शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतावर अमृतपाण्याचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:53 IST

कमी मेहनतीत भरघोस उत्पन्न घेण्याच्या मोहात शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करून शेतजमीन प्रदूषित करतो आहे.

बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन : जमिनीबरोबर पिकांचीही गुणवत्ता सुधारली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कमी मेहनतीत भरघोस उत्पन्न घेण्याच्या मोहात शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करून शेतजमीन प्रदूषित करतो आहे. हे संशोधनासह बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांनी रासायनिक खत व पारंपरिक अमृतपाणी या दोन्हीच्या माध्यमातून शेती केली. सात महिन्याच्या प्रयोगाअंती आलेल्या निष्कर्षातून रासायनिक खतांच्या तुलनेत अमृतपाण्याची गुणवत्ता कितीतरी पटीने सरस ठरली. निव्वळ पीकच नाही, तर जमिनीची गुणवत्ता देखील सुधारली. बायोटेक्नॉलॉजीच्या अंतिम वर्षाला शिकणारे राहुल सातपुते व आदित्य शिंगोटे या विद्यार्थ्यांनी ‘बायोवेस्ट टू बायोफर्टिलायझर’ या विषयावर संशोधन केले. यासाठी त्यांना नीरी व गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांचे सहकार्य मिळाले. देवलापारला या विद्यार्थ्यांनी एक एकर शेतीत गहू पेरला. त्यात त्यांनी २४ प्लॉट पाडले. यात १८ प्लॉटमध्ये अमृतपाणी दिले. ३ प्लॉटमध्ये कुठलीच ट्रीटमेंट दिली नाही. तर ३ प्लॉटमध्ये रासायनिक खतांचा वापर केला. गव्हाची पेरणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षण केले. दर महिन्याला ते अमृतपाण्याच्या प्लॉटमधील पिकांना अमृतपाणी द्यायचे. तर रासायनिक खतांच्या प्लॉटमध्ये रासायनिक खत द्यायचे. पेरणी केल्यानंतर ते पीक हातात येईपर्यंत लागलेल्या सात महिन्यांच्या कार्यकाळात सुद्धा मातीचे परीक्षण केले. नीरीमध्ये त्यांनी सीएचएनएस अ‍ॅनालायझर, जेलदाल अ‍ॅप्रेटस, फ्लेज फोटोमिटर आणि आसीपी-ओईएस या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील उपलब्ध नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम आणि मेटल्सचे निरीक्षण केले. यात निरीक्षणात रासायनिक खतांच्या तुलनेत अमृतपाण्यामुळे जमिनीची गुणवत्ता वाढत गेली. सात महिन्यानंतर पीक हातात आल्यानंतर पिकांचे सुद्धा निरीक्षण केले. विशेष म्हणजे अमृतपाणी दिलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव आढळला नाही. बायोवेस्ट कमी आले. दाण्याचे न्युट्रीशन मूल्य व वजनसुद्धा वाढले.