शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

‘हार्दिक’ असंतोष!

By admin | Updated: August 29, 2015 15:17 IST

सरकारला धडकी भरवणारं गुजरातमधलं आंदोलन अवघ्या चाळीस दिवसांत उभं राहिलं, यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. आंदोलनामागे कोणती तरी राजकीय शक्ती असावी, असा तर्क काढला जात असला तरी तो खरा नाही.

गुजरात आंदोलनामागची कारणमीमांसा
 
नंदकिशोर पाटील
 
हार्दिक पटेल, वय 22 वर्षे. संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेला युवक. गुजरातमधील बहुसंख्याक आणि आर्थिकदृष्टय़ा सधन अशा पटेल (पाटीदार) समाजाचं हे उदयोन्मुख नेतृत्व. पाटीदार समाजाचा अन्य मागासवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी त्यानं आंदोलनाची हाक दिली आणि ‘पाटीदार अनामत आंदोलक समिती’च्या बॅनरखाली लाखोंच्या संख्येनं हा समाज हार्दिकच्या पाठीशी उभा राहिला. जुलै महिन्यात त्यानं मेहसाना जिल्ह्यातून आंदोलन छेडलं आणि अवघ्या चाळीस दिवसांत त्याचं लोण गुजरातभर पसरलं. मंगळवारी अहमदाबाद येथे झालेल्या विराट रॅलीनं तर अनेकांना अचंबित केलं. अधिकृत आकडेवारीनुसार चार लाखांहून अधिक संख्येनं लोक या रॅलीत उत्स्फूर्तपणो सहभागी झाले होते. हार्दिकला अटक होताच संपूर्ण गुजरात पेटलं. सरकारला धडकी भरवणारं हे आंदोलन अवघ्या चाळीस दिवसांत उभं राहिलं, यावर कोणाचा  विश्वासच बसत नाही. आंदोलनामागे कोणती तरी राजकीय शक्ती असावी, असा तर्क काढला जात असला तरी तो खरा नाही. कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय अशी सामाजिक आंदोलनं उभी राहतात, हे आजवर अनेकदा घडलेलं आहे.  गुजरातमध्ये आज ना उद्या हे घडणारच होतं. विशेषत: राजस्थानमधील गुजर्र आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाने आपल्या मागण्या पदरात पाडून घेतल्यानंतर (न्यायालयाने अमान्य करण्यापूर्वी) गुजरातमधील पटेलांमध्ये धगधग सुरू झाली होती. पण मुख्यमंत्रिपदी नरेंद्र मोदी असल्याने आंदोलनाच्या नेतृत्वासाठी प्रस्थापित राजकीय नेतृत्वातून कोणीही पुढे येण्यास धजावत नव्हतं. दुसरीकडं, हार्दिक पटेल या युवकानं पटेलांच्या न्याय-हक्क संरक्षणासाठी ‘सरदार पटेल सेवादल’ची स्थापना करून युवकांचं संघटन बांधायला सुरुवात केली होती. पण हा युवक इतकं मोठं आंदोलन उभं करू शकेल याचा अदमास कोणालाच नव्हता.  
4198क् ते 2क्15 आरक्षणाला विरोधी व समर्थन
8क्च्या दशकात काँग्रेसने पटेल समाजाला शह देण्यासाठी गुजरातमध्ये खाम (केएचएएम) अर्थात क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लीम यांना बळ देत त्यांचे जातीय गणित पुढे आणले. हा काळ पटेल समाजासाठी सामाजिक असंतोषाचा काळ होता. पुरेशा सत्तेअभावी पटेल समाजाने 1981 ते 1985 या काळात ओबीसी आरक्षणाविरोधात हिंसक आंदोलन केले. राज्यभर दलित व ओबीसी समाजाला लक्ष्य करण्यात आले. तिथूनच पटेल समाज काँग्रेसकडून भाजपाकडे वळला. 