शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

बहुसदस्यत्वात कस लागणे निश्चित

By किरण अग्रवाल | Updated: September 26, 2021 15:25 IST

Elections : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निवडणुका या अधिकतर भाजपसाठी लाभदायी ठरल्याचे पाहावयास मिळाले आहे.

ठळक मुद्दे‘महाआघाडी’ने लढणार, की एकले चालणार हेच आता महत्त्वाचे ठरणारही पद्धत त्याहीपुढील सार्वत्रिक निवडणुकांचे संकेत सुचविणारी ठरेल

- किरण अग्रवाल

बहुसदस्य प्रभाग पद्धतीच्या निवडणूक निर्णयामुळे मर्यादित आवाका असलेल्या कार्यकर्त्यांची अडचण होणार आहे हे खरे असले तरी, राजकारणातील व्यक्ती निष्ठेचे स्तोम कमी करून पक्षीय प्रभावाचा कस जोखण्याच्या दृष्टीने ही पद्धत त्याहीपुढील सार्वत्रिक निवडणुकांचे संकेत सुचविणारी ठरेल, हे नक्की.

 

क्षमतांचा कस जोखणारी आव्हाने असली, की ती पेलताना काळजी घेतली जाते, त्यामुळे तुलनेने दगाफटका कमी होतो; परंतु आव्हानच सहज सोपे असते तेव्हा भाबड्या आत्मविश्वासातून ठेचकाळण्याची वेळ अधिकतर ओढवते, हा तसा प्रत्येकालाच येणारा अनुभव. त्यामुळे महानगरपालिका, नगर परिषदा व नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याच्या निर्णयाबद्दल जरी मतमतांतरे असली तरी, त्याकडेही याच सार्वत्रिक अनुभवाच्या दृष्टीने बघता यावे.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निवडणुका या अधिकतर भाजपसाठी लाभदायी ठरल्याचे पाहावयास मिळाले आहे, त्यामुळे राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर त्यापूर्वीच्या फडणवीस सरकारने घेतलेला बहुसदस्य प्रभागाचा निर्णय बदलून एकल वॉर्ड पद्धत स्वीकारण्यात आली होती; परंतु आता महानगरपालिका, नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना पुन्हा बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे. गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांच्या कालावधीत बहुतेकांनी आपापला वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीची तयारी चालविली होती. मर्यादित आवाका असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मर्यादित परिसरातील मतदारांवर प्रभाव राखणे तुलनेने सोपे असते, शिवाय संपर्क व निवडणूक खर्चाच्याही दृष्टीने ते ‘परवडेबल’ असते. एरिया वाढला की प्रभावाला मर्यादा येतात व खर्चही वाढतो, यासंदर्भाने बहुसदस्य प्रभाग पद्धत ही लहान कार्यकर्त्यांची राजकीय संधी हिरावणारीच ठरते हे खरे; परंतु आता यासंबंधीचा निर्णय झालाच आहे तर त्याकडे वेगळ्या चष्म्यातून बघून तयारीला लागणे गरजेचे ठरावे.

 

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता बहुसदस्यत्वामुळे सर्वच पक्षांना समान संधी आहे असे म्हणता यावे. राज्यातील सत्ताधारी पक्षांनी या निवडणुकाही महाआघाडी करून लढविल्या तर चित्र वेगळे राहू शकेल. परस्परातील शक्तिस्थानांचा एकजिनसी उपयोग त्यांना मोठे यश मिळवून देऊ शकेल, पण यापूर्वीच काँग्रेस व शिवसेनेने ‘एकला चलो रे’चा नारा देऊन ठेवलेला असल्याने याबाबत काय होते हेच महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षाचे यश बघायचे, की व्यक्तिगत लाभाचे गणित मांडायचे, असा यातील खरा सवाल असेल. अशात नेते व निवडणूक इच्छुकांत स्वतःपेक्षा पक्षाचा विचार वाढीस लावता आला तर यश अवघड नसेल; परंतु तेच कठीण आहे.

एकल सदस्य असो, की बहुसदस्य; त्याचा विचार न करता भाजपने बुथनिहाय तयारी अगोदरपासूनच करून ठेवली आहे. केडरबेस व्यवस्था व यंत्रणा ही त्यांची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे, जी इतर पक्षांकडे अभावाने आढळते. भाजपचे उमेदवार कोण, हा नंतरचा विषय असेल; परंतु कमळाला मतदान करून घेण्याची त्या पक्षाची यंत्रणा कार्यरतही झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पातळीवर मात्र पक्षाच्या व्यवस्थेपेक्षा उमेदवारांकडून स्वतःसाठी केल्या जाणाऱ्या हालचाली अधिक गृहीत असतात, त्यामुळे आव्हान मोठे ठरते.

 

सारांशात, व्यक्तीच्या म्हणजे उमेदवाराच्या विचाराऐवजी पक्षाचा विचार करून महापालिका, नगर परिषदा व नगरपालिकांच्या निवडणुका लढविल्या गेल्या, तर बहुसदस्य प्रभाग पद्धत ही सर्वांनाच लाभदायी ठरू शकेल. निवडणुकीतील व निवडणुकोत्तर ‘बार्गेनिंग’चा प्रकार त्यातून रोखला जाऊन निवडणुकीतील निकोपताही साधता येईल. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाकडे त्याचदृष्टीने बघायला हवे.

टॅग्स :PoliticsराजकारणAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका