शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चालवू हा पुढे वारसा..!

By admin | Updated: February 7, 2017 23:48 IST

महाराष्ट्राचं राजकारण सोळा घराण्यांभोवती फिरत असे. आता ते आणखीकाही घरं पुढे येऊन चौसष्टहून अधिक घरांच्या पुढं गेलं आहे.

महाराष्ट्राचं राजकारण सोळा घराण्यांभोवती फिरत असे. आता ते आणखीकाही घरं पुढे येऊन चौसष्टहून अधिक घरांच्या पुढं गेलं आहे. गावागणिक नवी घराणी तयार झाली आहेत. आजवर बारामतीचे पवार, अकलुजचे मोहिते-पाटील, साताऱ्याचे भोसले, सांगलीचे पाटील, नाशिकचे हिरे, फलटणचे निंबाळकर, बीडचे क्षीरसागर, सोळुंके, नगरचे विखे, थोरात अशी काही नामांकित राजकीय घराणी महाराष्ट्राला सुपरिचित होती. या घराण्यांमधील पहिल्या-दुसऱ्या पिढीने सहकाराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधान भवानापर्यंत आपली छाप उमटवली. याच पिढीने राज्यात सहकारी साखर कारखानदारी रुजवली, दुग्धव्यवसाय वाढविला, फळबागा फुलविल्या आणि शिक्षणक्षेत्राची नवी दुकानंही उघडली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे, बाळासाहेब भारदे, वि.स. पागे, उद्धवराव पाटील, शरद पवार या धूरिणांनी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय संतुलन बिघडू दिलं नाही. अगदी निवडणुकीच्या काळातही प्रचाराची वैचारिक पातळी ढळू नये, यासाठी ते दक्ष असत. यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, डांगे, बॅ. नाथ पै, मधू दंडवते, बापू काळदाते आदींनी महाराष्ट्राचं राजकीय समाजजीवन वैचारिकदृष्ट्या समृद्ध केलं. तो वारसा आम्ही हरवून बसलो आहोत. हल्लीचा वारसा घराण्यांचा आहे. पण तो गायकीतील घराण्यांसारखा सुरेल नाही. गायकीतील घराण्यांची बैठक पक्की असते. सम, नियम, अरोह आणि अवरोहांशी बांधिलकी असते. आणि मुख्यत: ती गुरू-शिष्य परंपरेतून वृद्धिंगत झालेली असतात. मात्र राजकीय घराण्यांनी ‘गुरु’त्वाकर्षणानुसार आपली दिशा बदलती ठेवल्याने हल्लीचं राजकारण बरंच प्रवाहपतित झाल्याचं दिसतं.१९९५ पासून महाराष्ट्राच्या राजकारणाने कूस बदलली आणि राज्यात सत्तांतर घडून आले. हे परिवर्तन घडवून आणण्यात बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर अशा नव्या घराण्यांच्या प्रथमपुरुषांचा सिंहाचा वाटा होता. या राजकीय बदलातूनदेखील राज्यात नवी राजकीय घराणी उदयास आली. शिवसेनेतून पुढे आलेले एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, गणेश नाईकांची दुसरी पिढी राजकारणात आली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा, विलासराव देशमुख यांच्यानंतर अमित तर आर. आर. पाटील यांचा वारसा त्यांची कन्या चालवित आहे. तिकडे खडसे यांनीही स्नुषा रक्षा खडसे यांच्या माध्यमातून खासदारकी घरातच ठेवली आहे. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तर आपले अख्खे कुटुंबच गडचिरोली जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरविले आहे. समाजाच्या सर्वच क्षेत्रांत मागील पिढीचा वारसा पुढची पिढी चालवित असल्याने केवळ राजकीय घराणेशाहीबाबत एवढी चर्चा का, असा युक्तिवाद नेहमीच केला जातो. वरकरणी तो समर्थनीय वाटत असला तरी, राजकारण हे संधीचे क्षेत्र असल्याने अशा घराणेशाहीमुळे ज्यांच्या पाठीशी कोणीही नाही अशा होतकरू तरुणांची संधी नाकारली जाते. चार-चार पिढ्यांपर्यंत एकाच कुटुंबाच्या हाती सगळी सत्तासूत्रे गेल्याने दुर्बल घटकांतील कार्यकर्ते वंचित राहतात. मग सतरंज्या उचलण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे हीच बलुतेदारी करायची का? राजकीय घराण्यांच्या पलीकडचा विचार केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट खऱ्या अर्थाने विस्तारणार नाही. नेत्यांनी स्वत:च्या घरापेक्षा कार्यकर्त्यांचा विचार केला तर कवी जगदीश खेबुडकरांनी वरील गाण्यातून व्यक्त केलेली वारसदारी निश्चित अनुकरणीय ठरेल.- नंदकिशोर पाटील