शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

घरातच मरताहेत कोरोना पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. प्रत्येक गावातील घराघरात रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागात आपत्कालीन उपचाराची ...

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. प्रत्येक गावातील घराघरात रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागात आपत्कालीन उपचाराची सोय नाही. शहरातील रुग्णालयात जागा नाही. औषधांचा तुटवडा, मनुष्यबळाचा अभाव यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना रुग्ण घरीच मरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांची अंत्ययात्राही निघत आहे.

कोरोनाचे ग्रामीण भागातील चित्र अतिशय भयावह आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना होम क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. व्हिटॅमिनच्या गोळ्यांसोबत कोरोनाचे रुग्ण लढत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ कोविड केअर सेंटर सुरू झाले आहेत. हे सेंटरही हाऊसफुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही सेंटरमध्ये ऑक्सिजनची सोय आहे, तर मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आहे. जिल्हा परिषदेने डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अटेंडन्ट या पदांसाठी जाहिरातील दिल्या आहेत. पण, कर्मचारी मिळत नसल्याची स्थिती आहे. एमबीबीएस डॉक्टर सोडाच, बीएएमएस डॉक्टरसुद्धा आरोग्य विभागाला मिळत नाही. आरोग्याची अख्खी यंत्रणा वाऱ्यावर आहे. शहरात रुग्णाला पाठविल्यास बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे घरात बसूनच उपचार करावा लागत आहे.

- ग्रामीणच्या आरोग्य व्यवस्थेवर शहरातील यंत्रणा मॉनिटरिंग करीत आहे. मॉनिटरिंग करणाऱ्या यंत्रणेतील अधिकारीही सक्षम नाही. बैठकांच्या नावाने अधिकारी ऐकून घ्यायला तयार नाहीत. परिस्थिती इतकी बिकट झाली की, एका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने काम भागणार नाही. डॉ. योगेंद्र सवईसारख्या सक्षम अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरविण्याची गरज आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे की, डॉ. सवईकडे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी सोपवावी.

व्यंकट कारेमोरे, गटनेता, जि.प.

- ग्रामीण भागातील आहे ती यंत्रणा कामे करून थकलेली आहे. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालयाचा अर्धा स्टाफ क्वारंटाईन आहे. घराघरांत पोहोचणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे.

- सतीश डोंगरे, जि.प. सदस्य

- शहरासारखीच गंभीर परिस्थिती आज जिल्ह्याची झाली आहे. आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. आरोग्य अधिकाऱ्याच्या हाताबाहेर परिस्थिती गेली आहे. गावच्या गाव पॉझिटिव्ह निघत आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या भरवशावर गाव सोडले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीणकडे स्वत:हून लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा प्रेतांचे खच लागल्याशिवाय राहणार नाही.

- वृंदा नागपुरे, जि.प. सदस्य