शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

चंद्रभागेचे शुद्धीकरण कधी ?

By admin | Updated: January 25, 2015 00:51 IST

जलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या हेतूने देशभरात केंद्र सरकारने २०१५ हे जलक्रांती वर्ष म्हणून जाहीर केले आहे़

समीर इनामदार- सोलापूरजलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या हेतूने देशभरात केंद्र सरकारने २०१५ हे जलक्रांती वर्ष म्हणून जाहीर केले आहे़ नद्यांचा विकास आणि गंगेचे शुद्धीकरण यासाठी विशेष प्रयत्न सुरू असतानाच लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागेचे शुद्धीकरण कधी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ तर दुसरीकडे चंद्रभागेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही पुढे येत आहे़राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रभागेचे शुद्धीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. आता केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने पंतप्रधान मोदी आश्वासन पाळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने चंद्रभागेला गटारगंगेचे आलेले स्वरूप बदलण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी अनेक सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले. जलदिंड्यांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले आहे. तरीही म्हणावे तितकेसे यश आले नसल्याचे वास्तव आहे़ प्रदूषणमुक्त चंद्रभागेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे़ सोलापूर जिल्ह्यासाठी भीमा नदीचे पाणी हा पाण्याचा मुख्य स्त्रोत राहिला आहे. मात्र, प्रदूषणाबाबत नेमकी तक्रार करावयाची कोणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या पाण्यावर सिंचन विभागाचे तर नदीच्या वाळूवर महसूल विभागाचा अधिकार आहे. प्रदूषणाकडे मात्र दोन्ही खाती दुर्लक्ष करीत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे़ प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा कागदावरचप्रदूषण नियंत्रण मंडळाने भीमा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करून अनेक वर्षे उलटून गेली. पुणे जिल्ह्यातील मैलापाणी नदीमध्ये सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे़ याबद्दल कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत या आराखड्यात सूचना केल्या आहेत. मात्र याची अंमलबजावणी कितपत होते, हा संशोधनाचा विषय आहे. नदीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्ये सोडली जात असल्याने उजनी धरणात जलजन्यजीव धोक्यात आले आहेत़ याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.प्रदूषणाची कारणेनागरी वस्त्यांतून निर्माण होणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, निचरा होणारे लिचेट, वाळू उपसा, नदीत पाणी नसणे, जलपर्णीची वाढ, गाळाचे प्रमाण ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. चंद्रभागेचे शुद्धीकरण हे पुणे जिल्ह्यातूनच होणे आवश्यक आहे. दोन महापालिका, दहा नगरपालिका, दहा औद्योगिक वसाहतींमधून येणाऱ्या दुषित पाण्यामुळे चंद्रभागेला गटारगंगेचे स्वरुप आले आहे़ प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करीत असून, यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावे.- अनिल पाटील, जलतज्ज्ञ