शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सांघिक प्रयत्नांना प्रभावी प्रचार तंत्राची साथ

By admin | Updated: October 21, 2014 00:52 IST

कार्यकर्त्यांचे सांघिक प्रयत्न, त्याला मिळालेली प्रभावी प्रचार तंत्राची जोड, उमेदवारी देताना साधलेला जातीय समतोल, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये

संघाच्या मुख्यालयी प्रथमच भाजपचे एकहाती वर्चस्वनागपूर : कार्यकर्त्यांचे सांघिक प्रयत्न, त्याला मिळालेली प्रभावी प्रचार तंत्राची जोड, उमेदवारी देताना साधलेला जातीय समतोल, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांमध्ये असलेली नरेंद्र मोदींची क्रेझ या बाबी भाजपच्या शहरातील दणदणीत विजयासाठी कारणीभूत ठरल्या.सामाजिक परिवर्तनाची भूमी आणि कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये आलेल्या भाजपच्या भगव्या लाटेत अनेक दिग्गजांचे पानिपत तर झालेच, पण प्रथमच संघाच्या मुख्यालयी भाजपने विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकहाती वर्चस्व स्थापन करण्यात यश मिळविले.लोकसभेनंतर विधानसभेतही मिळालेल्या दणदणीत विजयामागे भाजपच्या संघटनात्मक शक्तीचे मोठे योगदान आहे. नाही म्हणायला याही पक्षात धुसफूस, गटतट आहेत. पक्ष महापालिकेत सत्तेत असल्याने नागरी सुविधांच्यासंदर्भात लोकांची नाराजीसुद्धा आहे. मात्र याचा कुठलाही परिणाम होणार नाही, यासाठी पद्धतशील प्रयत्न करण्यात आले. गटतट विसरून कार्यकर्त्यांना कामाला लावण्याची किमया गडकरी -फडणवीस आणि त्यांच्यासह इतरही नेत्यांनी करून दाखविली. विरोधी पक्ष कमकुवत आहे म्हणून भाजप शांत बसला नाही. उलट शहरातील सर्वच्यासर्व जागा जिंकण्यासाठी सहा महिन्यापासून यंत्रणा कामाला लागली. मतदारांच्या नोंदणीपासून ते त्यांना मतदानाच्या दिवशी केंद्रापर्यंत नेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. पक्षाचे बलस्थान आणि विरोधकांचे कमकुवत दुवे हेरतानाच शिवसेनेशी तुटलेल्या युतीमुळे होणारे फायदे-तोटेही लक्षात घेण्यात आले. त्यानंतर प्रचाराची व्यूहरचना तयार करण्यात आली. त्याला प्रभावी तंत्राची जोड मिळाली. पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता सर्व आधुनिक साधनांचा वापर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर राज्यातील नेते, केंद्रीय मंत्री अशा दिग्गजांची फौज प्रचारासाठी राबली. विविध वाहिन्यांवर दिवसभर सुरू असणाऱ्या मोदींच्या भाषणाच्या जाहिरातीही मदतीला होत्याच. या सर्वांचा फायदा भगवी लाट निर्माण होण्यास कारणीभूत झाला. पक्षाच्या काही उमेदवारांना मिळालेली मते आणि त्यांचे मताधिक्य पाहिले तर याची खात्री पटते.निवडणुकीच्यापूर्वी मोदींनी केलेले ‘मेट्रो रेल्वे’सह कोट्यवधी रुपयाच्या रस्ते व पुलाच्या कामाचे भूमिपूजन, एम्ससाठी नागपूरची निवड आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘विकास पुरुष’म्हणून असलेली प्रतिमा तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदासाठी आलेले नाव आणि तरुणांमध्ये असलेली मोदींची क्रेझ याचाही फायदा भाजपला झाला. लोकसभेप्रमाणे उघडरीत्या नसले तरी संघ स्वंयसेवकांची फळीही सक्रिय होती. या उलट स्थिती प्रतिस्पर्धी पक्षाची होती. शिवसेना, राष्ट्रवादीची शक्तीच नव्हती आणि कॉंग्रेस सुस्त होती. ही बाबही भाजपच्या पत्थ्यावर पडली.(प्रतिनिधी)