शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चिखली प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’

By admin | Updated: April 28, 2016 03:03 IST

चिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी ....

११०० एकरात पोहोचले नाही पाणी : ४३ कोटींचा खर्च पाण्यातंंविजय कडू काटोलचिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी असताना केवळ ७०० एकरातच प्रकल्पाचे पाणी पोहोचले. परिणामी हा प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’ झाल्याचे वास्तवचित्र असून शेतकऱ्यांमध्ये मात्र कमालीचा संताप आहे. चिखली नाला प्रकल्पाला १९९३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पाद्वारे चिखली, येनवा, मोहखेडी, कलंभा, येरला (धोटे), वंडली (सावरकर) अशा सहा गावांच्या परिसरातील १८०० एकरमध्ये सिंचन होणे अपेक्षित होते. परंतु कालव्याची कामे पूर्ण करण्यात न आल्याने आजमितीस केवळ ७०० एकर ओलीत होत आहे. या प्रकल्पाच्या अपूर्ण कालव्याचा फटका वंडली, मसलीसह इतर गावांना बसला आहे. या प्रकल्पाची लांबी १५९२ मीटर आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रकल्प पूर्ण भरतो. मात्र हिवाळ्यानंतर ओलितासाठी नियोजन नसल्याने या प्रकल्पातील पाण्याचा पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. चिखली प्रकल्पातील पाणी केवळ सिंचनासाठी अपेक्षित होते. मात्र नरखेडसह सावरगाव येथे पाणीटंचाई असल्याने विशेष बाब म्हणून १५ वर्षांपूर्वी या धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले. चिखली ते नरखेड हे अंतर २२ किमी असून सद्यस्थितीत येथूनच नरखेडला पाणीपुरवठा होत आहे. पाईपलाईनमुळे पाणी वितरणात अनेक अडचणी निर्माण होतात. दुसरीकडे, नरखेडपासून अवघ्या पाच किमी अंतरावर पिंपळगाव (वखाजी) येथे धरण बांधण्यात आले. त्या धरणापर्यंत जुनी पाईपलाईन आहे. चिखली धरणाऐवजी त्या धरणावरून नरखेडला पाणीपुरवठा केल्यास पाणी वितरणाचा खर्च बऱ्याच अंशी कमी होईल. सोबतच चिखली प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळून सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होईल. परंतु त्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. प्रकल्पाचा फायदा काय?प्रकल्पाचा आराखडा तयार करताना रेल्वे मार्ग पार करून कालवा न्यायचा आहे, हे माहिती होते. असे असताना त्याचा विचार न करता काम सुरू झाले. मात्र त्यानंतर रेल्वे क्रॉसिंगपुढे साडेनऊ किमी अंतराच्या कालव्याचे कामच पूर्ण झाले नाही. त्यामुळे आजही १८०० पैकी ११०० एकर जमीन सिंचनापासून वंचित आहे. धरण पूर्ण होऊन शेतकऱ्यांना ओलितासाठीच पाणी मिळत नसेल तर या धरणाचा फायदा काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली जात आहे. कालव्याच्या कामात अडथळाबुडीत क्षेत्रात येणाऱ्या इसापूरचे पुनर्वसन करून तेथे धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र मुख्य कालव्याचे काम करताना या कामात काटोल-नरखेड रेल्वे मार्ग येत असल्याने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत काम करण्यात ठरले. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे भिष्णूरपर्यंत या धरणाचे पाणी पोहोचविण्यासाठी लघु मध्यम प्रकल्प विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे निधीची मागणी केली. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे कालवा नेण्यासाठी रेल्वे विभागाकडे दोन कोटी रुपये भरायचे आहे. त्याची मागणी केली असता मध्यम प्रकल्प विभागाने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत कालव्याचे काम का पूर्ण झाले नाही, अशी विचारणा केली हे विशेष!