शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

अज्ञानपीठाचा रामराम!

By admin | Updated: February 15, 2015 02:37 IST

पांडुरंग ते चांगदेव ते खंडेराव असा प्रवास करत जनस्थान ते ज्ञानपीठ अशी स्टेशनं घेत हल्ली तुम्ही सिमल्याला थंड हवेच्या ठिकाणी असता आणि मी इकडे सांगवीतच..!

आधी नकार, मग व्यवस्थेला शरण, मग व्यवस्थेतल्या व्यवस्थेत बंड करू पाहणं, मग व्यवस्थेचं चक्क संशोधन वगैरे करणं अशा अनेक इत्यादी वगैरे गोष्टी करत करत पांडुरंग ते चांगदेव ते खंडेराव असा प्रवास करत जनस्थान ते ज्ञानपीठ अशी स्टेशनं घेत हल्ली तुम्ही सिमल्याला थंड हवेच्या ठिकाणी असता आणि मी इकडे सांगवीतच..!
 
ति,
रा. रा. भालचंद्र नेमाडे यांसी सप्रेम रामराम!
हे पत्र लिहायचं ठरवलं आणि सगळ्यात मोठी गोची उदाहरणार्थ अशी झाली की, इथं या पत्रचा मायना लिहिताना हुबेहूब असं काय लिहावं या विचारातच तासभर तंतोतंत अडून बसलो. 
तुमच्या नावाआधी ‘तीर्थरूप’ असं लिहावं असं आधी मनात आलं होतं. कारण मला जन्माला घालणारे तुम्ही एकाअर्थी माङो बापच; पण आपल्यात वयाचा फरक फारसा नाही. तुम्ही पंचविशीत होता तेव्हा मीही साभिनय आणि सदेह पंचविशीतच होतो. आज आपण दोघेही पंचाहत्तरीत असू. तर पन्नास वर्षानंतर शोधायचाच म्हटलं तरी आपल्यात फक्त नावाचाच फरक असणार. म्हणजे असं की तुम्ही ज्ञानपीठ वगैरे विजेते मराठी लेखक आणि मी तहहयात काहीही न जिंकू शकलेला पांडुरंग सांगवीकर. तुम्ही कायम देशी मातीशी नाळ जुळवून असलेले आणि मी कुठल्याच भुईत रुजू न शकलेला असा. पण हे फरक क्षुद्र आहेत. कारण तुम्हाला ज्ञानपीठ वगैरे आणि मी कायम जगरहाटीतल्या अज्ञानपीठाचा शंकराचार्य. यात थोर वगैरे काही अजिबातच नाही आणि कुणीही माणूस एकदा ‘पांडुरंग सांगवीकर’ झाला की त्याला कशातच आणि कशाचंच काही थोर वाटत नाही, हे मागच्या पन्नासभर वर्षांनी हुबेहूब सिद्धच करून दाखवलेलं आहे. 
अशा दृष्टीने पाहिलं म्हणजे आपल्यात फार काही फरक उरत नाही. मग असंही लक्षात आलं, की तुम्ही माझी म्हणजे तुमचीच स्वत:ची गोष्ट लिहिलेली आहे. आता माझी म्हणजे तुमचीच गोष्ट असं जर असेल तर ‘मी म्हणजेच तुम्ही’ असं आयडेन्टीटीचं काहीच्या काही त्रंगडं होऊन बसतं. 
मग मी म्हणालो, आपण आपला सरळ देशी रामराम घालून मोकळं व्हावं. 
मी म्हणालो, पांडोबा, मुद्यावर ये. नमनालाच मणभर गूळ काढू नकोस.
तर मुद्दा असा की एकेकाळी आपण सबंध आणि सर्वंकष व्यवस्थेलाच नकार देत असू. तुम्ही आणि मी दोघेही. माझं निमित्त करून तुम्ही इथल्या व्यवस्थेत नकार रुजवला असं समीक्षक वगैरे तत्सम जमातीचे लोक इथे-तिथे म्हणत असतात किंवा हे समीक्षक वगैरे लोक याच्या नेमकं उलट असंही काही म्हणाले असण्याची शक्यता आहे. समीक्षक त्या-त्या वेळी त्यांना वाटेल तसं-तसं काहीही म्हणू शकतात हे एक आणि कोणत्या वेळी कोण समीक्षक किंवा उदाहरणार्थ लेखक त्याच्या-त्याच्या अजेंडय़ानुसार कधी काय म्हणाला हे आपण मुद्दाम लक्षात ठेवायचं काही कारण नाही हे दुसरं. 
तर ते सोडा. 
आधी नकार, मग व्यवस्थेला शरण, मग व्यवस्थेतल्या व्यवस्थेत बंड करू पाहणं, मग व्यवस्थेचं चक्क संशोधन वगैरे करणं अशा अनेक इत्यादी वगैरे गोष्टी करत करत पांडुरंग ते चांगदेव ते खंडेराव असा प्रवास करत जनस्थान ते ज्ञानपीठ अशी स्टेशनं घेत हल्ली तुम्ही सिमल्याला थंड हवेच्या ठिकाणी असता आणि मी इकडे सांगवीतच चिरंतन जुनाट पारावर बसून समवयस्क म्हाता:यांसोबत अध्यात्म वगैरे भाकड गोष्टींची चर्चा करत करत उकाडय़ात पेंगत असतो. 
