेही व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होते. कृषी सहायक हा कुठे बसतो, हेच शेतकऱ्यांना माहीत नसते. यासाठी तलाठी व ग्रामसेवकांप्रमाणे कृषी सहायकाला सुद्धा ग्रामपंचायतीत कार्यालय उपलब्ध करू न दिले पाहिजे. शिवाय तालुकास्तरावर प्रशासकीय इमारत तयार करू न त्यात तालुका कार्यालयांना जागा देण्यात यावी. यामुळे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल, शिवाय शेतकऱ्यांनाही एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालये मिळतील.रवींद्र मनोहरे, कृषी उपसंचालक