शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

...तर शेतमाल विकायचा कुठे?

By admin | Updated: August 15, 2016 01:13 IST

‘‘कृषि बाजार समिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली यंत्रणा आहे. अडतीच्या प्रश्नावरुन काही ठीकाणी ‘मार्केट’ बंद होते.

बारामती : ‘‘कृषि बाजार समिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली यंत्रणा आहे. अडतीच्या प्रश्नावरुन काही ठीकाणी ‘मार्केट’ बंद होते. त्याची किंमत शेतकरी, व्यापाऱ्यांना चुकवावी लागली. अडत द्यायच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल. मात्र, ही यंत्रणा बंद पडल्यास उत्पादक शेतकऱ्याला त्याचा माल कुठे विकायचा, हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी काळजी मला वाटते,’’ अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अडतीच्या प्रश्नाबाबत चिंता व्यक्त केली.बारामती एमआयडीसी चौक परिसरात एका उद्घाटन समारंभात पवार बोलत होते. या वेळी पवार म्हणाले, सध्या राज्यात व्यापार व्यावसायिक एका अडचणीमध्ये दिसतो. यासंदर्भात शिष्टमंडळे भेटण्यासाठी येत आहेत. अनेक ठिकाणचे लोक भेटतात. दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत घाऊक, किरकोळ विक्रेते घटकदेखील भेटण्यासाठी आले होते. अडतीच्या प्रश्नावरुन संघर्ष सुरु झाला. त्याचा परिणाम काही भागात मार्केट बंद होते. नाशिकसारख्या ठिकाणी तर महिनाभर मार्केट बंद होते. त्याची किंमत व्यापारी आणि शेतकरी दोघांना चुकवावी लागली. या प्रसंगातून मार्ग काढणे आवश्यक आहे. व्यापार सुरळीत झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाचे वजनमाप होते का, त्याच्या मालाला योग्य किंमत पदरात मिळत आहे का, कोणाची फसवणूक तर होत नाही ना, यावर निगराणी ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात आली. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जाणीवपूर्वक, विचारपूर्वक उभारणी केलेली संस्था आहे. व्यापारी, शेतकऱ्यांच्या हितासाठी या यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही यंत्रणा आपण चालवित आहोत. ही यंत्रणा अडचणीत येईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. अडतीच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समिती यंत्रणा बंद पडल्यास उत्पादक शेतकऱ्याला त्याचा माल कुठे विकायचा, हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी काळजी मला वाटते. काही राज्यांत बाजार समितीची व्यवस्था नाही. बिहारसारख्या राज्यात बाजार समितीसारखी यंत्रणा नाही. तिथे कुठेही गेल्यावर शेतकरी रस्त्यावर माल विकताना दिसतो. तसेच, शेतात जाऊन माल खरेदी करणारा वर्ग त्या ठिकाणी तयार झालेला दिसतो. तो वर्ग शेतकऱ्याला वजनामध्ये न्याय देत नाही, खूप वेळा त्याची किंमत बुडवतो.>शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे संरक्षण नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या, व्यापाऱ्याच्या हिताची काळजी घेणारा व्यावहारिक मार्ग काढण्याची गरज आहे. राज्य सरकार यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करेल आणि या प्रश्नातून सर्वांची सुटका होईल, असा विश्वासदेखील पवार यांनी या वेळी व्यक्त केला.