आता हा एकंदरीत बराच विनोदी प्रकार वाटत असला तरी, तुम्ही तंतोतंत सिमल्याला किंवा कुठेही असलात तरी तुमच्या रक्तातली सांगवी सुटणं शक्य नाही आणि मी सांगवीच्या भुईतच अजूनही अधांतरी मुळांना आधार शोधत असतो ही आपल्यातली मूलभूत गोष्ट आहे. 
व्यवस्थेला नकार असू देत की, पुरस्कारांचा स्वीकार असू देत; तुम्ही कुठेही गेलात आणि कितीही मोठे वगैरे झालात आणि मी कुठेच गेलो नाही आणि कितीही काहीही झालो नाही तरी शेवटी आपल्यातली सांगवी कुठेच जाणार नाही हे मला माहीत आहे. 
तुम्ही तिकडे ठिकठिकाणी कुठे कुठे आणि मी इकडे सांगवीतच कुठे कुठे- व्हाया नामदेव भोळे-शेवगे लावत चाललोय, हेच मला महत्त्वाचं वाटतं. त्या दृष्टीने पाहिलं तर शेवगे लावणं हिच एक गोष्ट अंतिम महत्त्वाची असते.
आता कुणा पश्चिमेचं लांगुलचालन वगैरे शैलीतल्या सलमान रश्दीला किंवा उदाहरणार्थ इतरही आणखी कुणाला हे इतकं साधं म्हणणं पटत नसेल, तर त्याला आपण काय करणार ? खरं बोलणा:याला तिरसट म्हणणं हा प्रकार खास इंग्रजी असतो. इंग्रजी शिकलेले, बोलणारे आणि म्हणून स्वत:ला जरा कमी इंग्रजच समजणारे सगळे असेच असतात हे आपण पुण्यात काहीबाही भंपक विद्यापीठीय शिक्षण घेत होतो तेव्हापासून पाहत आलेलो आहोतच. तेव्हा तो रश्दी किंवा कोण तो टिनोपॉल की नायपॉल काय म्हणतो ते आपण लक्षात घ्यायचं कारण नाही. आपण आपल्याला काय वाटतं ते बोलत राहू. कायम इंग्रजीतून बोलत आणि लिहित राहणं हे एकंदरीत गुलाम मानसिकतेचंच लक्षण हे म्हणणं अगदीच खरं नाही असं कोण म्हणोल ? - म्हणोल तो म्हणोल.
शेवटी असं की.
विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात सार्थक ठरो की ठरो निर्थक आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा,ढळो की न ढळो, हे पहाटे पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य, या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाटय़ात दरवळो की न दरवळो अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो की न साचो, घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ; - सांगवी अवकाश व्यापूनच उरेल आपला. सांगवीला, मला आणि तुम्हाला नखशिखांत लगटून असलेली माती सोडवून घेणार नाहीच तिचे आपल्यावर चढलेले कालजयी लेप. माती आदि असते आणि मातीच अंत हे तुमच्या-माङयाशिवायही लक्षावधींना माहीत आहे. लक्षावधी पांडुरंग आहेत, लक्षावधी चांगदेव आणि तितकेच खंडेराव ! ते ही गोष्ट सांगतच राहतील आणि हे सगळे ही गोष्ट सांगत राहतील तोवर आपणही असूच असू. लौकिक पुरस्कार असतील-नसतीलही. असं किंवा कसंही मोजलं तरी त्याने काही फरक पडत नाही.
- आता हे मला कुठून कळलं ? 
तर हा ज्ञानपीठ जाहीर झाल्यावर पेपरात आणि टीव्हीत आनंदी-आनंदासोबत ‘काही लोक’ जळकुटल्याचाही वास येऊ लागला तेव्हा आमचा शेजारी नाम्या काय म्हणाला ते सांगतो. तो म्हणाला, ‘‘हे ज्ञानपीठ का काय ते मिळालं ही भालबासाठी काय लै मोठ्ठी गोष्ट नसणार. आपला गडी पुरस्काराबिरस्काराने मोठा होणारा नाही अन् पुरस्कार न मिळाल्याने बारका होणारा नाही. गावोगावी सांगवी आहेत, सांगवी-सांगवीत पांडोबा आहे म्हणजे भालबाही आहेच. तो आपली गोष्ट चालू ठेवीलच.’’
- गोष्ट चालू राहणं आणि ती सांगणं महत्त्वाचं. 
अधिक काय लिहू ?
- तुमच्यातलाच मी,
पांडुरंग सांगवीकर