शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पैशाची भाषा

By admin | Updated: January 31, 2015 18:32 IST

रुपयांत कमावणारा माणूस डॉलरमध्ये खर्च करू लागला तर तो नुकसानीत जातो. ‘डिंक’, ‘कोंबडी’, ‘भात’. यासारख्या चलनात कमावणार्‍या माणसांचे असेच काहीसे झाले आहे. त्यांच्या जगात ते श्रीमंत, पण पैशांच्या जगात आले तर शोषित!

मिलिंद थत्ते
 
बाळ, खूप शिक, मोठा हो’ असा एक आशीर्वाद दिला जातो. यात असे गृहीत असते की, खूप शिकल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. त्यातही शिकणे म्हणजे बुकं शिकणे असेच गृहीत असते. खूप पुस्तकी विद्या मिळवलेला माणूस मोठा असतो, असे नकळत मनावर बिंबत असते. अशी अनेक गृहीतके संस्कृतीसोबत येत असतात. यातच खूप पैसा मिळवलेला किंवा मिळवू शकणारा माणूस म्हणजे सुखी-समृद्ध माणूस असेही एक गृहीतक आहे. पैशाने समृद्धी येते यात खोटे काहीच नाही, पण हेच एक सत्य आहे असे मानणे मात्र फसवे आहे. 
काळानुरूप समृद्धीचे स्रोत आणि कल्पनाही बदलत असतात. मौर्य काळात राजाही गायी पाळत असे, त्या चारण्यासाठी जंगलाचा एक तुकडाही राखून ठेवलेला असे. महाभारतातली एक लढाई विराट राजाच्या गायी शत्रूने पळवण्यावरून झाली होती. ‘गोधन’ फार महत्त्वाचे मानले जात होते. जव्हार संस्थानच्या राजाच्या गायी हातेरी गावच्या सात विहिरींवर पाणी पिण्यासाठी यायच्या, असे हातेरीतल्या म्हातार्‍यांच्या आताही आठवणीत आहे. इतका काळ गोधन टिकले. जमीन हेही कृषी संस्कृतीच्या काळात मोठेच धन होते. राजांनी वेतन देण्याऐवजी इनाम जमिनी देणे हे मुघलांपासून ते आदिवासी राजांपर्यंत सर्वांच्या राजवटीत दिसते. आताही जमीन हे धन आहेच, पण ते एनए (अकृषी) झाल्यानंतर! सोने, चांदी आणि रत्ने यांचा धन आणि माध्यम या दोन्ही प्रकारे वापर झाला. सोन्या-चांदीला स्वत:चे मूल्य होते, पण त्यानंतर चलनाची कल्पना आली. नोटा आल्या, हलकी नाणी आली. नोटेच्या कागदाची किंमत त्यावर छापलेल्या रुपयांपेक्षा खूपच कमी असते. नोटेला किंमत असते ती त्यावर छापलेल्या वचनामुळे - ‘‘मैं धारक को सौ रुपये का मूल्य अदा करने का वचन देता हूँ.’’ सरकारने त्या मूल्याचे सोने ठेवून हे वचन छापलेले असते. हे वचन म्हणजेच आता धन मानले जाते. 
याही काळात काही लोक या वचनाच्या भानगडीत पूर्ण अडकलेले नाहीत. आमच्या गावातली एक म्हातारी आहे. तिने पाळलेल्या कोंबड्या ही तिची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक कशी वाढवायची हे तिला चांगले माहीत आहे. जेव्हा-जेव्हा तिला पैशांची गरज असते, ती एखादी कोंबडी विकते. पैसे तिला पाहिजे तसे ती खर्च करते, मौज करते. एक शेतकरी आहे, त्याने मागच्या दोन वर्षांपासून आलेला सगळा भात साठवून ठेवला आहे. तीन कणग्या भरलेल्या आहेत. औंदा सुरणही भरपूर लावून ठेवला