शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

चिखली प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’

By admin | Updated: April 28, 2016 03:03 IST

चिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी ....

११०० एकरात पोहोचले नाही पाणी : ४३ कोटींचा खर्च पाण्यातंंविजय कडू काटोलचिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी असताना केवळ ७०० एकरातच प्रकल्पाचे पाणी पोहोचले. परिणामी हा प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’ झाल्याचे वास्तवचित्र असून शेतकऱ्यांमध्ये मात्र कमालीचा संताप आहे. चिखली नाला प्रकल्पाला १९९३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पाद्वारे चिखली, येनवा, मोहखेडी, कलंभा, येरला (धोटे), वंडली (सावरकर) अशा सहा गावांच्या परिसरातील १८०० एकरमध्ये सिंचन होणे अपेक्षित होते. परंतु कालव्याची कामे पूर्ण करण्यात न आल्याने आजमितीस केवळ ७०० एकर ओलीत होत आहे. या प्रकल्पाच्या अपूर्ण कालव्याचा फटका वंडली, मसलीसह इतर गावांना बसला आहे. या प्रकल्पाची लांबी १५९२ मीटर आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रकल्प पूर्ण भरतो. मात्र हिवाळ्यानंतर ओलितासाठी नियोजन नसल्याने या प्रकल्पातील पाण्याचा पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. चिखली प्रकल्पातील पाणी केवळ सिंचनासाठी अपेक्षित होते. मात्र नरखेडसह सावरगाव येथे पाणीटंचाई असल्याने विशेष बाब म्हणून १५ वर्षांपूर्वी या धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले. चिखली ते नरखेड हे अंतर २२ किमी असून सद्यस्थितीत येथूनच नरखेडला पाणीपुरवठा होत आहे. पाईपलाईनमुळे पाणी वितरणात अनेक अडचणी निर्माण होतात. दुसरीकडे, नरखेडपासून अवघ्या पाच किमी अंतरावर पिंपळगाव (वखाजी) येथे धरण बांधण्यात आले. त्या धरणापर्यंत जुनी पाईपलाईन आहे. चिखली धरणाऐवजी त्या धरणावरून नरखेडला पाणीपुरवठा केल्यास पाणी वितरणाचा खर्च बऱ्याच अंशी कमी होईल. सोबतच चिखली प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळून सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होईल. परंतु त्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. प्रकल्पाचा फायदा काय?प्रकल्पाचा आराखडा तयार करताना रेल्वे मार्ग पार करून कालवा न्यायचा आहे, हे माहिती होते. असे असताना त्याचा विचार न करता काम सुरू झाले. मात्र त्यानंतर रेल्वे क्रॉसिंगपुढे साडेनऊ किमी अंतराच्या कालव्याचे कामच पूर्ण झाले नाही. त्यामुळे आजही १८०० पैकी ११०० एकर जमीन सिंचनापासून वंचित आहे. धरण पूर्ण होऊन शेतकऱ्यांना ओलितासाठीच पाणी मिळत नसेल तर या धरणाचा फायदा काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली जात आहे. कालव्याच्या कामात अडथळाबुडीत क्षेत्रात येणाऱ्या इसापूरचे पुनर्वसन करून तेथे धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र मुख्य कालव्याचे काम करताना या कामात काटोल-नरखेड रेल्वे मार्ग येत असल्याने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत काम करण्यात ठरले. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे भिष्णूरपर्यंत या धरणाचे पाणी पोहोचविण्यासाठी लघु मध्यम प्रकल्प विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे निधीची मागणी केली. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे कालवा नेण्यासाठी रेल्वे विभागाकडे दोन कोटी रुपये भरायचे आहे. त्याची मागणी केली असता मध्यम प्रकल्प विभागाने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत कालव्याचे काम का पूर्ण झाले नाही, अशी विचारणा केली हे विशेष!