शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

पुण्या मुंबईतच तज्ज्ञ आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या आयोजन, नियोजन व उपाययोजनेसाठी ११ सदस्यीय समितीचे गठन केले. या ...

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या आयोजन, नियोजन व उपाययोजनेसाठी ११ सदस्यीय समितीचे गठन केले. या समितीत निवडण्यात आलेल्या सदस्यांपैकी १० सदस्य पुण्यातील व एक सदस्य मुंबईतील आहे. परीक्षा ही राज्यभर होत आहे. पुणे आणि मुंबई सारखी परिस्थिती सर्वच जिल्ह्यातील नाही. त्यामुळे पुण्यामुंबईतील सदस्य राज्याचा विचार करतील का?, पुणे मुंबईतच तज्ज्ञ सदस्य आहेत का, असे खोचक सवाल विदर्भातील शिक्षकांकडून राज्य शिक्षण मंडळाला विचारले जात आहे.

रोष व्यक्त करणाऱ्या शिक्षकांचे म्हणणे आहे की समानतेचा संदेश देणाऱ्या शिक्षण विभागाने देखील विदर्भ व मराठवाड्यातील एकाही अधिकाऱ्याला परीक्षेच्या नियोजन सल्लागार समितीत स्थान न देऊन विदर्भातील विद्वान व कर्तबगार अधिकाऱ्यांना डावलून विषमतेचा संदेश दिला आहे. विदर्भावर नेहमीच आर्थिक, राजकीय व विकासात्मक दृष्टिकोनातून अन्याय होत आलेला आहे. तोच प्रकार शिक्षण विभागाने केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही परीक्षांचे आयोजन व नियोजनाबद्दल महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये अनेक संभ्रम आहेत, अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागामार्फत त्यासाठी आयोजन, नियोजन व उपाययोजना निश्चितीसाठी ही सल्लागार समिती गठित केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा मुंबई-पुणे प्रमाणेच संपूर्ण राज्यात आज वाढतच आहे. अशा परिस्थितीमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांच्या नियोजनाकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्याकरिता परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात याव्यात याचा सल्ला समिती देणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यानुसार उपाययोजना करण्याची शिफारसी समिती देणार आहे. परंतु दुर्दैवाची बाब अशी की या संपूर्ण अकरा सदस्यांमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील एकही शिक्षण विभागातील अधिकारी घेण्यात आलेला नाही. विदर्भातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांंच्या पात्रतेवर व कार्यशैलीवर मंडळ साशंक आहे का? असे तर्कवितर्क आता विदर्भातील शिक्षकांकडून लावले जात आहे.

- परीक्षांच्या काळात विदर्भ चांगलाच तापतो. कोरोनामुळे विदर्भातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. विदर्भात सोयीसुविधा अभाव आहे. सल्लागार समितीने सल्ले देताना गडचिरोली व गोंदियासारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासींचा व एक वर्षापासून शिक्षणाच्या प्रवाहापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांचा नक्की विचार करावा हीच अपेक्षा आहे.

-अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी