शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शरीरशुद्धी

By admin | Updated: March 23, 2015 20:16 IST

आयुर्वेदातील निसर्गाेपचारामुळे अनेक जुनाट विकारांवर आराम तर मिळतोच, पण शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर गेल्याने शरीर-मनाला टवटवीही येते. काय करायचं त्यासाठी?

वैद्य विजय कुलकर्णी
 
आयुर्वेदातील निसर्गाेपचारामुळे अनेक जुनाट विकारांवर आराम तर मिळतोच, पण शरीरातील अनेक
विषारी घटक बाहेर गेल्याने शरीर-मनाला टवटवीही येते. काय करायचं त्यासाठी?
--------------
डोक्याभोवती मफलर गुंडाळलेली. आजूबाजूला कायम गर्दी. एकीकडे ते लोकांशी बोलताहेत, प्रचार करताहेत, मीटिंगा घेताहेत, भाषणं करताहेत, निवडून आल्यानंतर आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर निरनिराळे निर्णय घेताहेत, ‘आप’ल्यातल्या भांडणाबद्दल मीडियावाल्यांना बाईट देताहेत, सगळ्यांना तोंड देताहेत आणि दुसरीकडे आपल्याच प्रकृतीशी लढताहेत. सारखे खोकताहेत. शुगरही पार वर गेलेली.
अरविंद केजरीवाल यांचं हे रूप अलीकडच्या काळात अनेकांनी पाहिलं. आपल्या जुनाट खोकल्यानं आणि मधुमेहानं त्रस्त झालेल्या अरविंद केजरीवालांनी त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शरीर शुद्धिकरणासाठी शेवटी बंगळुरूच्या निसर्गाेपचार केंद्राची वाट धरली. दहा दिवस ते तिथे राहिले, शरीरशुद्धिकरणाच्या सा:या प्रक्रिया केल्या आणि आता पुन्हा नव्या उत्साहानं आणि नव्या दमानं ते परत आपल्या कामावर रुजू झालेत. निसर्गोपचार आणि शरीरशुद्धिकरणाचा मुद्दा त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला. अर्थात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांनीही पूर्वी निसर्गाेपचाराच्या मदतीनं शरीरशुद्धी केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेतच.
पण कशी करतात ही शरीरशुद्धी? कुठलीही ‘औषधं’ न घेताही आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर कसे टाकले जातात? निसर्गोपचार आणि शरीशुद्धीविषयी आयुर्वेदानं अतिशय सखोल आणि विस्तारानं अभ्यास केला आहे.
आपल्या शरीरात तीन दोष असतात. वात, पित्त आणि कफ. यातला एखादा जरी दोष वाढला तरी शरीराचं आरोग्य बिघडतं. त्यासाठी आयुव्रेदात दोन प्रकारे चिकित्सा केली जाते. शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा. शोधन चिकित्सेत शरीरात वाढलेले दोष बाहेर टाकून शरीरशुद्धी केली जाते, तर शमन चिकित्सेत आयुव्रेदिक औषधांद्वारे वाढलेल्या दोषांचे शमन केले जाते. वातदोष वाढल्यास बस्ती हा विधी केला जातो. पित्तदोष वाढल्यास विरेचन हा शोधन उपक्रम करतात. कफदोष वाढल्यास वमन हा उपक्रम केला जातो. रक्तधातू दुष्ट झाल्यास त्याचे शोधन करण्यासाठी रक्तमोक्षण केले जाते, तर शिरोभागातील दोष बाहेर काढण्यासाठी ‘नस्य’ केले जाते.
बस्ती
