शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आॅटोचालकाची ३५० लोकांना रक्ताची मदत

By admin | Updated: June 14, 2016 02:23 IST

त्याची पत्नी अडचणीत होती. तीन रक्त पिशव्यांची तत्काळ सोय करण्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याचे हातपायच गळाले होते.

 घनश्याम चकोलेंचा आदर्श : ग्रामीण भागात उभी केली रक्तदानाची चळवळसुमेध वाघमारे ल्ल नागपूरत्याची पत्नी अडचणीत होती. तीन रक्त पिशव्यांची तत्काळ सोय करण्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याचे हातपायच गळाले होते. रक्तदानाविषयी काल्पनिक भीती त्याच्या मनात होती. स्वत: रक्त न देता मित्रांची मदत घेतली. मित्रांनी कुठलेही आढेवेढे न घेता सहज रक्त दिले. पत्नी वाचली. एक गोंडस बाळ त्याच्या कुशीत होते. मात्र डोक्यात काहूर माजला होता. ते रक्त देऊ शकतात, मी का नाही?. याच प्रश्नातून त्याने नंतर रक्तदानाची चळवळ उभी केली. त्याने आपल्या आॅटोवर स्वत:चा मोबाईल नंबर लिहून रक्ताची गरज असणाऱ्यांना संपर्क साधण्याचे थेट आवाहनच केले. आतापर्यंत ३५० लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याने रक्ताची मदत केली.माणुसकीच्या भूमिकेतून मोठे कर्तव्य पार पाडणाऱ्या या आॅटोचालकाचे नाव घनश्याम चकोले. कामठी अजनी येथील गोदा या गावात तो राहतो. ३८ वर्षीय घनश्याम प्रवाशांना घेऊन नेहमीच नागपूर-कामठी रहदारी करीत असतो. बर्डीवर प्रवाशांच्या प्रतीक्षेत असताना त्याला बोलते केल्यावर त्याने वरील आपबिती सांगितली. जे रुग्ण रक्ताविना तडफडत असतात, त्यावेळी स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान करणारा रक्तदाता हा देवदूत नसतो तर प्रत्यक्ष देवच असतो. रक्तसंक्रमणाच्या, रक्तघटक वेगळे करण्याच्या अत्यंत आधुनिक पद्धती विकसित झाल्या. मात्र, विज्ञानाला मानवी रक्ताचा पर्याय शोधता आला नाही. आजही रक्तदानाला पर्याय नाही. म्हणूनच घनश्यामसारखे रक्तदाते ‘हिरो’ ठरतात.संकोच नको म्हणून स्वत:ला ‘मामा’ संबोधलेघनश्याम म्हणाला, त्या घटनेपासून रक्ताच्या अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदत पोहचविली. स्वत: १९ वेळा रक्तदान केले. ग्रामीण भागात रक्तदानाची चळवळ उभी करण्यासाठी जीवन तरंग बहुउद्देशीय सेवा संस्था स्थापन केली. रक्तदान शिबिरे घेणे सुरू केले. आतापर्यंत २२ शिबिरे घेतली. यात मिळालेले रक्त शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रक्तपेढ्यांना दिले. रक्ताची गरज असणाऱ्यांना मदत पोहचावी म्हणून आॅटोवर मोबाईल क्रमांक लिहिला. मदत मागताना कुणाला अडचणीचे जाऊ नये म्हणून स्वत:ला ‘मामा’ संबोधले. कुणाकडूनही कशाची मदतीची अपेक्षा न करता हे कार्य सुरू आहे. परंतु आजही रक्तदानाबद्दल विशेषत: ग्रामीण जनतेत काल्पनिक भीती आहे. रक्तदान केल्याने एखादा आजार अथवा शारीरिक थकवा येऊन आपण आजारी पडू अशा भ्रामक कल्पना लोक बाळगून आहेत. दिवसेंदिवस रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. जनतेने स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास कोणत्याही रुग्णास ‘रिप्लेसमेंट’ची आवश्यकता भासणार नाही. आपण दिलेल्या रक्ताने एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचणार हा अनुभव मनाला सुखावणार आहे. याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहनही त्याने केले.