शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
6
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
9
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
10
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
11
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
12
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
13
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
14
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
15
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
16
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
17
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
19
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
20
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

आॅटोचालकाची ३५० लोकांना रक्ताची मदत

By admin | Updated: June 14, 2016 02:23 IST

त्याची पत्नी अडचणीत होती. तीन रक्त पिशव्यांची तत्काळ सोय करण्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याचे हातपायच गळाले होते.

 घनश्याम चकोलेंचा आदर्श : ग्रामीण भागात उभी केली रक्तदानाची चळवळसुमेध वाघमारे ल्ल नागपूरत्याची पत्नी अडचणीत होती. तीन रक्त पिशव्यांची तत्काळ सोय करण्याचे डॉक्टरांनी सांगताच त्याचे हातपायच गळाले होते. रक्तदानाविषयी काल्पनिक भीती त्याच्या मनात होती. स्वत: रक्त न देता मित्रांची मदत घेतली. मित्रांनी कुठलेही आढेवेढे न घेता सहज रक्त दिले. पत्नी वाचली. एक गोंडस बाळ त्याच्या कुशीत होते. मात्र डोक्यात काहूर माजला होता. ते रक्त देऊ शकतात, मी का नाही?. याच प्रश्नातून त्याने नंतर रक्तदानाची चळवळ उभी केली. त्याने आपल्या आॅटोवर स्वत:चा मोबाईल नंबर लिहून रक्ताची गरज असणाऱ्यांना संपर्क साधण्याचे थेट आवाहनच केले. आतापर्यंत ३५० लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याने रक्ताची मदत केली.माणुसकीच्या भूमिकेतून मोठे कर्तव्य पार पाडणाऱ्या या आॅटोचालकाचे नाव घनश्याम चकोले. कामठी अजनी येथील गोदा या गावात तो राहतो. ३८ वर्षीय घनश्याम प्रवाशांना घेऊन नेहमीच नागपूर-कामठी रहदारी करीत असतो. बर्डीवर प्रवाशांच्या प्रतीक्षेत असताना त्याला बोलते केल्यावर त्याने वरील आपबिती सांगितली. जे रुग्ण रक्ताविना तडफडत असतात, त्यावेळी स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान करणारा रक्तदाता हा देवदूत नसतो तर प्रत्यक्ष देवच असतो. रक्तसंक्रमणाच्या, रक्तघटक वेगळे करण्याच्या अत्यंत आधुनिक पद्धती विकसित झाल्या. मात्र, विज्ञानाला मानवी रक्ताचा पर्याय शोधता आला नाही. आजही रक्तदानाला पर्याय नाही. म्हणूनच घनश्यामसारखे रक्तदाते ‘हिरो’ ठरतात.संकोच नको म्हणून स्वत:ला ‘मामा’ संबोधलेघनश्याम म्हणाला, त्या घटनेपासून रक्ताच्या अडचणीत सापडलेल्या प्रत्येकाला मदत पोहचविली. स्वत: १९ वेळा रक्तदान केले. ग्रामीण भागात रक्तदानाची चळवळ उभी करण्यासाठी जीवन तरंग बहुउद्देशीय सेवा संस्था स्थापन केली. रक्तदान शिबिरे घेणे सुरू केले. आतापर्यंत २२ शिबिरे घेतली. यात मिळालेले रक्त शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रक्तपेढ्यांना दिले. रक्ताची गरज असणाऱ्यांना मदत पोहचावी म्हणून आॅटोवर मोबाईल क्रमांक लिहिला. मदत मागताना कुणाला अडचणीचे जाऊ नये म्हणून स्वत:ला ‘मामा’ संबोधले. कुणाकडूनही कशाची मदतीची अपेक्षा न करता हे कार्य सुरू आहे. परंतु आजही रक्तदानाबद्दल विशेषत: ग्रामीण जनतेत काल्पनिक भीती आहे. रक्तदान केल्याने एखादा आजार अथवा शारीरिक थकवा येऊन आपण आजारी पडू अशा भ्रामक कल्पना लोक बाळगून आहेत. दिवसेंदिवस रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे. जनतेने स्वत:हून पुढाकार घेऊन रक्तदान केल्यास कोणत्याही रुग्णास ‘रिप्लेसमेंट’ची आवश्यकता भासणार नाही. आपण दिलेल्या रक्ताने एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचणार हा अनुभव मनाला सुखावणार आहे. याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहनही त्याने केले.