शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मदतीला ध्वनियंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 06:05 IST

वन्य प्राण्यांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुमारे ४० टक्के घट येते. प्राणी, पक्ष्यांना कोणताही त्रास न होता, त्यांनी पिकांपासून दूर राहावे यासाठी डाॅ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक ध्वनियंत्र विकसित केले आहे.

ठळक मुद्देअकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वन्यप्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी साैर ऊर्जा प्रचलित अल्ट्रा ध्वनिलहरी यंत्र विकसित केले आहे.

- राजरत्न सिरसाट

शेती, निसर्ग, पावसावर अवलंबून... पण दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवेळी पाऊस, पावसातील मोठा खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल, बाजारभावातील चढ-उतार अशा असंख्य प्रकारचा सामना करीत असताना वन्यप्राण्यांचा वाढलेला वावर आणि पिकांच्या हाेणाऱ्या अपरिमित हानीने शेतकऱ्यांच्या संकटात भर घातली आहे. हिंस्र पशूंनी थेट शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटनाही घडत आहेत. या वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी ३० ते ४० टक्के पिकांचे नुकसान हाेत असल्याचे संशाेधनातून समाेर आले़ मुख्यत: हरिण आणि रानडुकरांमुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान हाेत आहे.

राज्यात कापूस, साेयाबीन, ऊस, फळे व पालेभाज्यांचे पीक माेठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात राबतात; परंतु रात्री रानडुक्कर, हरिण, रोही, नीलगाय, माकड यासारखे प्राणी पिकांची नासाडी करतात. पिकांची नासाडी होऊ नये यासाठी शेतकरी विविध क्लृप्त्या, प्रयाेग करून वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्याचा प्रयत्न करतात; परंतु आजवर त्यांना त्यावर ठोस उपाय सापडला नव्हता.

अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर अभ्यास करून वन्यप्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी साैर ऊर्जा प्रचलित अल्ट्रा ध्वनिलहरी यंत्र विकसित केले आहे. या यंत्रातून निघणाऱ्या ध्वनीलहरी वन्यप्राणी व पक्ष्यांना त्रासदायक ठरतात. त्यामुळे पक्षी शेतात येत नसल्याचा दावा यंत्र विकसित करणारे शास्त्रज्ञ डाॅ. विवेक खांबलकर यांनी केला आहे. या यंत्रापासून प्राण्यांना काेणतीही इजा न हाेता पिकांचे नुकसान टाळता येते. लवकरच हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे डाॅ. खांबलकर यांचे म्हणणे आहे. कुलगुरू डाॅ. व्ही. एम. भाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे यंत्र विकसित करण्यात आले आहे.

काय आहे या यंत्रात?

-साैर ऊर्जा यंत्रातील बॅटरीत साठविली जाते. बॅटरीतील ही ऊर्जा मायक्राे कंट्राेलर ८०५१ ला पुरविण्यात येते. या मायक्राेकंट्राेलला पीआयआर सेन्सर, रिले सर्किट व अल्ट्रा ध्वनिलहरी जाेडण्यात आल्या आहेत.

-७ ते ८ मीटरपर्यंत काही हालचाल जाणवल्यास पीआयआर सेन्सर लगेच कार्यान्वित हाेतो व ध्वनिलहरी साेडतो.

-अल्ट्रा ध्वनिलहरीचा आवाज २० मीटरपर्यंत जातो. या यंत्रामुळे प्राणी, पक्ष्यांना कुठल्याही प्रकारची इजा हाेत नाही. अल्ट्राध्वनी लहरींमुळे ते शेातातून पळ काढतात़

हे यंत्र बनिवयासाठी १० वॅट साैर पॅनल १२ व्ही बॅटरी, मायक्राे कंट्राेलर ८०५१ चा वापर करण्यात आला आहे़

- प्राणी व पक्ष्यांमुळे हाेणारे नुकसान या यंत्रामुळे कमी हाेईल़ ही यंत्रे अधिक प्रमाणात बनविण्यासाठी एखाद्या उद्याेगासाेबत सामंजस्य करार विद्यापीठातर्फे केला जाणार आहे़ शेतकऱ्यांना माफक दरात ही यंत्रे उपलब्ध व्हावीत, असा कृषी विद्यापीठाचा उद्देश आहे़

वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करयासाठीची पारंपरिक तंत्रे

-विजेच्या तारांचे कुंपण.

- रंगीत साड्या शेताच्या धुऱ्यावर बांधणे.

- शेतात बुजगावणे लावणे.

- गावठी डुकरांची विष्ठा पसरविणे.

- मानवी केसांचा श्वासरोधक म्हणून वापर.

- आवाज निर्मिती.

- श्वानांचा वापर.

-वाळलेल्या शेणाच्या गौऱ्या जाळणे.

-शेतात पिकांचे रक्षण करण्यासाठी मावचा बांधणे व रात्रभर शेतातच थांबणे.

(मुख्य उपसंपादक, लाेकमत, अकाेला)