शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कजर्माफीची लाचारी

By admin | Updated: July 25, 2015 18:45 IST

शेतीच्या प्रश्नावर कजर्माफी हा कायमस्वरूपी तोडगा नाही हे शेतकरीही जाणतो. पण म्हणून सरकारने पाठ फिरवून कसे चालेल?

- सुधीर महाजन
 
कजर्माफीची लाचारी पदरी यावी असे कोणत्याही शेतक:याला मनापासून वाटत नाही. उलट आपल्यावर कर्जाचा बोजा नको असेच त्याचे प्रयत्न असतात; पण दुष्काळापाठोपाठ दुष्काळामुळे तो मोडून पडला आहे. दुष्काळी स्थितीत त्याच्यासमोर पर्याय नाही, तसा पर्याय कोणताही राजकीय पक्ष देत नाही आणि तेवढी कल्पकताही दाखवत नाही. कजर्माफी दिली म्हणजे दुष्काळग्रस्त शेतक:यांविषयीचे कर्तव्य संपले अशी सरकार आणि विरोधी पक्षांची भूमिका राहिली आहे. 
शेजारचे मध्य प्रदेश कृषी उत्पादनात देशात अग्रस्थानी राहते आणि महाराष्ट्रात मात्र शेती आतबट्टय़ाची, हे का झाले? 
 राज्य स्थापनेनंतरच्या गेल्या 55 वर्षात महाराष्ट्रात  सिंचनाखालची जमीन फक्त 16 टक्के आहे. म्हणजे 84 टक्के शेती केवळ पावसाच्या पाण्यावर! त्यात 1974 च्या दुष्काळानंतर मान्सून लहरी झाला. 
  सिंचनासाठी सरकारने आजवर अब्जावधी रुपये खर्च केले; पण क्षेत्र त्या प्रमाणात वाढले नाही.  
 सिलिंग कायद्यानंतर शेतीचे मोठय़ा प्रमाणावर विभाजन झाले आणि प्रत्येकाचे क्षेत्रही कमी झाले. महाराष्ट्रातील 85 टक्के शेतकरी हे फक्त 1 ते 5 एकरवाले आहेत. आजच्या काळात अशी अल्प शेती कसायला परवडत नाही. 
  शेतीवरील खर्चातही वाढ झाली. 
  शेतमालाच्या किमती जगभर पडल्या आहेत. त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही अशी अवस्था आहे; परंतु या किमती रोखणो, आधारभूत किंमत शेतक:याला मिळावी म्हणून सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून खरेदी करणो अपेक्षित असते; सरकार ते करीत नाही.  
  कापूस, मका, सोयाबीन या सर्व पिकांबाबत हीच परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला भाव असतो त्यावेळी सरकार निर्यातबंदीचा निर्णय घेते आणि शेतक:यांच्या घरातील कापूस विकला गेल्यानंतर ही बंदी उठविली जाते. 
 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाववाढीचा लाभ व्यापा:यांना मिळतो. सरकारचे हे धोरण व्यापारीधाजिर्णो आहे. यावेळेस खुल्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाचा सरकारला विसर पडतो. म्हणजे सरकारची भूमिका ही प्रत्येक वेळी सोयीची असते; पण त्याचा फटका शेतक:यांना बसतो. 
  बियाणो, खते यांची ऐन हंगामात टंचाई असते. ती चढय़ा दराने, कधी काळ्याबाजारातून खरेदी करावी लागतात, अशावेळी सरकारी यंत्रणा गप्प असते. हे दरवर्षी घडते. 
  ऐन हंगामात वीज न मिळणो ही अवस्था कायम आहे. हा प्रश्न दरवर्षीचा आहे; पण त्यावर कायम तोडगा काढला जात नाही. पाणी उपलब्ध असूनही ते पिकांना देता येत नाही, परिणामी उत्पादनावर परिणाम होतो. 
- हे सर्व प्रश्न सरकार सोडवू शकते अशा परिस्थितीतील शेती करणारा शेतकरी कजर्माफीची आशा ठेवत असेल तर वावगे काय? गेल्या 13 वर्षात सरकारने उद्योजकांचे दोन लाख चार हजार कोटींचे कर्ज माफ केले होते आणि आता गेल्या सात वर्षात चार लाख 95 हजार कोटींची थकबाकी उद्योजकांकडे आहे.
शेतीच्या प्रश्नावर कजर्माफी हा कायमस्वरूपी तोडगा नाही हे शेतकरीही जाणतो. पण या प्रश्नाच्या गांभीर्यापेक्षा राजकारणच जास्त होते, हे वास्तव आहे..पण हेही खरेच!
 
या प्रश्नाला दुसरीही बाजू आहे. शेतकरी प्रत्येक वेळी नडला जातो हे खरे असले, तरी बदलत्या वातावरणाचा, वास्तवाचा अंदाज  घेऊन बदलण्यात तोही पुरेसा अग्रेसर नाही. 
 
 
1  अल्प शेती क्षेत्र हा जगभरातील प्रश्न आहे; पण  
 इतरत्र शेतक:यांनी परिस्थितीवर मात करीत आपला  
मार्ग तयार केल्याचे दिसते. महाराष्ट्रात अशा 
प्रयोगशील शेतीचे वारे म्हणावे तितके पसरलेले नाही.
 
2  दुसरा मुद्दा शेतीविषयी बांधिलकीचा आहे. एखादा व्यापारी 
 किंवा उद्योजक आपल्या उद्योग व्यापाराबाबत, त्यातील चढ- 
उतार, बाजारपेठ, मागणी, पुरवठा याविषयी जागरूक व अभ्यासू   
असतो तेवढी तयारी शेतकरी करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 
 
3  नवीन तंत्रज्ञानाची माहिती,  
 स्वीकार याबाबत शेतीतील 
 नवी पिढी जागरूक दिसते; पण 
व्यापक बदलासाठी वेळ लागेल.
 
4  शेतीसाठी उचललेल्या कर्जाचा विनियोग  
 विवाहसोहळे, वैद्यकीय उपचार वा इतर कामासाठी केला जातो. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो आणि कर्ज वाढत जाते. 
(लेखक ‘लोकमत’च्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक आहेत)
 
sudhir.mahajan@lokmat.com