शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सांघिक प्रयत्नांना प्रभावी प्रचार तंत्राची साथ

By admin | Updated: October 21, 2014 00:52 IST

कार्यकर्त्यांचे सांघिक प्रयत्न, त्याला मिळालेली प्रभावी प्रचार तंत्राची जोड, उमेदवारी देताना साधलेला जातीय समतोल, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये

संघाच्या मुख्यालयी प्रथमच भाजपचे एकहाती वर्चस्वनागपूर : कार्यकर्त्यांचे सांघिक प्रयत्न, त्याला मिळालेली प्रभावी प्रचार तंत्राची जोड, उमेदवारी देताना साधलेला जातीय समतोल, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये असलेली नरेंद्र मोदींची क्रेझ या बाबी भाजपच्या शहरातील दणदणीत विजयासाठी कारणीभूत ठरल्या.सामाजिक परिवर्तनाची भूमी आणि कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये आलेल्या भाजपच्या भगव्या लाटेत अनेक दिग्गजांचे पानिपत तर झालेच, पण प्रथमच संघाच्या मुख्यालयी भाजपने विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकहाती वर्चस्व स्थापन करण्यात यश मिळविले.लोकसभेनंतर विधानसभेतही मिळालेल्या दणदणीत विजयामागे भाजपच्या संघटनात्मक शक्तीचे मोठे योगदान आहे. नाही म्हणायला याही पक्षात धुसफूस, गटतट आहेत. पक्ष महापालिकेत सत्तेत असल्याने नागरी सुविधांच्यासंदर्भात लोकांची नाराजीसुद्धा आहे. मात्र याचा कुठलाही परिणाम होणार नाही, यासाठी पद्धतशील प्रयत्न करण्यात आले. गटतट विसरून कार्यकर्त्यांना कामाला लावण्याची किमया गडकरी -फडणवीस आणि त्यांच्यासह इतरही नेत्यांनी करून दाखविली. विरोधी पक्ष कमकुवत आहे म्हणून भाजप शांत बसला नाही. उलट शहरातील सर्वच्यासर्व जागा जिंकण्यासाठी सहा महिन्यापासून यंत्रणा कामाला लागली. मतदारांच्या नोंदणीपासून ते त्यांना मतदानाच्या दिवशी केंद्रापर्यंत नेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. पक्षाचे बलस्थान आणि विरोधकांचे कमकुवत दुवे हेरतानाच शिवसेनेशी तुटलेल्या युतीमुळे होणारे फायदे-तोटेही लक्षात घेण्यात आले. त्यानंतर प्रचाराची व्यूहरचना तयार करण्यात आली. त्याला प्रभावी तंत्राची जोड मिळाली. पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता सर्व आधुनिक साधनांचा वापर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर राज्यातील नेते, केंद्रीय मंत्री अशा दिग्गजांची फौज प्रचारासाठी राबली. विविध वाहिन्यांवर दिवसभर सुरू असणाऱ्या मोदींच्या भाषणाच्या जाहिरातीही मदतीला होत्याच. या सर्वांचा फायदा भगवी लाट निर्माण होण्यास कारणीभूत झाला. पक्षाच्या काही उमेदवारांना मिळालेली मते आणि त्यांचे मताधिक्य पाहिले तर याची खात्री पटते.निवडणुकीच्यापूर्वी मोदींनी केलेले ‘मेट्रो रेल्वे’सह कोट्यवधी रुपयाच्या रस्ते व पुलाच्या कामाचे भूमिपूजन, एम्ससाठी नागपूरची निवड आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘विकास पुरुष’म्हणून असलेली प्रतिमा तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदासाठी आलेले नाव आणि तरुणांमध्ये असलेली मोदींची क्रेझ याचाही फायदा भाजपला झाला. लोकसभेप्रमाणे उघडरीत्या नसले तरी संघ स्वंयसेवकांची फळीही सक्रिय होती. या उलट स्थिती प्रतिस्पर्धी पक्षाची होती. शिवसेना, राष्ट्रवादीची शक्तीच नव्हती आणि कॉंग्रेस सुस्त होती. ही बाबही भाजपच्या पत्थ्यावर पडली.(प्रतिनिधी)