शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

आरोपी केवळ उद्देशामुळे दोषी ठरत नाही!

By admin | Updated: July 9, 2014 00:55 IST

आरोपी केवळ उद्देशामुळे दोषी ठरत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. आरोपीला दोषी ठरविण्यासाठी केवळ हत्येचा उद्देश पुरेसा नसून सरकारी

हायकोर्टाचा खुलासा : पुरावे सिद्ध करणे आवश्यकराकेश घानोडे -नागपूर आरोपी केवळ उद्देशामुळे दोषी ठरत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. आरोपीला दोषी ठरविण्यासाठी केवळ हत्येचा उद्देश पुरेसा नसून सरकारी पक्षाने अन्य परिस्थितीजन्य पुरावेही सिद्ध करणे आवश्यक असल्याचा खुलासा न्यायालयाने केला आहे.अमरावती जिल्ह्यातील या प्रकरणात आरोपीच्या पत्नीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. आरोपीचा तिच्या चारित्र्यावर संशय होता. ती एकदा गैरपुरुषासोबत दिसून आली होती. यामुळे आरोपीने तिची हत्या केल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. वैद्यकीय अधिकाऱ्याने तिचा मृत्यू पाण्यात बुडण्यापूर्वी झाल्याचा अहवाल दिला होता. विहिरीत पडताना लोखंडी अँगल किंवा मोटरपंपाचा लोखंडी ढाचा लागून तिचा पाण्यात कोसळण्यापूर्वीच मृत्यू होऊ शकतो, असे मतही वैद्यकीय अधिकाऱ्याने व्यक्त केले होते. घटना पुढे आली तेव्हा एका महिलेने आरोपी व त्याच्या पत्नीला विहिरीत एकत्र पाहिले होते. सरकारी पक्षाने या महिलेचे बयान घेतले नाही. यामुळे दोघेही कोणत्या परिस्थितीत विहिरीच्या आत गेले ही माहिती पुढे आली नाही. सरकारी पक्ष उद्देश वगळता आरोपीला दोषी सिद्ध ठरविता येईल असे कोणतेही पुरावे सिद्ध करू शकला नाही. या बाबी लक्षात घेता न्यायालयाने वरील खुलासा करून आरोपीला निर्दोष सोडण्याचे आदेश दिलेत.रामकृष्ण रामरतन धोत्रे (२९) असे आरोपीचे नाव असून तो दिया, ता. धारणी येथील रहिवासी आहे. मृताचे नाव ललिता आहे. त्यांचे २००१ मध्ये लग्न झाले होते. आरोपी खासगी ट्रकवर क्लिनर म्हणून कार्य करीत होता. खटल्यातील माहितीनुसार, लग्नाच्या काही महिन्यांनंतर आरोपी ललिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाईट वागायला लागला. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी ललिताने वडील मधुकर उमरकरला तिच्या जीवाला धोका असल्याचे व माहेरी परत घेऊन जाण्यास सांगितले होते. ४ एप्रिल २००८ रोजी सकाळी ७ च्या सुमारास मधुकरला ललिताचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याचे फोनवरून कळविण्यात आले. यानंतर मधुकरने ७ एप्रिल रोजी धारणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. यावरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, २०१, ४९८-अ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.