शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

कोरोनामुळे न्यायव्यवस्था डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST

सर्व प्रकारच्या न्यायालयांमध्ये मार्चपासून केवळ अत्यावश्यक स्वरुपाची प्रकरणे ऐकली गेली. इतर सर्व प्रकरणे मागे ठेवण्यात आली. त्यामुळे न्यायालयांमधील प्रलंबित ...

सर्व प्रकारच्या न्यायालयांमध्ये मार्चपासून केवळ अत्यावश्यक स्वरुपाची प्रकरणे ऐकली गेली. इतर सर्व प्रकरणे मागे ठेवण्यात आली. त्यामुळे न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. परिणामी, येणाऱ्या काळात ही प्रकरणे निकाली काढून परिस्थिती आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान न्यायालयांपुढे आहे. देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी कोर्ट ई-रिसोर्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती.

------------------

कोरोना रुग्ण, मजुरांच्या गैरसोयीची गंभीर दखल

कोरोना संक्रमण झपाट्याने वाढल्यानंतर विदर्भातील वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडल्या होत्या. कोरोना रुग्णांना खाटा मिळत नव्हत्या. ऑक्सिजन व औषधे मिळत नव्हती. वेळेवर उपचार होत नव्हते. परिणामी, गंभीर कोरोना रुग्ण दगावत होते. तसेच, लॉकडाऊनमुळे परराज्यांतील मजुरांच्या अमानुष हालअपेष्टा होत होत्या. ते आपापल्या घरी जाण्यासाठी कुटुंबासह घराबाहेर पडले होते. त्यात लहान मुले, महिला, वृद्ध, आजारी, अपंग व्यक्तींचा समावेश होता. त्यांना वाहने उपलब्ध नव्हती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गंभीर दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतल्या व प्रशासनाला वेळोवेळी आवश्यक आदेश देऊन नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण केले.

-----------------

कस्तूरचंद पार्क, लोणार सरोवराला प्रत्यक्ष भेट

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे (सेवानिवृत्त) व पुष्पा गणेडीवाला यांनी सिव्हील लाईन्स येथील हेरिटेज कस्तूरचंद पार्कला तर, न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व माधव जामदार यांनी बुलडाणा जिल्ह्यातील हेरिटेज लोणार सरोवराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील दुरावस्थेचे अवलोकन केले. तसेच, त्यानंतर या दोन्ही स्थळांच्या संवर्धन व विकासाकरिता आवश्यक आदेश दिले.

-------------

दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरित

मार्चमध्ये देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरित करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व भगवान महावीर विकलांग सहायता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम आमदार निवास येथे पार पडला. एकूण ३५०० दिव्यांगाना कृत्रिम अवयव देण्यात आले.

----------------

काय म्हणतात तज्ज्ञ

काम थांबले नाही ()

न्यायालयांनी कोरोना संक्रमणामुळे काम थांबवले नाही. ऑनलाईन पद्धतीने जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न केला गेला. तंत्रज्ञानाचा उपयोग हे न्यायव्यवस्थेचे भविष्य आहे. त्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे हे सर्वांना कळले.

----- ॲड. शशिभूषण वहाणे, हायकोर्ट.

***

अंतिम सुनावण्या झाल्या नाही

कोरोना संक्रमणामुळे न्यायालयांमध्ये अंतिम सुनावण्या होऊ शकल्या नाहीत. त्याकरिता पक्षकार प्रतीक्षा करीत होते. ऑनलाईन कामकाजात केवळ तातडीची प्रकरणे ऐकली गेली. आवश्यक तांत्रिक सुविधा नसलेल्या वकिलांसाठी ऑनलाईन कामकाज अन्यायकारक ठरले.

----- ॲड. फिरदोस मिर्झा, हायकोर्ट.

***

प्रशंसनीय काम झाले ()

न्यायालयांनी कोरोना संक्रमण काळात ऑनलाईन पद्धतीने प्रशंसनीय काम केले. पीडितांना योग्यवेळी न्याय मिळण्यासाठी अत्यावश्यक प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली. न्यायालयांमध्ये तंत्रज्ञानाचा एवढा व्यापक उपयोग प्रथमच झाला.

----- ॲड. राजेंद्र डागा, हायकोर्ट.

***

नवीन मार्ग उघडला ()

कोरोना संक्रमणामुळे न्यायालयांमध्ये ऑनलाईन कामकाजाचा नवीन मार्ग उघडला गेला. न्यायालयांनी याद्वारे अत्यावश्यक प्रकरणे तातडीने निकाली काढून पीडितांना वेळेवर न्याय दिला. न्यायालयांमध्ये भविष्यातही ऑनलाईन कामकाजाचा पर्याय उपलब्ध ठेवायला हवा.

----- ॲड. कमल सतुजा, अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन.

----------------------