शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आरटीओचीच ६५ टक्के वाहने भंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST

सुमेध वाघमारे नागपूर : राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयातीलच (आरटीओ) जवळपास ६५ टक्के वाहने भंगार झाली असताना ती रस्त्यावरून ...

सुमेध वाघमारे

नागपूर : राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयातीलच (आरटीओ) जवळपास ६५ टक्के वाहने भंगार झाली असताना ती रस्त्यावरून धावत आहेत. वाहतूक नियमांच्या अमंलबजावणीची जबाबदारी असलेल्या या विभागाची ही स्थिती म्हणजे, दिव्याखाली अंधाराचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कालबाह्य झालेली ही वाहने वारंवार बिघडत असल्याने दुरूस्तीवर लाखों रुपयांचा खर्च होत आहे. एखाद्या वाहनाकडून अपघात झाल्यावरच शासन याकडे लक्ष देईल का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

नियमानुसार ट्रक व इतर अवजड वाहने जी २ लाखांपेक्षा जास्त किलोमीटर धावल्याचे असेल किंवा १० वर्षे पूर्ण झाले असेल अशा वाहनांचे निर्लेखन (स्क्रॅप) करण्याचा नियम आहे. कार व जीप सारख्या वाहनांसाठी २ लाख ४० हजार किलोमीटर किंवा १० वर्षे पूर्ण आणि मोटार सायकलसाठी ३ लाख किलोमीटर व १० वर्षे पूर्ण झाले असेल अशा वाहनांना निर्लेखन करण्याचे निर्देश आहेत. परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. जो विभाग वाहतूक नियमांचे धोरण ठरवितो, त्याच्या अंमलबजावणीसाठी दंडात्मक कारवाई करतो, त्याच विभागातील बहुसंख्य वाहने भंगार झाली आहेत.

- ८८ वाहनांमधून ५८ वाहने १० वर्षांपेक्षा जास्त जुनी

३१ डिसेंबर २०१८ च्या आरटीओ कार्यालयातील जुन्या वाहनांच्या माहितीनुसार परिवहन आयुक्त कार्यालयासह प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये मिळून १०२ वाहने आहेत. यातील ३ वाहने स्क्रॅब करण्यात आली आहेत तर, ११ वाहने बंद पडली आहेत. उर्वरित ८८ वाहनांमधून ५८ वाहने १० व त्यापेक्षा जास्त वर्षे जुनी आहेत. बहुसंख्य वाहनांनी अडीच लाखांपेक्षा जास्त किलोमीटरचे अंतरही कापले असताना रस्त्यावर धावत आहेत.

-परिवहन आयुक्त कार्यालयातच १३ पैकी ९ वाहने १० वर्षे जुनी

परिवहन आयुक्त कार्यालयातच १३ वाहने आहेत. यातील ९ वाहने १० वर्षांपुढील आहेत. यातील २००६ मधील २, २००७ मधील १ तर २०१० मधील ६ वाहने आहेत. विशेष म्हणजे, आरटीओ कार्यालयांनी स्वत:च्याच वाहनाचे ‘फिटनेस’ चाचणी घेतल्यास अनेक वाहने योग्य नसल्याचे सामोर येईल. वारंवार बिघडणाऱ्या या वाहनांचा दुरूस्तीचा खर्चही वर्षाला कोट्यावधीचा आहे. परंतु कोणीच या विषयी बोलत नाही. आरटीओ कार्यालय नव्या वाहनांचा प्रस्ताव पाठविण्यापुरतेच मर्यादित असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार वाहने नादुरुस्त राहत असल्याने याचा प्रभाव दंडात्मक कारवाईवर होत असल्याचेही चित्र आहे.

-रस्त्यावर असलेली जुनी वाहने

वर्ष वाहने

२००४ २

२००६ ३

२००७ ४

२०१० ४९

-कार्यालयानुसार १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची संख्या

मुंबई (वेस्ट) ४

बोरीवली १

मुंबई (ईस्ट) ५

कल्याण१

रत्नागिरी १

कोल्हापूर५

सातारा२

पुणे१

बारामती१

अकलूज १

नाशिक २

श्रीरामपूर२

मालेगाव१

धुळे१

जळगाव३

औरंगाबाद३

जालना १

बीड १

लातूर १

उस्मानाबाद २

नांदेड३

परभणी२

हिंगोली१

बुलडाणा २

यवतमाळ ३

अकोला १

नागपूर (शहर) २

वर्धा१

चंद्रपूर२

गोंंदिया १

भंडारा १