शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

आमचं रहस्य

By admin | Updated: February 15, 2015 02:26 IST

मतदारांर्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुक-चावडीवर चाललेल्या भांडणात, व्हॉट्सअॅपवरच्या तिरकस फॉरवर्ड्समध्ये डोकावण्याची यंत्रणा ‘आप’ने उभी केली.

मतदारांर्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुक-चावडीवर चाललेल्या भांडणात, व्हॉट्सअॅपवरच्या तिरकस फॉरवर्ड्समध्ये डोकावण्याची यंत्रणा ‘आप’ने उभी केली. 
त्याचीच आज ‘सेण्टीमेण्ट अॅनालिसिस’ म्हणून चर्चा होते आहे.
माजिक आंदोलनांच्या बातम्या घेऊन वर्तमानपत्रंच्या, वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही, ‘सोशल मीडिया’च्या मार्गाने ‘मध्यस्थ’   ओलांडता येतात, हे इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनाच्या दिवसांपासून अनुभवाला आलं होतं. अर्थात, तेव्हा आम्ही सगळे नवखेच होतो. आम आदमी पक्षाचं काम सुरू झाल्यावर  आमच्या सोशल मीडिया सेलला आकार आला.
सोशल मीडिया आणि त्यातून होणा:या ‘थेट संवादाची’ ताकद आम्हाला 2क्13 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रथम जाणवली. त्या निवडणुकीतलं यश, अवघ्या 49 दिवसांत आमच्या सरकारनं दिलेला राजीनामा, त्यानंतरची नाराजी आणि लोकसभा निवडणुकीत उडालेला धुव्वा, त्यातून लोकांमध्ये उसळलेली चीड, नाराजी आणि संताप हे सारंच घेऊनच आम्ही नव्या निवडणुकीला सामोरे गेलो.
आमचे कार्यकर्तेही  सोशल मीडियावरचे ‘ट्रेण्ड्स’ आणि ‘ट्रेल्स’ पाहत होते. ‘आप’ल्या विषयी संताप-नाराजी आहे, त्यावर सोशल मीडियात जहरी टीका होते आहे, हे सारं दिसत होतं. या डाटाचा अभ्यास करणारं पहिलं रिसर्च टूल नोव्हेंबर 2क्14 मध्येच आम्ही सुरू केलं.  केवळ  ‘बोलण्याचं’ अगर  ‘माहिती देण्या’चं नव्हे, तर  ‘ऐकण्याचं’ आणि  ‘माहिती मिळवण्याचं’ माध्यम/ साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्याच्या ‘आप’च्या निर्णयाची पहिली परिणती म्हणजे दिल्लीच्या जनतेला सामोरं जाताना अरविंद केजरीवाल यांनी घेतलेली भूमिका- ‘भाई, गलती हो गयी, माफ कर दो, अब की बार ऐसा नहीं करेंगे! 
मतदारांमध्ये आपल्या आधीच्या निर्णयाबद्दल किती संताप आहे, याचं मोजमाप करता येण्याच्या प्रक्रियेतून  विचारपूर्वक तयार झालेली ही पहिली भूमिका. त्यामागोमाग आम्ही ‘सेण्टीमेण्ट अॅनालिसिस’चे सलग प्रयोग केले. दिल्लीचे मतदार सोशल मीडियात  काय बोलतात, त्यांचा राग नेमका कशावर आहे,  तरुण मतदारांचा कल कुठे झुकतो आहे हे सारं आम्हाला  ट्विट्स, फेसबुक अपडेट्स, व्हॉट्सअॅपवरून शेअर होणारे जोक्स, मेसेजेस यावरून कळत होतं!  ‘पॉङिाटिव्ह-वीकली पॉङिाटिव्ह-न्यूट्रल-वीकली निगेटिव्ह-निगेटिव्ह’ अशा चाचणी-पट्टीवर प्रत्येक विषयावरल्या मत-मतांतरांना चाळणी लावली जाऊ लागली. त्यातून मिळणारा तपशील आम्ही नेतृत्वासमोर मांडत गेलो. प्रचाराच्या तोफा सुरू झाल्या तसे आमचे निष्कर्ष बदलू लागले कारण, विविध विषयांवरील मतं-मतांतरं आणि प्राथमिकतांचा लंबक बदलत्या दिशा दाखवत होता; पण त्यातूनच  ‘रिअल टाइम’ तपशील हाती आला. प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक मोहल्लय़ातल्या महत्वाच्या प्रश्नांचा  डाटा आमच्याकडे तयार झाला होता. त्यातून आमचे उमेदवार आणि नेते मतदारांशी थेट त्यांच्या प्रश्नाविषयी बोलू शकले.
 ‘मोनोलॉग’ म्हणजे एकतर्फी संवादाची ‘मन की बात’ संस्कृती रुजत असताना आम्ही उलटय़ा दिशेने चाललो म्हणूनच कदाचित ‘डायलॉग’पर्यंत पोहोचू शकलो. 
- याकाळात आमची हेटाळणीही बरीच झाली!
‘झुग्गीझोपडीवाले कहां इनके फेसबुक पढेंगे? असं म्हणत आम्हाला मोडीत काढणा:यांना अजून हे कळलंच नाही की, आता थेट कनेक्ट साधण्याची ताकद माणसांच्या हातात आली आहे. पन्नास-शंभर रुपयांचे पॅक मारून माणसं ‘कनेक्टेड’ राहण्यासाठी धडपडतात.  दिल्लीत 1.33 कोटी मतदार आहेत. 
त्यांपैकी 1 कोटींपेक्षा अधिक लोकांकडे मोबाइल, व्हॉट्सअॅप होते!
- त्यांच्यार्पयत प्रत्यक्ष पोहोचण्याआधी त्यांच्या मनात, फेसबुकच्या चावडीवर चाललेल्या भांडणात आणि व्हॉट्सअॅपवरच्या फाजील, तिरकस फॉरवर्ड्समध्येदेखील डोकावण्याची यंत्रणा आम्ही उभी केली. त्याचीच आज ‘सेण्टीमेण्ट अॅनालिसिस’म्हणून चर्चा होते आहे. आमच्या टीमने प्रत्येक मतदारसंघाचा एक वेगळी डेमोग्राफी म्हणून विचार केला. माणसं  कशानं दुखावतात, कशानं सुखावतात, कशाबद्दल त्यांना काय वाटतं याचा अंदाज घेणं आणि आदर करणं ही तर लोकशाही प्रक्रियेची आद्य-अटच!
- एवढंच की आम्ही त्यासाठी आधुनिक तंत्र वापरलं.
 
(लेखक आम आदमी पक्षाच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे संस्थापक ‘अॅडमिन’ आहेत)