9क्च्या दशकात भाजपाची व्होट बँक बनला. त्याचे बक्षीस त्यांना वेळोवेळी मिळत गेले. सत्तेत त्यांचा वाटा वाढत गेला. सध्या गुजरातमध्ये 12क् पैकी 4क् आमदार पटेल समाजाचे आहेत. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलसह सात मंत्री या समाजाचे आहेत. 9क्च्या दशकात आरक्षणाविरुद्ध लढणारा हा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर आला आहे. सामाजिक परिवर्तनाचं चक्र उलटं फिरलं की असं होतंच.
4आंदोलनाची वेळ का आली?
‘व्हायब्रंट गुजरात’मुळे निर्माण झालेल्या नवीन संधी उच्च तांत्रिक शिक्षणाअभावी पटेल समाजाला मिळवता आलेल्या नाहीत. पारंपरिक शिक्षण घेऊन हा समाज व्यवसाय करतो; मात्र बदलत्या अर्थकारणात त्यांना आता त्यांचे वर्चस्व निर्माण करायचे आहे. युवा पिढीला आरक्षणाद्वारे अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. ग्रामीण भागात  या समाजातील मध्यमवर्गीयांनी लघुउद्योगात गुंतवणूक केली आहे; मात्र व्हायब्रंट गुजरात मॉडेलमध्ये मोठय़ा गुंतवणूकदारांना अधिक संधी मिळाल्या. परकीय गुंतवणूकही मोठय़ा उद्योगांमध्ये झाली, त्याचा लघुउद्योगांना हवा तसा फायदा झाला नाही. त्यातून पटेलांची आर्थिक कोंडी झाली. रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार गुजरातमधील 2.61 लाख लघुउद्योगांमधील 48 हजार युनिट आजारी आहेत. उत्तर प्रदेशानंतर गुजरातमधील ही संख्या सर्वात मोठी आहे. लघुउद्योगांच्या खराब स्थितीमुळे येथील अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यात पटेल समाजातील तरुणांची संख्याही मोठी आहे. 
4सधन समाज अस्वस्थ का ?
राजस्थानातील गुजर्र, उत्तर प्रदेशातील यादव, महाराष्ट्रातील मराठा, आंध्रातील रेड्डी, कर्नाटकातील लिंगायत आणि आता गुजरातेतील पटेल. सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्टय़ा सधन मानलेले समाज हल्ली आरक्षणाची मागणी का करू लागले आहेत?  नव्वदच्या दशकात  मंडल कमिशनविरोधात आंदोलन करणारेच आज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. यामागची कारणो गेल्या दोन दशकात बदललेल्या आर्थिक अवकाशात आहेत. जागतिकीकरणामुळे पारंपरिक उद्योगधंद्यांना  अवकळा आली. शेतीचे उत्पादन घटले. या समाजांचे उच्च शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष झालेले आणि मंडल आयोगानंतर शासकीय नोक:यांमधील टक्का घटल्याने या समाजांत बेकारी वाढली. समाजाकडे राजकीय पदं असली, तरी अशा नेतृत्वाने समाज पुढे जातो या गृहीतकाला अलीकडच्या काळात हादरे बसू लागले आहेत. या समाजातील नव्या पिढीला शिकून परदेशात जायचंय, शासनातील मोठी पदं हवी आहेत; पण शिक्षण आणि नोक:यांतील आरक्षणामुळं त्यांची कोंडी होताना दिसते. वैद्यकीय-अभियांत्रिकी शिक्षण देणा:या संस्था या समाजाच्या ताब्यात, पण त्याचा फायदा समाजातील आर्थिक कमजोर वर्गाला होत  नाही. त्यामुळे नजीकच्या काळात अशा अनेक सामाजिक आंदोलनांना सामोरे जावे लागणार आहे.
 
(लेखक लोकमतचे कार्यकारी संपादक आहेत.)