शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेचे शुद्धीकरण कधी ?

By admin | Updated: January 25, 2015 00:51 IST

जलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या हेतूने देशभरात केंद्र सरकारने २०१५ हे जलक्रांती वर्ष म्हणून जाहीर केले आहे़

समीर इनामदार- सोलापूरजलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या हेतूने देशभरात केंद्र सरकारने २०१५ हे जलक्रांती वर्ष म्हणून जाहीर केले आहे़ नद्यांचा विकास आणि गंगेचे शुद्धीकरण यासाठी विशेष प्रयत्न सुरू असतानाच लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागेचे शुद्धीकरण कधी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ तर दुसरीकडे चंद्रभागेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही पुढे येत आहे़राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रभागेचे शुद्धीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. आता केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने पंतप्रधान मोदी आश्वासन पाळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने चंद्रभागेला गटारगंगेचे आलेले स्वरूप बदलण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी अनेक सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले. जलदिंड्यांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले आहे. तरीही म्हणावे तितकेसे यश आले नसल्याचे वास्तव आहे़ प्रदूषणमुक्त चंद्रभागेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे़ सोलापूर जिल्ह्यासाठी भीमा नदीचे पाणी हा पाण्याचा मुख्य स्त्रोत राहिला आहे. मात्र, प्रदूषणाबाबत नेमकी तक्रार करावयाची कोणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या पाण्यावर सिंचन विभागाचे तर नदीच्या वाळूवर महसूल विभागाचा अधिकार आहे. प्रदूषणाकडे मात्र दोन्ही खाती दुर्लक्ष करीत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे़ प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा कागदावरचप्रदूषण नियंत्रण मंडळाने भीमा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करून अनेक वर्षे उलटून गेली. पुणे जिल्ह्यातील मैलापाणी नदीमध्ये सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे़ याबद्दल कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत या आराखड्यात सूचना केल्या आहेत. मात्र याची अंमलबजावणी कितपत होते, हा संशोधनाचा विषय आहे. नदीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्ये सोडली जात असल्याने उजनी धरणात जलजन्यजीव धोक्यात आले आहेत़ याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.प्रदूषणाची कारणेनागरी वस्त्यांतून निर्माण होणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, निचरा होणारे लिचेट, वाळू उपसा, नदीत पाणी नसणे, जलपर्णीची वाढ, गाळाचे प्रमाण ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. चंद्रभागेचे शुद्धीकरण हे पुणे जिल्ह्यातूनच होणे आवश्यक आहे. दोन महापालिका, दहा नगरपालिका, दहा औद्योगिक वसाहतींमधून येणाऱ्या दुषित पाण्यामुळे चंद्रभागेला गटारगंगेचे स्वरुप आले आहे़ प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करीत असून, यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावे.- अनिल पाटील, जलतज्ज्ञ