शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

आतापर्यंत काय चौकशी केली?

By admin | Updated: April 8, 2017 05:12 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेली पाच वर्षे काय चौकशी केली?

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेली पाच वर्षे काय चौकशी केली? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर, सहकार आयुक्त, आरबीआय, सीबीआयलाही त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बनावट खातेधारकांना कर्ज देऊन बँकेला दिवाळखोरीत काढले. सुमारे १७०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. नाबार्ड आणि कॅगनेही त्यांच्या अहवालात स्पष्ट केले आहे, तरीही राज्य सरकारने काहीही कारवाई केली नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयला करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.अहवाल सादर केल्यानंतर नाबार्डने काय केले? या संचालकांना बँकेच्या अािर्थक नुकसानीची माहिती होती. त्यांनी जाणूनबुजून केले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली का? असे अनेक प्रश्न उच्च न्यायालयाने नाबार्डला केले. त्यावर नाबार्डच्या वकिलांनी अशी कोणतीही शिफारस केली नसल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यानंतर, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना गेल्या पाच वर्षांत याबद्दल पोलीस तक्रार का केली नाही, असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना याचिकाकर्त्यांचे वकील एस. बी. तळेकर यांनी राज्य सरकारने अद्याप काहीही न केल्याने, या प्रकरणाचा तपास सीबीआयला करण्याचे निर्देश देण्याची मागणी खंडपीठाकडे केली.‘राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र सहकार अधिनियमाच्या कलम ८८ अंतर्गत संचालकांवर जबाबदारी निश्चित केली आहे. ८८ अंतर्गत सादर केलेल्या अहवालात एकूण १,०८६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे, तसेच प्रत्येक संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, त्यापुढे काहीही करण्यात आले नाही,’ असे तळेकर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. याचप्रमाणे याचिकाकर्त्यांना आरबीआयला नोटीस देण्यास सांगितले आहे.(प्रतिनिधी) >याचिका दाखल केल्यानंतर पुढे काय?गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह आरबीआय, सहकार आयुक्त व सीबीआयला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते, परंतु आत्तापर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले नाही, अशीही माहिती तळेकर यांनी खंडपीठाला दिली. ‘संचालकांवर जबाबदारी निश्चित केल्यानंतर पुढे काय केले? याचिका दाखल केल्यानंतर ५ वर्षांत तुम्ही (राज्य सरकार) काय केलेत याची माहिती द्या,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, देवीदास पिंगळे, दिलीपराव देशमुख, गुलाबराव शेळके व अनेक राजकीय नेत्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.