शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

कॉलेज सुरू, निकाल अडले!

By admin | Updated: July 2, 2015 03:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.

कुलगुरूंचे आश्वासन हवेतच विरले : अंतिम वर्षाचे निकाल नाहीचनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल दोन ते तीन दिवसांत लावण्यात येतील, असे आश्वासन सुमारे आठवडाभराअगोदर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिले होते. परंतु अद्यापदेखील विद्यापीठाचे निकाल लागलेले नसून विद्यापीठाकडून महाविद्यालयांवर याचे खापर फोडण्यात येत आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी उन्हाळी परीक्षांच्या निकालांची गाडी अतिशय संथ वेगाने सुरू आहे. मागील मंगळवारी यासंदर्भात परीक्षा विभागात बैठक झाली. अनेक महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठाला पाठविलेलेच नसल्याची बाब समोर आली. कमीतकमी अंतिम वर्षाचे निकाल परीक्षा विभागाने लवकरात लवकर लावावेत व ज्यांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आलेले नाहीत त्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवावेत, असे निर्देश कुलगुरूंनी दिले होते. अवघ्या २० महाविद्यालयांमुळे ‘बीएस्सी’च्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत. कला व वाणिज्यच्या निकालाची ‘स्क्रूटिनी’ राहिली होती. ती आता झाली असून लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु आठवडा उलटूनही अंतिम वर्षांचे निकाल अद्याप लागले नाहीत. (प्रतिनिधी)ही कुठली समाधानकारक स्थिती९५६ पैकी अवघ्या २५० परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. परीक्षा विभाग कोलमडलेला असताना कुलगुरू मात्र ते मान्य करायला तयार नाहीत. मागील आठवड्यात त्यांना याबाबत विचारणा केली असता निकालाची स्थिती समाधानकारक असून, जाहीर झालेल्यांपैकी ७५ टक्के निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात आले आहेत, असा दावा त्यांनी केला होता. परंतु हजारो विद्यार्थ्यांचे निकाल रखडलेले असताना कुलगुरूंना ही स्थिती समाधानकारक कशी वाटते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.उच्च शिक्षणाची संधी जाण्याची भीतीअंतिम वर्षांच्या अनेक विद्यार्थ्यांना बाहेरील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत निकालच लागले नाही तर प्रवेशाची संधी जाते की काय अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. निकाल लवकर लावण्याचे दावे दरवेळा करण्यात येतात, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीच का होत नाही, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.