शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

...तरीही मंत्रिमंडळाची झेप टँकरपर्यंतच

By admin | Updated: May 22, 2014 04:58 IST

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीतही सरकार गंभीर होऊन काही निर्णय घेताना दिसले नाही

अतुल कुलकर्णी, मुंबई - लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीतही सरकार गंभीर होऊन काही निर्णय घेताना दिसले नाही. बुधवारी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी जलसंपदा, पाण्याचे टँकर, सूत गिरणीसाठी जागा, भाड्याच्या जागेत विधी विद्यापीठ सुरू करा, अशाच फुटकळ विषयांची चर्चा केली. बैठकीत राजकीय पराभवाविषयी खडाजंगी, वादावादी, आरोप-प्रत्यारोप होतील ही अपेक्षा मात्र फोल ठरली. किंबहुना आपल्या भांडणाने पत्रकारांना फक्त बातम्या मिळतील आणि वाईटपणा मात्र आपल्यालाच येईल, असा विचार करून यासाठी आधीच खबरदारी घेण्यात आल्याचेही समजते. मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्टÑवादीचे नेते शरद पवार या दोघांमध्येच तासभर चर्चा झाली. त्यामुळेच आजच्या बैठकीत कोणतीही वादावादी समोर आली नाही. मात्र टँकर वाढवून द्या, दुय्यम निरीक्षकाचे पद कशाच्या माध्यमातून भरायचे, असले निर्णय सचिवांच्या स्तरावर व्हायला हवेत; मात्र हे विषय देखील मंत्रिमंडळासमोर येणार असतील तर सचिव काय करतात, असा संतप्त सवालही काही मंत्र्यांनी बोलून दाखवला. उलट तातडीने अमलात येणारे व लोकांना दिसतील, ज्याचा पोषक परिणाम होईल असे निर्णय आता घ्यायला हवेत़ असे सांगण्याचा आपण प्रयत्न केला; पण प्रत्येक जण आपल्या मतदारसंघाच्या पलीकडे काहीच बोलत नव्हता, अशी खंतही काही मंत्र्यांनी बोलून दाखवल्याचे समजते. सहकारी सूत गिरणीस २५ एकर जागा व ५० टक्के शासकीय कर्ज देण्याचा निर्णय असो अथवा आमच्या मतदारसंघातील अपूर्ण जलसिंचनाच्या प्रकल्पासाठी राज्यपालांकडून निर्देश मागून द्या, अशी आग्रही मागणी असो यापलीकडे आजच्या बैठकीत म्हणावे तसे व्यापक निर्णय झाले नाहीत. प्रत्येक राज्यात एक विधी विद्यापीठ अशी मूळ संकल्पना होती. त्यानुसार ते औरंगाबादला करण्याचेही ठरले होते. मात्र नंतर त्यात नागपूर आणि मुंबई जोडण्यात आले. यासाठीचे बरेच काम औरंगाबाद येथे मार्गी लागलेले आहे. मात्र नागपूरला जागा मिळत नसेल तर भाड्याच्या जागेत का होईना, पण ते सुरू करण्याची घोषणा करा; शिवाय तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध नसतील तर तासिका तत्त्वावर का होईना पण घ्या आणि करा सुरू, अशी आग्रही मागणी काही मंत्र्यांनी धरल्याचे समजते.