शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेचे शुद्धीकरण कधी ?

By admin | Updated: January 25, 2015 00:51 IST

जलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या हेतूने देशभरात केंद्र सरकारने २०१५ हे जलक्रांती वर्ष म्हणून जाहीर केले आहे़

समीर इनामदार- सोलापूरजलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या हेतूने देशभरात केंद्र सरकारने २०१५ हे जलक्रांती वर्ष म्हणून जाहीर केले आहे़ नद्यांचा विकास आणि गंगेचे शुद्धीकरण यासाठी विशेष प्रयत्न सुरू असतानाच लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागेचे शुद्धीकरण कधी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ तर दुसरीकडे चंद्रभागेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही पुढे येत आहे़राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रभागेचे शुद्धीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. आता केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने पंतप्रधान मोदी आश्वासन पाळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने चंद्रभागेला गटारगंगेचे आलेले स्वरूप बदलण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी अनेक सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले. जलदिंड्यांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले आहे. तरीही म्हणावे तितकेसे यश आले नसल्याचे वास्तव आहे़ प्रदूषणमुक्त चंद्रभागेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे़ सोलापूर जिल्ह्यासाठी भीमा नदीचे पाणी हा पाण्याचा मुख्य स्त्रोत राहिला आहे. मात्र, प्रदूषणाबाबत नेमकी तक्रार करावयाची कोणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या पाण्यावर सिंचन विभागाचे तर नदीच्या वाळूवर महसूल विभागाचा अधिकार आहे. प्रदूषणाकडे मात्र दोन्ही खाती दुर्लक्ष करीत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे़ प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा कागदावरचप्रदूषण नियंत्रण मंडळाने भीमा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करून अनेक वर्षे उलटून गेली. पुणे जिल्ह्यातील मैलापाणी नदीमध्ये सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे़ याबद्दल कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत या आराखड्यात सूचना केल्या आहेत. मात्र याची अंमलबजावणी कितपत होते, हा संशोधनाचा विषय आहे. नदीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्ये सोडली जात असल्याने उजनी धरणात जलजन्यजीव धोक्यात आले आहेत़ याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.प्रदूषणाची कारणेनागरी वस्त्यांतून निर्माण होणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, निचरा होणारे लिचेट, वाळू उपसा, नदीत पाणी नसणे, जलपर्णीची वाढ, गाळाचे प्रमाण ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. चंद्रभागेचे शुद्धीकरण हे पुणे जिल्ह्यातूनच होणे आवश्यक आहे. दोन महापालिका, दहा नगरपालिका, दहा औद्योगिक वसाहतींमधून येणाऱ्या दुषित पाण्यामुळे चंद्रभागेला गटारगंगेचे स्वरुप आले आहे़ प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करीत असून, यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावे.- अनिल पाटील, जलतज्ज्ञ