वातदोषावर बस्ती उत्तम काम करते. तेल, काढा किंवा अन्य द्रवपदार्थ रुग्णाच्या शरीरात गुद मार्गातून आत सोडले जातात. निरुह बस्ती आणि अनुवासन बस्ती असे बस्तीचे दोन मुख्य प्रकार. निरुह बस्तीसाठी विविध औषधी द्रव्याचे काढे वापरतात. अनुवासन बस्तीमध्ये तेलाचा उपयोग केला जातो. बस्ती देण्यापूर्वी रुग्णाच्या पाठीला आणि पोटाला थोडेसे तेल लावून शेक दिला जातो. वाताच्या अनेक तक्रारींवर बस्तीचा उपयोग होतो उदा. संधिवात, कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, आमवात, डोकेदुखी, पोटसाफ न होणो, पक्षवध इत्यादी. बस्तींचा उपयोग रोगप्रतिकारासाठी होतो. ज्यांना कुठलाही त्रस नाही अशांनीही पावसाळ्याच्या सुरुवातीला बस्ती घेतल्यास खूप चांगला परिणाम दिसतो.
विरेचन
विरेचन ही पित्तदोषावरील उत्तम चिकित्सा आहे. पित्तदोषाचा प्रतिबंध होण्यासाठी शरद ऋतूमध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यात विरेचन घेता येते. जुलाब होण्यासाठी औषध दिले जाते. त्यासाठी एंरडेलतेल, अभ्यादी मोदक इत्यादि औषधे वापरली जातात. विरेचन देण्यापूर्वी तीन, पाच किंवा सात दिवस औषधी तूप खायला देतात. विरेचनानंतर हळूहळू आहार वाढवावा लागतो. आम्लपित्त, हातापायाची जळजळ, पित्तामुळे होणारी डोकेदुखी, डोळे लाल होणो, मलावरोध, त्वचारोग, शित्पित, ईसब इत्यादि अनेक पित्तजन्य व्याधींवर विरेचन खूपच लाभदायी आहे. 
वमन
कफदोषात वमनप्रक्रियेद्वारे उलटीचे औषध देऊन कफ शरीरबाहेर काढला जातो. कफाच्या प्रतिबंधासाठी हिवाळा संपल्यावर वसंत ऋतूच्या सुरुवातीला वमन दिले जाते. विरेचन विधीप्रमाणोच तीन, पाच किंवा सात दिवस औषधी तूप दिले जाते. वमन होण्यासाठी ज्येष्ठमधाचा काढा, उसाचा रस, मदनफल चूर्ण, दूध इत्यादिचा उपयोग केला जातो. वमन पूर्ण झाल्यावर हळूहळू आहार वाढवला जातो.
जुनाट सर्दीपडसे, खोकला, दमा, फुफ्फुसाचे काही रोग, आम्लपित्त, त्वचेचे रोग, शरीराच्या खालील भागातील रक्तपित्त अशा अनेक रोगांवर वमनाचा उपयोग होतो.
रक्तमोक्षण
रक्तमोक्षण प्रक्रियेद्वारे शरीरातील दूषित रक्त काही प्रमाणात बाहेर काढून टाकले जाते. त्यासाठी सुई तसेच सिरींजचा उपयोग केला जातो. रक्तमोक्षण करण्यापूर्वी औषधी तूप दिले जाते. शरद ऋतूमध्ये रक्तमोक्षण करतात.
तोंड येणो, डोळ्यांचे काही रोग, रक्तप्रदर, रक्तपित, गळू होणो, वातरक्त, अंग गरम असणो, त्वचेचे रोग, आंबट  ढेकर येणो. रक्तदुष्टीच्या अनेक विकारांत रक्तमोक्षण अतिशय उपयोगी ठरते.
नस्य
नस्य प्रक्रियेमध्ये नाकात औषधी तेलाचे थेंब टाकले जातात. नाक हे डोक्याचे दात समजले जाते. त्यामुळे डोक्याच्या अनेक विकारांत त्याचा उपयोग होतो. नस्य करण्यापूर्वी कपाळ, गाल, मान, गळा आणि पाठीच्या काही भागाला तेल लावून शेक दिला जातो.
विविध शिरोरोग, जुनाट सर्दी, केस गळणो, केस पांढरे होणो, मानदुखी, खांदेदुखी इत्यादिंसाठी नस्य चांगलेच परिणामकारक आहे.
 
(लेखक आयुर्वेद चिकित्सक असून ‘आरोग्य भारती’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.)