शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बहुसदस्यत्वात कस लागणे निश्चित

By किरण अग्रवाल | Updated: September 26, 2021 15:25 IST

Elections : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निवडणुका या अधिकतर भाजपसाठी लाभदायी ठरल्याचे पाहावयास मिळाले आहे.

ठळक मुद्दे‘महाआघाडी’ने लढणार, की एकले चालणार हेच आता महत्त्वाचे ठरणारही पद्धत त्याहीपुढील सार्वत्रिक निवडणुकांचे संकेत सुचविणारी ठरेल

- किरण अग्रवाल

बहुसदस्य प्रभाग पद्धतीच्या निवडणूक निर्णयामुळे मर्यादित आवाका असलेल्या कार्यकर्त्यांची अडचण होणार आहे हे खरे असले तरी, राजकारणातील व्यक्ती निष्ठेचे स्तोम कमी करून पक्षीय प्रभावाचा कस जोखण्याच्या दृष्टीने ही पद्धत त्याहीपुढील सार्वत्रिक निवडणुकांचे संकेत सुचविणारी ठरेल, हे नक्की.

 

क्षमतांचा कस जोखणारी आव्हाने असली, की ती पेलताना काळजी घेतली जाते, त्यामुळे तुलनेने दगाफटका कमी होतो; परंतु आव्हानच सहज सोपे असते तेव्हा भाबड्या आत्मविश्वासातून ठेचकाळण्याची वेळ अधिकतर ओढवते, हा तसा प्रत्येकालाच येणारा अनुभव. त्यामुळे महानगरपालिका, नगर परिषदा व नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याच्या निर्णयाबद्दल जरी मतमतांतरे असली तरी, त्याकडेही याच सार्वत्रिक अनुभवाच्या दृष्टीने बघता यावे.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निवडणुका या अधिकतर भाजपसाठी लाभदायी ठरल्याचे पाहावयास मिळाले आहे, त्यामुळे राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर त्यापूर्वीच्या फडणवीस सरकारने घेतलेला बहुसदस्य प्रभागाचा निर्णय बदलून एकल वॉर्ड पद्धत स्वीकारण्यात आली होती; परंतु आता महानगरपालिका, नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना पुन्हा बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे. गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांच्या कालावधीत बहुतेकांनी आपापला वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीची तयारी चालविली होती. मर्यादित आवाका असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मर्यादित परिसरातील मतदारांवर प्रभाव राखणे तुलनेने सोपे असते, शिवाय संपर्क व निवडणूक खर्चाच्याही दृष्टीने ते ‘परवडेबल’ असते. एरिया वाढला की प्रभावाला मर्यादा येतात व खर्चही वाढतो, यासंदर्भाने बहुसदस्य प्रभाग पद्धत ही लहान कार्यकर्त्यांची राजकीय संधी हिरावणारीच ठरते हे खरे; परंतु आता यासंबंधीचा निर्णय झालाच आहे तर त्याकडे वेगळ्या चष्म्यातून बघून तयारीला लागणे गरजेचे ठरावे.

 

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता बहुसदस्यत्वामुळे सर्वच पक्षांना समान संधी आहे असे म्हणता यावे. राज्यातील सत्ताधारी पक्षांनी या निवडणुकाही महाआघाडी करून लढविल्या तर चित्र वेगळे राहू शकेल. परस्परातील शक्तिस्थानांचा एकजिनसी उपयोग त्यांना मोठे यश मिळवून देऊ शकेल, पण यापूर्वीच काँग्रेस व शिवसेनेने ‘एकला चलो रे’चा नारा देऊन ठेवलेला असल्याने याबाबत काय होते हेच महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षाचे यश बघायचे, की व्यक्तिगत लाभाचे गणित मांडायचे, असा यातील खरा सवाल असेल. अशात नेते व निवडणूक इच्छुकांत स्वतःपेक्षा पक्षाचा विचार वाढीस लावता आला तर यश अवघड नसेल; परंतु तेच कठीण आहे.

एकल सदस्य असो, की बहुसदस्य; त्याचा विचार न करता भाजपने बुथनिहाय तयारी अगोदरपासूनच करून ठेवली आहे. केडरबेस व्यवस्था व यंत्रणा ही त्यांची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे, जी इतर पक्षांकडे अभावाने आढळते. भाजपचे उमेदवार कोण, हा नंतरचा विषय असेल; परंतु कमळाला मतदान करून घेण्याची त्या पक्षाची यंत्रणा कार्यरतही झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पातळीवर मात्र पक्षाच्या व्यवस्थेपेक्षा उमेदवारांकडून स्वतःसाठी केल्या जाणाऱ्या हालचाली अधिक गृहीत असतात, त्यामुळे आव्हान मोठे ठरते.

 

सारांशात, व्यक्तीच्या म्हणजे उमेदवाराच्या विचाराऐवजी पक्षाचा विचार करून महापालिका, नगर परिषदा व नगरपालिकांच्या निवडणुका लढविल्या गेल्या, तर बहुसदस्य प्रभाग पद्धत ही सर्वांनाच लाभदायी ठरू शकेल. निवडणुकीतील व निवडणुकोत्तर ‘बार्गेनिंग’चा प्रकार त्यातून रोखला जाऊन निवडणुकीतील निकोपताही साधता येईल. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाकडे त्याचदृष्टीने बघायला हवे.

टॅग्स :PoliticsराजकारणAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका