शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मान्सून ९५ टक्के बरसणार- स्कायमेटचा अंदाज

By admin | Updated: March 27, 2017 22:29 IST

मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यात ५ टक्के कमी अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ भारताची ६० टक्के लोकसंख्या ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे़ त्यामुळे मान्सून कसा असणार याविषयी सर्वांनाच सर्वाधिक उत्सुकता असते़ नैऋत्य मोसमी पावसावर पॅसिफिक महासागर उद्भवणाऱ्या एल निनोचा प्रभाव पडत असतो़ यंदा पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आपल्याकडील मान्सूनवर जुलैनंतर पडण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे़ स्कायमेटच्या अंदाजानुसार जुनमध्ये १०२ टक्के पाऊस होऊ शकतो़ जूनमध्ये सर्वसाधारण पावसाची ७० टक्के शक्यता, २० टक्के सरासरीपेक्षा जास्त आणि १० टक्के सरासरीच्या कमी पाऊस होण्याची शक्यता आहे़ जुलैमध्ये ९४ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात सर्वसाधारण पावसाची ६० टक्के शक्यता, सरासरीपेक्षा जास्त पावसाची १० टक्के शक्यता, कमी पावसाची ३० टक्के शक्यता आहे.आॅगस्टमध्ये ९३ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात समाधानकारक पावसाची ६० टक्के शक्यता, जादा पावसाची १० टक्के शक्यता आणि कमी पावसाची ३० टक्के शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पाऊस होणार असून त्यात सर्वसाधारण पावसाची ५० टक्के शक्यता, जादा पावसाची २० टक्के आणि ३० टक्के कमी पावसाची शक्यता आहे. स्कायमेटचे कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी सांगितले की, पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमान वाढत असल्याचे जाणवले असून त्यातून एल निनो इफेक्ट दिसून येऊ शकतो़ त्यामुळे भारतात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी होण्याची २५ टक्के शक्यता असून दुष्काळ पडण्याची शक्यता १५ टक्के शक्यता आहे.स्कायमेटचा अंदाजमहिनाटक्केवारीएकूण पाऊसजून१०२१६४जुलै९४२८९आॅगस्ट९३२६१सप्टेंबर९६१७३सलग चौथ्या वर्षी कमी पावसाची शक्यताएल निनोचा प्रभाव २०१४ आणि २०१५ या वर्षात मोठ्या प्रमाणावर जाणविल्याने त्यांचा परिणाम मान्सूनच्या पावसावर झाला होता़ सलग गेल्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.भारताचे सरासरी पाऊसमान ८८७़५ मिमी आहे़ २०१४ मध्ये ७८१ मिमी पाऊस झाला होता़ तो सरासरीपेक्षा १२ टक्के कमी होता़ २०१५ मध्ये ७६०़६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ तो सरासरीपेक्षा १४ टक्के कमी होता़ गेल्या वर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाला असला तरी तो ८६२़२ इतका झाला होता़ तो सरासरीपेक्षा ३ टक्के कमी होता.