शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात देशात ३१० बिबट्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:06 IST

निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्याघ्र संवर्धनाकडे जबाबदारीने लक्ष देतानाच इतर प्राण्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष हाेत आहे की ...

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : व्याघ्र संवर्धनाकडे जबाबदारीने लक्ष देतानाच इतर प्राण्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष हाेत आहे की काय, असे म्हणण्याची स्थिती दिसून येत आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण साेसायटी (डब्ल्यूपीएसआय) च्या नुकत्याच आलेल्या बिबट्यांच्या अहवालानुसार धक्कादायक बाब उघड हाेत आहे. यावर्षी गेल्या सहाच महिन्यात देशात ३१० बिबट्यांचे बळी गेले आहेत. आणखी चिंताजनक म्हणजे यात सर्वाधिक ९५ मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत.

दाेनच वर्षांपूर्वी २०१८मध्ये भारतीय वने व पर्यावरण मंत्रालयाने देशात बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढल्याची प्रशंसनीय माहिती मांडली हाेती. म्हणजे २०१४ मध्ये ७,९१० असलेली बिबट्यांची संख्या २०१८मध्ये १२,८५२ वर पाेहोचल्याची ही बातमी हाेती. यामध्ये मध्यप्रदेश व कर्नाटकनंतर १,६९० बिबट्यांसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, या आनंदी बातमीकडे लक्ष देताना देशात व विशेष म्हणजे महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात बिबट्यांच्या मृत्यूत ५७ टक्क्यांची वाढ झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. २०२१मध्ये गेल्या सहा महिन्यात देशाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश ४१, उत्तराखंड ३८, राजस्थान २४ आणि जम्मू काश्मीरमध्ये २० बिबट्यांच्या मृत्यूची नाेंद केली आहे. राज्यात १८० दिवसात ९५ म्हणजे दर दाेन दिवसांनी एका बिबट्याचा मृत्यू असे म्हणावे लागेल. यामध्ये ५१ नैसर्गिक, ३६ अपघाती, तर दाेन बिबट्यांची शिकार झाल्याचे समजते.

२०२१ (६ महिने) ३१० २०२० : ४३५ २०१९ : ४९४

महाराष्ट्रात १० वर्षात मृत्युचा वाढता आलेख

वर्ष मृत्यू नैसर्गिक अपघाती

२०१० ३०

२०११ ३४

२०१२ ४३

२०१३ ३६

२०१४ ४१

२०१५ ४६

२०१६ ८९ ५३ २९ (७ शिकार)

२०१७ ८६ ५५ २१ (९ शिकार)

२०१८ ८८ ५४ २७

२०१९ ११० ३५

२०२० १७२ ८० ६४

अपघाती मृत्यू वाढले

गेल्या काही वर्षात प्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बिबट्यांच्या बाबतीत २०१८पासून हा आकडा वाढलेला दिसताे. रस्ते व रेल्वे अपघात, खुल्या विहिरीत पडणे आणि श्वानांच्या हल्ल्यात मारले जाण्याचे कारणे आहेत. २०१८मध्ये २७, २०१९मध्ये ३५, तर २०२०मध्ये ६४ बिबट्यांनी अपघातात जीव गमावला. याशिवाय प्राण्यांचे अधिवास नष्ट हाेणे, मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक स्रोतांवर वाढलेला दबाव महत्त्वाची कारणे आहेत. गेल्या वर्षी रस्ते रुंदीकरणाची १५,००० किमीची कामे देशात झाली.

गेल्या सहा महिन्यात १५००० किलाेमीटरचे रस्ते रुंदीकरण झाले. जंगलातही रस्त्यांचे नेटवर्क प्रचंड वाढले आहे. छत्तीसगड ते पांढरकवडा रस्त्याचे उदाहरण घेता येईल. त्यामुळे जंगलातील गावांचेही शहरीकरण झाले. अतिक्रमण प्रचंड वाढले आहे. जंगलाचे क्षेत्र घटल्याने प्राण्यांना जागाच उरली नाही. शिवाय प्राणी पकडण्यासाठी सापळे रचणे, इलेक्ट्रीफिकेशन करणे प्राण्यांसाठी धाेकादायक ठरत आहे. बिबट्यांची संख्या वाढली म्हणतात पण तेही भ्रम निर्माण करणारे आहे.

- प्रफुल्ल भांबुरकर, वन्यजीव अभ्यासक