शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

‘सत्रापूर’ पॅटर्न सिंचन प्रकल्पांसाठी वरदान!

By admin | Updated: September 5, 2015 03:11 IST

जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी सिंचन प्रकल्पासाठी जमीन देत नाहीत.

खासगी वाटाघाटीने सुटला भूसंपादनाचा प्रश्न : १४ गावातील शेतकऱ्यांनी दिली प्रकल्पाला जमीन आनंद डेकाटे  नागपूर जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी सिंचन प्रकल्पासाठी जमीन देत नाहीत. परिणामी प्रकल्प रखडतात. प्रकल्पाचा खर्च वाढत जातो आणि सिंचनाची सुविधाही उपलब्ध होत नाही. राज्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पाची अशीच स्थिती आहे. शेतकऱ्यांना शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळाला तर तो आनंदाने आपली शेतजमीन सरकारकडे सुपूर्द करतो. याचे मूर्तिमंत उदाहरण नागपूर जिल्ह्यातील सत्रापूर उपसा सिंचन प्रकल्पाबाबत पाहायला मिळाले. या प्रकल्पासाठी गेल्या काही वर्षांपासून रखडलेला भूसंपादनाचा प्रश्न शेतकरी व जिल्हा प्रशासनाच्या खासगी वाटाघाटीतून सुटला. १४ गावातील जवळपास १८०० शेतकऱ्यांनी आपली जमीन उत्स्फूर्तपणे प्रकल्पासाठी दिली. आता प्रकल्प मार्गी लागला आहे. भूसंपादनाचा हा सत्रापूर पॅटर्न राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी वरदान ठरणार आहे. सत्रापूर उपसा सिंचन प्रकल्प हा पेंच नदीवर नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंच नवेगाव खैरी जलाशयाच्या बुडीत क्षेत्रातील डाव्या बाजूस प्रस्तावित आहे. या जलाशयातील उपलब्ध पाणी साठ्यातील १६.५८५ दलघमी पाणी उपसा पद्धतीने उचल करून १२०० मिमी व्यासाचे उर्ध्वनलिकेच्या माध्यमातून सत्रापूर गावाजवळीत वितरण कुंडातून पुढे डावा व उजवा कालवा प्रणालीद्वारे सिंचन प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील २६ गावातील २६२० हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे. अप्रत्यक्ष सिंचन त्याच्या दुप्पट आहे. परंतु सध्या केवळ ५०० हेक्टर क्षेत्रच प्रत्यक्ष सिंचनाखाली आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत जवळपास बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. परंतु कालव्यांची कामे रखडली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचतच नव्हते. कालव्यांच्या कामासाठी ४४.८२ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. पारशिवनी तालुक्यातील चारगाव, महाराजपूर, सोनेघाट, नवेगाव (रिठी), खुमारी, कवडक, बोरडा, भिल्लेवाडा, हिवरा (बेंडे), नहाबी, मुकनापूर, देवळी, भोंदेवाडा, कांद्री या १४ गावातील १८०० शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी अधिग्रहित करावयाच्या होत्या. परंतु तुटपुंजा मोबदला मिळत असल्याने शेतकरी आपली जमीन द्यायला तयार नव्हते. त्यामुळे हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला होता. जमिनीमुळे सिंचन प्रकल्प रखडू नये म्हणून शासनाने पुढाकार घेत खासगी वाटाघाटीतून प्रकल्पासाठी जमीन घेण्याचा निर्णय घेतला असून तसा शासन आदेशही जारी केला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास बाजारभावापेक्षा चारपट अधिक भाव देण्याची तरतूद आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुढाकार घेतला. या गावातील संबंधित शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून खासगी वाटाघाटीसाठी प्रस्ताव दिला. शेतकऱ्यांनीसुद्धा वाढीव मोबदला मिळत असल्याने त्यांनी या प्रस्तावास प्रतिसाद दिला. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात आली असून ७ कोटी ८९ लाख ३ हजार १४६ रुपयांचा मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या या जमिनी विकत घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सत्रापूर प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.