शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे तास आणि आकलनशक्तीचा संबंध काय?

By admin | Updated: November 16, 2015 02:08 IST

विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढीस लागावी यासाठी सहा तासांची शाळा आता आठ तासांची करण्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्ताविले जात आहे.

जान्हवी मोर्ये, ठाणेविद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढीस लागावी यासाठी सहा तासांची शाळा आता आठ तासांची करण्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रस्ताविले जात आहे. मात्र शिकवण्याची वेळ आणि आकलन शक्ती याचा काही एक संबंध नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढणार आहे. शाळेची वेळ वाढवून आकलनशक्ती वाढणार हे गृहीतकच मुळात आकलनशक्तीच्या बाहेरचे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक व्यक्त करीत असल्याने या नव्या धोरणाच्या विरोधातील पडसाद उमटू लागले आहेत. डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा सोनवणे यांच्याकडे आठ तासाच्या शाळेविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्या शाळा सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत भरतात.त्यांना दोन तासाची शाळा वाढवून आठ तासाची केल्यास त्यांना तो वेळ देणे शक्य आहे. मात्र ज्या शाळा दोन सत्रात सकाळ आणि दुपारी भरतात. त्यांना आठ तासाची शाळा शक्य नाही. आधीच मुलांना बसण्यासाठी जागा नसते. वर्ग विद्यार्थ्यांनी फुल्ल असतात. जागेची अडचण असते. त्यामुळे सकाळ व दुपारचे सत्र यात आठ तासाचा मेळ कसा घालायचा याचा पेच निर्माण होईल. शिक्षकांनी सहा तासाचा वेळ आणि लक्ष्य दिले तर आठ तासाची गरज भासणार नाही. अनेक शाळांनी यापूर्वी आकलनशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. आठ तासाची शाळा झाल्यावर काही विद्यार्थ्यांना लवकर तर काहीना उशिरापर्यंत थांबवून ठेवण्याची वेळ येईल. वेळेचा आणि आकलनशक्ती वाढीचा काही एक संबंध नाही. आकलनशक्ती वाढीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. आकलनशक्ती ही बाब व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असते. त्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचे प्रयोग करून आकलनशक्ती वाढू शकते. त्यात बाकीच्या गोष्टींचाही विचार होण्याची गरज आहे. त्यामुळे केवळ आठ तासाची शाळा करणे हे मला योग्य वाटत नाही असे माझे मत आहे.क्रीडा शिक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ शाळा असते असे नाही. घरी गेल्यावर अथवा शाळेत येण्यापूर्वी काही विद्यार्थी हे दोन ते तीन तास क्लासला जातात. त्यामुळे त्याच्या बुद्धीवर ताण पडणार. आठ तासामुळे तो ताण अधिक वाढणार. जे विद्यार्थी शिक्षणात मागे आहेत. त्याचा वेगळा विचार करण्यास हरकत नाही. मात्र आठ तासाची शाळा ही सरसकट सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी लागू करणे हे कितपत योग्य आहे. त्याचा आधीच विचार निर्णय घेण्यापूर्वी झाला पाहिजे. मला तरी ते योग्य वाटत नाही. गुरूकुल शाळा या पूर्ण दिवसाच्या असतात. त्यात मुलांचे बालपण हरविले आहे. आठ तासाची शाळा ही मुलांची कोंडी करणारी ठरेल. तसेच त्यांच्या बालपणाला धक्का पोहचण्यास कारणीभूत ठरु शकत. शाळेची वेळ वाढली तर मुले खेळणार कधी, असा सवालही त्यांनी केला.पालक प्रभाकर आठवले यांच्या मते, सरकारने शिक्षणाचे धोरण एकदाच काय ते ठरवून घ्यावे. सहा तासाची शाळा की आठ तासाची शाळा. सारखे निर्णय बदलल्यामुळे मुले, पालक आणि शिक्षक सगळी यंत्रणाच संभ्रमात पडते. त्यामुळे तो संभ्रम दूर होण्यास बराच काळ जातो. त्यामुळे गोंधळलेली अवस्था असते. एक ना धड भाराभर चिंध्या अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे शिक्षणाचे नुकसान होत आहे. एकीकडे दप्तराचे ओझे कमी करायचे दुसरीकडे आठ तासाची शाळा करायची. एकूणच काय एकातून सुटका दुसरीकडे अडवणूक असे गणित आहे. हे मला योग्य वाटत नाही.विद्यार्थी निनाद साठे हा इयत्ता आठवीला आहे. तो मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहे. त्याने सांगितले की, शाळा आठ तासांची झाल्यास कोंडलेपणा वाढेल. अनेक विषय कठीण असतात. त्याचे आकलन होत नाही. पण वेळ वाढविल्याने ते होईल असे मला तरी वाटत नाही. ते सोपे करून सांगितले तर वेळ वाढविण्याचा प्रश्नच येणार नाही.