शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

चिखली प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’

By admin | Updated: April 28, 2016 03:03 IST

चिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी ....

११०० एकरात पोहोचले नाही पाणी : ४३ कोटींचा खर्च पाण्यातंंविजय कडू काटोलचिखली नाल्यावर ४३ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाची सिंचनक्षमता १८०० एकर एवढी असताना केवळ ७०० एकरातच प्रकल्पाचे पाणी पोहोचले. परिणामी हा प्रकल्प सिंचनामध्ये ‘फेल’ झाल्याचे वास्तवचित्र असून शेतकऱ्यांमध्ये मात्र कमालीचा संताप आहे. चिखली नाला प्रकल्पाला १९९३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पाद्वारे चिखली, येनवा, मोहखेडी, कलंभा, येरला (धोटे), वंडली (सावरकर) अशा सहा गावांच्या परिसरातील १८०० एकरमध्ये सिंचन होणे अपेक्षित होते. परंतु कालव्याची कामे पूर्ण करण्यात न आल्याने आजमितीस केवळ ७०० एकर ओलीत होत आहे. या प्रकल्पाच्या अपूर्ण कालव्याचा फटका वंडली, मसलीसह इतर गावांना बसला आहे. या प्रकल्पाची लांबी १५९२ मीटर आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रकल्प पूर्ण भरतो. मात्र हिवाळ्यानंतर ओलितासाठी नियोजन नसल्याने या प्रकल्पातील पाण्याचा पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. चिखली प्रकल्पातील पाणी केवळ सिंचनासाठी अपेक्षित होते. मात्र नरखेडसह सावरगाव येथे पाणीटंचाई असल्याने विशेष बाब म्हणून १५ वर्षांपूर्वी या धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले. चिखली ते नरखेड हे अंतर २२ किमी असून सद्यस्थितीत येथूनच नरखेडला पाणीपुरवठा होत आहे. पाईपलाईनमुळे पाणी वितरणात अनेक अडचणी निर्माण होतात. दुसरीकडे, नरखेडपासून अवघ्या पाच किमी अंतरावर पिंपळगाव (वखाजी) येथे धरण बांधण्यात आले. त्या धरणापर्यंत जुनी पाईपलाईन आहे. चिखली धरणाऐवजी त्या धरणावरून नरखेडला पाणीपुरवठा केल्यास पाणी वितरणाचा खर्च बऱ्याच अंशी कमी होईल. सोबतच चिखली प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळून सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होईल. परंतु त्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. प्रकल्पाचा फायदा काय?प्रकल्पाचा आराखडा तयार करताना रेल्वे मार्ग पार करून कालवा न्यायचा आहे, हे माहिती होते. असे असताना त्याचा विचार न करता काम सुरू झाले. मात्र त्यानंतर रेल्वे क्रॉसिंगपुढे साडेनऊ किमी अंतराच्या कालव्याचे कामच पूर्ण झाले नाही. त्यामुळे आजही १८०० पैकी ११०० एकर जमीन सिंचनापासून वंचित आहे. धरण पूर्ण होऊन शेतकऱ्यांना ओलितासाठीच पाणी मिळत नसेल तर या धरणाचा फायदा काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली जात आहे. कालव्याच्या कामात अडथळाबुडीत क्षेत्रात येणाऱ्या इसापूरचे पुनर्वसन करून तेथे धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र मुख्य कालव्याचे काम करताना या कामात काटोल-नरखेड रेल्वे मार्ग येत असल्याने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत काम करण्यात ठरले. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे भिष्णूरपर्यंत या धरणाचे पाणी पोहोचविण्यासाठी लघु मध्यम प्रकल्प विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे निधीची मागणी केली. रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे कालवा नेण्यासाठी रेल्वे विभागाकडे दोन कोटी रुपये भरायचे आहे. त्याची मागणी केली असता मध्यम प्रकल्प विभागाने रेल्वे क्रॉसिंगपर्यंत कालव्याचे काम का पूर्ण झाले नाही, अशी विचारणा केली हे विशेष!