शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जेव्हा संवेदना बधीर होतात!

By admin | Updated: October 23, 2014 22:47 IST

आर्थिक आकडेमोड : ७२ तास मृतदेहाची प्रतीक्षा

सचिन लाड -सांगली -महिन्यापूर्वी जन्मलेल्या मुलाला पाहण्याची ओढ. त्यातच दिवाळीचा सण. दोन महिन्यांचा पगार घेऊन गोव्याहून रेल्वेने उत्तर प्रदेशला निघालेला तरुण... पण भिलवडीजवळ रेल्वे अपघातात त्याच्यावर मृत्यूने झडप घातली. गोपाळ कैलास पांडे (वय ३१) असे त्याचे नाव. त्याच्या गावी ही बातमी समजताच, गोपाळचा मृतदेह सायंकाळी येईल, उद्या येईल याची प्रतीक्षा करीत त्याचे कुटुंबीय तब्बल तीन दिवस बसलेले... आणि इकडे मात्र मृतदेह नेण्यासाठी सांगलीत आलेल्या त्याच्या दोन नातेवाईकांना प्रचंड आर्थिक आकडेमोड करावी लागली. या आकडेमोडीत जाणवली समाजाची बधीर झालेली संवेदना...गोपाळ पांडे गेल्या दोन वर्षापासून गोव्यातील वेरणागेट येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होता. उत्तर प्रदेशातील लखनौ-बनारस मार्गावर माहूर हे त्याचे गाव. वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला. महिन्यापूर्वी मुलगा झाला. सुट्टी न मिळाल्याने मुलाला पाहायला जायला त्याला वेळ मिळाला नाही. दिवाळीसाठी मात्र त्याला आठवड्याची सुट्टी मिळाली. सोमवारी सकाळी दहा वाजता तो उत्तर प्रदेशला जाण्यासाठी गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेत बसला. कंपनीकडून दोन महिन्यांचा पगारही घेतलेला. मिरजमार्गे जाणारी ही गाडी सोमवारी रात्री नऊ वाजता भिलवडी (ता. पलूस) येथे आली असता, गोपाळ रेल्वेत दरवाजाजवळ उभा होता. तोल गेल्याने तो धावत्या गाडीतून बाहेर पडला. याची खबर रेल्वेतील अन्य प्रवाशांना लागली नाही. मंगळवारी सकाळी रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळून आला. खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. मिरज रेल्वे पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. तोपर्यंत पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात हलविला. त्याचा भाऊ अभिषेक पांडे मेहुण्यास घेऊन बुधवारी पहाटे मिरजेत आले. रेल्वे अपघातात गोपाळचा मृत्यू झाल्याने रेल्वे पोलीस मृतदेह नेण्यासाठी मदत करतील, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी रेल्वेतून मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रेल्वे प्रशासनाने यासाठी अख्ख्या बोगीचे एक लाख वीस हजार रुपये भाडे सांगितले. एवढी रक्कम देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णवाहिका घेण्याचे ठरविले. रुग्णवाहिका चालकाने मुंबईपर्यंत मृतदेह नेण्यासाठी चाळीस हजार रुपये भाडे सांगितले. ही रक्कमही देणे शक्य नव्हते. या दरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना ही घटना कळताच त्यांनी सांगली जिल्हा युवक काँग्रसचे सचिव जहीर मुजावर यांना मदतीसाठी पाठवले. मुजावर यांनी लगेच मदतीचा हात दिला.मृतदेह विमानतळावरच...मुजावर यांनी रुग्णवाहिका चालकास विनंती करून भाडे कमी करण्यास सांगितले. तोही राजी झाला. मात्र त्याने २० हजाराच्या खाली एक रुपया घेतला नाही. बुधवारी सकाळी मृतदेह रुग्णवाहिकेतून मुंबईपर्यंत नेण्यात आला. तेथून तो रात्री दिल्लीमार्गे विमानाने लखनौला नेण्यात येणार होता. विमानाचे २० हजार रुपये भाडे भरण्यात आले. मात्र रात्री लखनौला जाणारे विमान रद्द झाले. त्यामुळे नातेवाईकांवर पुन्हा संकट कोसळले. रात्रभर मृतदेह विमानतळावरच ठेवण्यात आला. आज (गुरुवार) सकाळी विमानाने तो लखनौला नेण्यात आला.दु:ख आणि प्रतीक्षासोमवारी रात्री गोपाळचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रात्रभर रेल्वे रुळाजवळ बेवारस स्थितीत पडून होता. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्याच दिवशी मध्यरात्रीपर्यंत त्याचा मृतदेह नातेवाईकांना मिळायला हवा होता. मात्र मृतदेह नेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आर्थिक आकडेमोड आणि सौदा ठरत गेला. पैसे देऊनही नातेवाईकांना तब्बल तीन दिवसांनंतर मृतदेह गावी नेता आला. कापडासाठी पाचशे रुपयेमिरज शासकीय रुग्णालयातील शवागृहात गोपाळचा मृतदेह उघडा पडला होता. हा मृतदेह कपड्यात बांधून देण्यासाठीही नातेवाईकांना पाचशे रुपये द्यावे लागले. त्यानंतर मुजावर यांनी एक चादर खरेदी केली आणि त्या चादरीत मृतदेह लपेटण्यात आला. संवेदना बधीर झालेल्या यंत्रणेमुळे मृत्यूनंतर गोपाळच्या मृतदेहाची हेळसांडच झाली. एकूणच समाजातील संवेदना हरपत चालल्याचे दिसून येते.