शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आनंदनगरातील गार्इंच्या गोठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: June 1, 2016 03:11 IST

रहिवासी भागात असलेल्या गाय आणि म्हशीच्या दोन गोठ्यांमुळे आनंदनगर परिसरातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.

नागपूर : रहिवासी भागात असलेल्या गाय आणि म्हशीच्या दोन गोठ्यांमुळे आनंदनगर परिसरातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. माशा, शेणातील किडे आमि डासांमुळे नागरिक हैराण झाले असून, रस्त्यावर आणि खेळण्याच्या मैदानात सर्वत्र शेण पडून असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून आनंदनगर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर तुमसरे यांनी असंख्य तक्रारी प्रशासनाकडे दिल्या. पण प्रशासन एक विभाग ते दुसरा विभाग कागदी हत्ती चालविण्यात व्यस्त असल्याने नागरिकांची समस्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. आता तर नागरिक परिसरातील दुर्गंधी आणि शेणामुळे हैराण झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्वरित पावले न उचलल्यास नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आनंदनगरपासून सक्करदरा चौकाकडे जाणारा एकच मार्ग आहे. याच मार्गावर भाजीचे दुकान, रेस्टॉरंटस् आणि बाजारपेठ आहे. त्यामुळे आनंदनगरातील नागरिकांना याच मार्गाने जाणे क्रमप्राप्त आहे. पण या मार्गावर गाय आणि म्हशीचे दोन गोठे आहेत. गोठ्यातील गाई, म्हशी रस्त्यावर उभ्या असतात. जनावरांमुळे रस्त्यावरून वाहतूक करणे अशक्य होते. याशिवाय ठिकठिकाणी शेण पडून असल्याने नागरिकांची वाहने शेणातून घसरतात आणि किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढते आहे. जनावरांना किमान गोठ्यात बांधून ठेवण्याची विनंती अनेकदा नागरिकांनी केली; पण जनावरांचे मालक अरेरावीने वागतात. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. पण कुठलीही कारवाई गेल्या तीन वर्षांत करण्यात आलेली नाही. मनपाचे सहआयुक्त मोरोणे, पदाधिकारी रामटेके, नेहरूनगर झोनचे उपायुक्त यांना चंद्रशेखर तुमसरे यांनी नागरिकांच्यावतीने तक्रारी दिल्या. पण संबंधित विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगून प्रत्येक वेळी नागरिकांची बोळवण केली जात असून, यामुळे नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. स्वच्छ नागपूर सुंदर नागपूरचा नारा देणारे प्रशासन तब्बल तीन वर्षांपासून अनेकदा तक्रारी करून नागरिकांच्या समस्या सोडवू शकले नाही. त्यामुळे आनंदनगरातील नागरिकांनी तीव्र संताप लोकमतकडे व्यक्त केला आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन प्रत्येक वेळी टोलवाटोलवी करीत असल्याने आता तक्रार नेमकी कुणाकडे करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गोठा मालकांना विनंती केली असता, ते अरेरावीची भाषा वापरून नागरिकांनाच धमक्या देत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.(प्रतिनिधी)मुलांना खेळण्यासाठी जागाच नाहीआनंदनगर परिसरात एक मध्यवर्ती खेळण्याचे मैदान आहे. सकाळी आणि सायंकाळी येथे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले खेळण्यासाठी, फिरण्यासाठी जातात. पण या मैदानात फिरण्याच्या ट्रॅकवर सर्वत्र शेण असल्याने फिरणे दुरापास्त झाले आहे. मुलांना या मैदानात खेळताच येत नाही. अनेकदा सकाळी मुले सायकल घेऊन शाळेत जात असताना रस्त्यावर साचलेल्या शेणाच्या ढिगाऱ्याने सायकलवरून घसरून पडतात आणि त्यांचा शाळेचा गणवेश शेणाने भरतो. परिसरात सर्वत्र दुर्गंधी असल्याने यावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी नागरिकांनी केली असून कुठल्याही नेत्याने या परिसरातील रस्त्यावर केवळ एक मिनिट उभे राहून दाखवावे, असे खुले आव्हान नागरिकांनी दिले आहे. सक्करदरा पोलिस स्टेशनच्या भिंतीलगतच ही जनावरे उभी राहतात, तेथेही घाण करतात पण पोलीस प्रशासनही गप्प आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन तरीही कारवाई नाहीयासंदर्भात संतप्त नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांनी हा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन दिले पण अद्याप कारवाई झालीच नाही. महापौरांनी स्वत: या परिसरात येऊन पाहणी करावी आणि या रस्त्यावर थोडा वेळ घालवून दाखवावा, असे आव्हान देत या प्रकरणी नागरिकांची मागणी लक्षात घेत त्वरित या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी चंद्रशेखर तुमसरे आणि नागरिकांनी केली आहे.