शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची संकल्पना सुस्पष्ट व्हावी

By admin | Updated: July 6, 2014 00:51 IST

विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, विकासाच्या प्रक्रियेत ज्यांचा विकास व्हायला हवा होता त्यांचा झाला नाही. विकासाच्या प्रकल्पांमुळे अनेक जण रस्त्यावर येऊन भूमिहीन, बेरोजगार झाले.

मान्यवरांचे मत : ‘विकास : नेमका कोणाचा, कसा व किती?’ यावर चर्चासत्रनागपूर : विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, विकासाच्या प्रक्रियेत ज्यांचा विकास व्हायला हवा होता त्यांचा झाला नाही. विकासाच्या प्रकल्पांमुळे अनेक जण रस्त्यावर येऊन भूमिहीन, बेरोजगार झाले. देशात राबविलेले विकासाचे मॉडेल्सही कमकुवत ठरले. त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर विकासाकडे सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक दृष्टिकोनातून पाहून विकासाची संकल्पना सुस्पष्ट होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, विदर्भ सांस्कृतिक परिषद आणि प्रगतिशील लेखक संघातर्फे वाङ्मय विचार पर्व या उपक्रम मालिकेत ‘विकास : नेमका कोणाचा, कसा व किती?’ या चर्चासत्राचे आयोजन बजाजनगरातील कस्तुरबा भवनात करण्यात आले. चर्चासत्रात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे विलास भोंगाडे म्हणाले, बॅनर तयार करणारे, बांधकाम क्षेत्रातील मजुरांची संख्या कमी होऊन काम मिळत नसल्याने ठिय्यावर मजूरही येत नाहीत. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या न मिळाल्याने अनेक परिवार विनाशाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या, विकासात सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्रीय तथ्य तपासण्याची गरज आहे. क्रमबद्ध विकास तळागाळापर्यंत पोहोचतो. यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. मात्र भारतात यावर प्रयत्न कमी पडले. जपानने क्रमबद्ध विकास करून प्रगती साधल्याचे सांगून त्यांनी विविध विकासाच्या मॉडेल्सची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित म्हणाले, व्यवस्थेविषयी सर्वांच्या मनात प्रचंड राग आहे. व्यवस्थेतील लोक सर्वांगीण विकास रोखून धरतात. सत्तेशी जुळवून घेणाऱ्यांचा विकास होतो. तळागाळापर्यंत विकास पोहोचविणारी यंत्रणा भ्रष्ट असून, वर्तमानकाळातील परिस्थिती पाहून विकासाची व्याख्या करण्याची गरज आहे. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सगळीकडे बेबंद भांडवलशाही उरली असून, तंत्रज्ञानाला विरोध न करता सामूहिक विकास साधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी संस्कृतीचा परिणाम विकासावर होत असल्यामुळे संस्कृती जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. सुरेश खैरनार यांनी पुनर्वसनासाठी आवाज उचलणाऱ्या चळवळी संपत असल्याची खंत व्यक्त करून, कायद्याच्या भरवशावर नक्षलवाद संपविणे कठीण असल्याचे सांगितले. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी तथाकथित विकासाच्या विरोधातील प्रश्न मांडण्याची लोकशाहीतील जागा हरवल्याचे मत व्यक्त केले. संचालन अजेय गंपावार यांनी केले. (प्रतिनिधी)