शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

कूचबिहार हिंसेवरून राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कूचबिहारमधील गोळीबार हा नरसंहारच असून, निवडणूक आयोगाने जिल्ह्यात नेत्यांच्या प्रवेशावर बंदी टाकली आहे. प्रवेश नाकारून आयोग तथ्य दाबत आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी लावला. तर ममता यांच्या इशाऱ््यावरूनच स्थानिकांनी सुरक्षादलांवर हल्ला केला असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

शनिवारी स्थानिक लोकांनी हल्ला केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने गोळीबार केला व त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. स्थानिक लोक जवानांच्या बंदुका हिसकवण्याचा प्रयत्न करत होते, असे म्हटले जात आहे. यावर ममता यांनी भाष्य केले. सीतलकूची येथे केंद्रीय सुरक्षारक्षकांनी मतदानादरम्यान लोकांवर जाणूनबुजून गोळीबार केला. मी १४ एप्रिल रोजी तेथे जाऊ इच्छिते. देशात अयोग्य केंद्र सरकार व अयोग्य गृहमंत्री आहेत. सीआयएसएफला स्थितीचा सामना करता येत नाही. केंद्रीय दलांमधील एक वर्ग लोकांवर अत्याचार करत आहे. पहिल्या टप्प्यापासून मी हा दावा करत आहे. मात्र कुणीही माझ्याकडे लक्ष दिलेले नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तृणमूलचे कार्यकर्ते या घटनेविरोधात राज्यभरात आंदोलन करतील. निवडणूक आयोगाने एमसीसी म्हणजेच आदर्श आचार संहितेचे नाव बदलून मोदी आचारसंहिता करावे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

ममता मृत्यूचे राजकारण करत आहेत - शहा

शांतीपूर येथे एका रोड शो दरम्यान अमित शहा यांनी ममतांवर टीकास्त्र सोडले. ममतांच्या सल्ल्यावरून सीतलकूची येथे सुरक्षा दलांवर स्थानिकांनी हल्ला केला. मृत्यूचे ममता आता राजकारण करत आहेत. ममता याच त्या मृत्यूंसाठी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.