शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

रासायनिक खतावर अमृतपाण्याचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:53 IST

कमी मेहनतीत भरघोस उत्पन्न घेण्याच्या मोहात शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करून शेतजमीन प्रदूषित करतो आहे.

बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन : जमिनीबरोबर पिकांचीही गुणवत्ता सुधारली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कमी मेहनतीत भरघोस उत्पन्न घेण्याच्या मोहात शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करून शेतजमीन प्रदूषित करतो आहे. हे संशोधनासह बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांनी रासायनिक खत व पारंपरिक अमृतपाणी या दोन्हीच्या माध्यमातून शेती केली. सात महिन्याच्या प्रयोगाअंती आलेल्या निष्कर्षातून रासायनिक खतांच्या तुलनेत अमृतपाण्याची गुणवत्ता कितीतरी पटीने सरस ठरली. निव्वळ पीकच नाही, तर जमिनीची गुणवत्ता देखील सुधारली. बायोटेक्नॉलॉजीच्या अंतिम वर्षाला शिकणारे राहुल सातपुते व आदित्य शिंगोटे या विद्यार्थ्यांनी ‘बायोवेस्ट टू बायोफर्टिलायझर’ या विषयावर संशोधन केले. यासाठी त्यांना नीरी व गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांचे सहकार्य मिळाले. देवलापारला या विद्यार्थ्यांनी एक एकर शेतीत गहू पेरला. त्यात त्यांनी २४ प्लॉट पाडले. यात १८ प्लॉटमध्ये अमृतपाणी दिले. ३ प्लॉटमध्ये कुठलीच ट्रीटमेंट दिली नाही. तर ३ प्लॉटमध्ये रासायनिक खतांचा वापर केला. गव्हाची पेरणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षण केले. दर महिन्याला ते अमृतपाण्याच्या प्लॉटमधील पिकांना अमृतपाणी द्यायचे. तर रासायनिक खतांच्या प्लॉटमध्ये रासायनिक खत द्यायचे. पेरणी केल्यानंतर ते पीक हातात येईपर्यंत लागलेल्या सात महिन्यांच्या कार्यकाळात सुद्धा मातीचे परीक्षण केले. नीरीमध्ये त्यांनी सीएचएनएस अ‍ॅनालायझर, जेलदाल अ‍ॅप्रेटस, फ्लेज फोटोमिटर आणि आसीपी-ओईएस या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील उपलब्ध नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम आणि मेटल्सचे निरीक्षण केले. यात निरीक्षणात रासायनिक खतांच्या तुलनेत अमृतपाण्यामुळे जमिनीची गुणवत्ता वाढत गेली. सात महिन्यानंतर पीक हातात आल्यानंतर पिकांचे सुद्धा निरीक्षण केले. विशेष म्हणजे अमृतपाणी दिलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव आढळला नाही. बायोवेस्ट कमी आले. दाण्याचे न्युट्रीशन मूल्य व वजनसुद्धा वाढले.