शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

फर्निचरअभावी १५ कोटींचे वसतिगृह कुलूपात

By admin | Updated: June 13, 2016 03:10 IST

मेयोतील मुलांच्या वसतिगृहाच्या समस्यांना घेऊन मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) ताशेरे ओढल्यानंतर नव्या बांधकामाला सुरुवात झाली.

मेयोची अकार्यक्षमता : २० कोटींचा निधी नासुप्रकडे पडूनसुमेध वाघमारे नागपूरमेयोतील मुलांच्या वसतिगृहाच्या समस्यांना घेऊन मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) ताशेरे ओढल्यानंतर नव्या बांधकामाला सुरुवात झाली. यावर १५ कोटीचा निधी खर्च झाला. या पाच मजली वसतिगृहाचे मेयो प्रशासनाकडे हस्तांतरणही झाले. परंतु नऊ महिन्याचा कालावधी होत असताना विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा ताबा देण्यात आलेला नाही. फर्निचर नसल्याचे कारण देत मेयो प्रशासनाने ही इमारत कुलूपात बंद ठेवली आहे. विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) वसतिगृहाचे फर्निचर व महत्त्वाच्या उपकरण खरेदीसाठी मार्च २०१६ मध्ये २० कोटींचा निधी दिला. परंतु मेयो प्रशासनाने हा निधी नागपूर सुधार प्रन्यासकडे (नासुप्र) वळता केला. याला आता तीन महिन्यांचा कालावधी होत आहे. मात्र, या संदर्भात कुठलाही करार झालेला नाही. निधी असताना तो खर्च केला जात नसल्याने मेयो प्रशासनाची अकार्यक्षमता समोर आली आहे. मेयो रुग्णालाचा परिसर ३८.२६ एकर मध्ये पसरलेला आहे. विखुरलेल्या इमारतींमुळे रुग्णालय प्रशासनासोबतच येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत आहे.फर्निचरसाठी दिला साडेसहा कोटींचा प्रस्तावनागपूर : मेयो एमबीबीएसकरिता १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. परंतु या तुलनेत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची सोय नाही. वसतिगृहातील त्रुटींवर दरवर्षी ‘एमसीआय’ बोट ठेवत आले आहे. अखेर याची दखल शासनाने २०१४ मध्ये घेतली. त्यांनी मुलांच्या नव्या वसतिगृहासाठी १५ कोटींचा निधी दिला. प्रस्तावित जागेचे भूमिपूजन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. बांधकाम विभागाने दिलेल्या मुदतीत वसतिगृहाचे बांधकामही पूर्ण केले. दरम्यान ‘डीएमईआर’कडे विविध उपकरणांच्या खरेदीसाठी वर्षभरापासून २६ कोटींचा एक प्रस्ताव प्रलंबित होता. यात वसतिगृहाला लागणाऱ्या फर्निचरसाठी सुमारे साडेसहा कोटींचा प्रस्तावही देण्यात आला. गेल्या हिवाळी अधिवेशनात हा निधी १५ दिवसांत मेयोला उपलब्ध करून देण्याची घोषणा झाली. परंतु मेयो प्रशासनाने २५ मार्चपर्यंत कुठलीच हालचाल केली नाही. असे असतानाही मेयोला त्याच महिन्यात २० कोटींचा निधी मिळाला. परंतु वेळेवर मिळालेला हा निधी नासुप्रकडे वळता केला. तीन महिन्यांचा कालावधी होत असतानाही या निधीला घेऊन नासुप्रसोबत कुठलाही करार झालेला नाही. निधी असतानाही त्याचा वापर होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संदर्भात मेयोचे अधिष्ठाता डॉ. मधुकर परचंड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)