शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

यंदा मान्सून ९५ टक्के बरसणार- स्कायमेटचा अंदाज

By admin | Updated: March 27, 2017 22:29 IST

मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यात ५ टक्के कमी अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ भारताची ६० टक्के लोकसंख्या ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे़ त्यामुळे मान्सून कसा असणार याविषयी सर्वांनाच सर्वाधिक उत्सुकता असते़ नैऋत्य मोसमी पावसावर पॅसिफिक महासागर उद्भवणाऱ्या एल निनोचा प्रभाव पडत असतो़ यंदा पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आपल्याकडील मान्सूनवर जुलैनंतर पडण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे़ स्कायमेटच्या अंदाजानुसार जुनमध्ये १०२ टक्के पाऊस होऊ शकतो़ जूनमध्ये सर्वसाधारण पावसाची ७० टक्के शक्यता, २० टक्के सरासरीपेक्षा जास्त आणि १० टक्के सरासरीच्या कमी पाऊस होण्याची शक्यता आहे़ जुलैमध्ये ९४ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात सर्वसाधारण पावसाची ६० टक्के शक्यता, सरासरीपेक्षा जास्त पावसाची १० टक्के शक्यता, कमी पावसाची ३० टक्के शक्यता आहे.आॅगस्टमध्ये ९३ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात समाधानकारक पावसाची ६० टक्के शक्यता, जादा पावसाची १० टक्के शक्यता आणि कमी पावसाची ३० टक्के शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पाऊस होणार असून त्यात सर्वसाधारण पावसाची ५० टक्के शक्यता, जादा पावसाची २० टक्के आणि ३० टक्के कमी पावसाची शक्यता आहे. स्कायमेटचे कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी सांगितले की, पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमान वाढत असल्याचे जाणवले असून त्यातून एल निनो इफेक्ट दिसून येऊ शकतो़ त्यामुळे भारतात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी होण्याची २५ टक्के शक्यता असून दुष्काळ पडण्याची शक्यता १५ टक्के शक्यता आहे.स्कायमेटचा अंदाजमहिनाटक्केवारीएकूण पाऊसजून१०२१६४जुलै९४२८९आॅगस्ट९३२६१सप्टेंबर९६१७३सलग चौथ्या वर्षी कमी पावसाची शक्यताएल निनोचा प्रभाव २०१४ आणि २०१५ या वर्षात मोठ्या प्रमाणावर जाणविल्याने त्यांचा परिणाम मान्सूनच्या पावसावर झाला होता़ सलग गेल्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.भारताचे सरासरी पाऊसमान ८८७़५ मिमी आहे़ २०१४ मध्ये ७८१ मिमी पाऊस झाला होता़ तो सरासरीपेक्षा १२ टक्के कमी होता़ २०१५ मध्ये ७६०़६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ तो सरासरीपेक्षा १४ टक्के कमी होता़ गेल्या वर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाला असला तरी तो ८६२़२ इतका झाला होता़ तो सरासरीपेक्षा ३ टक्के कमी होता.