आहे. पुढच्या वर्षी पोराचे लगीन करायचे आहे. सुरण आणि एक कणगी भात लग्नातल्या गावजेवणासाठी आहे. एक कणगी मुलीच्या बापाला देज म्हणून देण्यासाठी आहे. आणि एक कणगी विकून इतर खर्च भागवायचा आहे. माणसाला ज्या-ज्या गुंतवणुकीत गती असते, तिथेच तो गुंतवणूक करतो. या लोकांचा बँक आणि त्यात आपोआप वाढणारा पैसा यावर विश्‍वास नाही. भात आणि कोंबडी ही त्यांना पिढय़ान्पिढय़ा माहीत असणारी संपत्ती आहे. ती कशी सांभाळावी, वाढवावी हेही त्यांना चांगले कळते. एखाद्या बाईला कांदे हवे असतात. पैसा कमावण्याचे साधन तिच्याकडे नसते. मग ती जंगलात जाते. कहांडोळीचा किंवा धामोडीचा डिंक काढते. हा डिंक पळसाच्या पानात गुंडाळून आठवडी बाजारात जाते. तिथे या डिंकाच्या चारपट वजनाचे कांदे तिला डिंकाच्या बदल्यात मिळतात. एखादा शिकलेला माणूस तिला वेड्यात काढतो. म्हणतो चार किलो कांदे म्हणजे साठ-सत्तर रुपये आणि एक किलो डिंक म्हणजे किमान तीनशे रुपये. बाईला सौदा कळला नाही. बाई म्हणते मला कुठे रुपये पाहिजे होते, मला कांदे पाहिजे होते ते मिळाले ! अशाच प्रकारे तिला डाळ आणि मीठसुद्धा मिळते. पैशाच्या भाषेत भाषांतर केले तर हे शोषण आहे. रुपयामधला पगार डॉलरात बदलला की कमी वाटतो तसेच आहे हे. रुपयांत कमावणारा माणूस डॉलरमध्ये खर्च करू लागला तर तो नुकसानीत जातो. तसेच काहीसे डिंक, कोंबडी, भात या चलनात कमावणार्‍या माणसांचे झाले आहे. त्यांच्याच जगात ते राहिले तर ते श्रीमंत आहेत, आणि पैशाच्या जगात आले तर शोषित. पण पैशाचे जग त्यांना बाहेर राहू द्यायला तयार नाही. त्यांचा समावेश आमच्या अर्थचक्रात व्हायलाच हवा असा ‘प्रगत’ जगाचा अट्टहास आहे. त्याला ‘फायनान्शिअल इन्क्लूजन’ (वित्तीय समावेश) असे छान नाव आहे. पंतप्रधानांनी त्याला ‘जन-धन योजना’ असे यमकी नाव दिले आहे. आम्ही ज्या पैसा भाषेत बोलतो, त्याच भाषेत सर्वांनी बोलले पाहिजे असे प्रगत जगाने ठरवले आहे. वसाहतवादाच्या काळात ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ (गोर्‍या माणसावरचे ओझे) असा एक सिद्धांत प्रचिलत होता. या सिद्धांतानुसार सार्‍या जगाचा उद्धार करायचे ओझे गोर्‍या माणसावर आहे असे गोर्‍या माणसांनीच ठरवून घेतले होते. सर्वांनी युरोपिय पद्धतीचे कपडे घालणे, युरोपिय भाषा बोलणे, युरोपिय व्यसने करणे - अशा अनेक गोष्टींचा अंमल त्यातूनच जगावर लादला गेला. असेच आता जन-धनाचे आहे.
पैशाच्या जगात लोकांना ओढून ताणून आणण्यामागचा उद्देश चांगला असेल, पण पळत्या घोड्यावर बांधून घातलेल्या अनुभवी माणसाचे काय होईल? त्याला या जगात टिकता यावे, ‘स्वस्थ’ राहता यावे याची काळजी घेणार्‍या रचनाही पैशांच्या जगाने पुरवल्या पाहिजेत. 
 
 
(लेखक समावेशक विकासासाठी काम करणार्‍या 
‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)