शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

आमचं रहस्य

By admin | Updated: February 15, 2015 02:26 IST

मतदारांर्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुक-चावडीवर चाललेल्या भांडणात, व्हॉट्सअॅपवरच्या तिरकस फॉरवर्ड्समध्ये डोकावण्याची यंत्रणा ‘आप’ने उभी केली.

मतदारांर्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुक-चावडीवर चाललेल्या भांडणात, व्हॉट्सअॅपवरच्या तिरकस फॉरवर्ड्समध्ये डोकावण्याची यंत्रणा ‘आप’ने उभी केली. 
त्याचीच आज ‘सेण्टीमेण्ट अॅनालिसिस’ म्हणून चर्चा होते आहे.
माजिक आंदोलनांच्या बातम्या घेऊन वर्तमानपत्रंच्या, वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही, ‘सोशल मीडिया’च्या मार्गाने ‘मध्यस्थ’   ओलांडता येतात, हे इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनाच्या दिवसांपासून अनुभवाला आलं होतं. अर्थात, तेव्हा आम्ही सगळे नवखेच होतो. आम आदमी पक्षाचं काम सुरू झाल्यावर  आमच्या सोशल मीडिया सेलला आकार आला.
सोशल मीडिया आणि त्यातून होणा:या ‘थेट संवादाची’ ताकद आम्हाला 2क्13 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रथम जाणवली. त्या निवडणुकीतलं यश, अवघ्या 49 दिवसांत आमच्या सरकारनं दिलेला राजीनामा, त्यानंतरची नाराजी आणि लोकसभा निवडणुकीत उडालेला धुव्वा, त्यातून लोकांमध्ये उसळलेली चीड, नाराजी आणि संताप हे सारंच घेऊनच आम्ही नव्या निवडणुकीला सामोरे गेलो.
आमचे कार्यकर्तेही  सोशल मीडियावरचे ‘ट्रेण्ड्स’ आणि ‘ट्रेल्स’ पाहत होते. ‘आप’ल्या विषयी संताप-नाराजी आहे, त्यावर सोशल मीडियात जहरी टीका होते आहे, हे सारं दिसत होतं. या डाटाचा अभ्यास करणारं पहिलं रिसर्च टूल नोव्हेंबर 2क्14 मध्येच आम्ही सुरू केलं.  केवळ  ‘बोलण्याचं’ अगर  ‘माहिती देण्या’चं नव्हे, तर  ‘ऐकण्याचं’ आणि  ‘माहिती मिळवण्याचं’ माध्यम/ साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्याच्या ‘आप’च्या निर्णयाची पहिली परिणती म्हणजे दिल्लीच्या जनतेला सामोरं जाताना अरविंद केजरीवाल यांनी घेतलेली भूमिका- ‘भाई, गलती हो गयी, माफ कर दो, अब की बार ऐसा नहीं करेंगे! 
मतदारांमध्ये आपल्या आधीच्या निर्णयाबद्दल किती संताप आहे, याचं मोजमाप करता येण्याच्या प्रक्रियेतून  विचारपूर्वक तयार झालेली ही पहिली भूमिका. त्यामागोमाग आम्ही ‘सेण्टीमेण्ट अॅनालिसिस’चे सलग प्रयोग केले. दिल्लीचे मतदार सोशल मीडियात  काय बोलतात, त्यांचा राग नेमका कशावर आहे,  तरुण मतदारांचा कल कुठे झुकतो आहे हे सारं आम्हाला  ट्विट्स, फेसबुक अपडेट्स, व्हॉट्सअॅपवरून शेअर होणारे जोक्स, मेसेजेस यावरून कळत होतं!  ‘पॉङिाटिव्ह-वीकली पॉङिाटिव्ह-न्यूट्रल-वीकली निगेटिव्ह-निगेटिव्ह’ अशा चाचणी-पट्टीवर प्रत्येक विषयावरल्या मत-मतांतरांना चाळणी लावली जाऊ लागली. त्यातून मिळणारा तपशील आम्ही नेतृत्वासमोर मांडत गेलो. प्रचाराच्या तोफा सुरू झाल्या तसे आमचे निष्कर्ष बदलू लागले कारण, विविध विषयांवरील मतं-मतांतरं आणि प्राथमिकतांचा लंबक बदलत्या दिशा दाखवत होता; पण त्यातूनच  ‘रिअल टाइम’ तपशील हाती आला. प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक मोहल्लय़ातल्या महत्वाच्या प्रश्नांचा  डाटा आमच्याकडे तयार झाला होता. त्यातून आमचे उमेदवार आणि नेते मतदारांशी थेट त्यांच्या प्रश्नाविषयी बोलू शकले.
 ‘मोनोलॉग’ म्हणजे एकतर्फी संवादाची ‘मन की बात’ संस्कृती रुजत असताना आम्ही उलटय़ा दिशेने चाललो म्हणूनच कदाचित ‘डायलॉग’पर्यंत पोहोचू शकलो. 
- याकाळात आमची हेटाळणीही बरीच झाली!
‘झुग्गीझोपडीवाले कहां इनके फेसबुक पढेंगे? असं म्हणत आम्हाला मोडीत काढणा:यांना अजून हे कळलंच नाही की, आता थेट कनेक्ट साधण्याची ताकद माणसांच्या हातात आली आहे. पन्नास-शंभर रुपयांचे पॅक मारून माणसं ‘कनेक्टेड’ राहण्यासाठी धडपडतात.  दिल्लीत 1.33 कोटी मतदार आहेत. 
त्यांपैकी 1 कोटींपेक्षा अधिक लोकांकडे मोबाइल, व्हॉट्सअॅप होते!
- त्यांच्यार्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुकच्या चावडीवर चाललेल्या भांडणात आणि व्हॉट्सअॅपवरच्या फाजील, तिरकस फॉरवर्ड्समध्येदेखील डोकावण्याची यंत्रणा आम्ही उभी केली. त्याचीच आज ‘सेण्टीमेण्ट अॅनालिसिस’म्हणून चर्चा होते आहे. आमच्या टीमने प्रत्येक मतदारसंघाचा एक वेगळी डेमोग्राफी म्हणून विचार केला. माणसं  कशानं दुखावतात, कशानं सुखावतात, कशाबद्दल त्यांना काय वाटतं याचा अंदाज घेणं आणि आदर करणं ही तर लोकशाही प्रक्रियेची आद्य-अटच!
- एवढंच की आम्ही त्यासाठी आधुनिक तंत्र वापरलं.
 
(लेखक आम आदमी पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे संस्थापक ‘अॅडमिन’ आहेत)