शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

आम्ही चालवू हा पुढे वारसा..!

By admin | Updated: February 7, 2017 23:48 IST

महाराष्ट्राचं राजकारण सोळा घराण्यांभोवती फिरत असे. आता ते आणखीकाही घरं पुढे येऊन चौसष्टहून अधिक घरांच्या पुढं गेलं आहे.

महाराष्ट्राचं राजकारण सोळा घराण्यांभोवती फिरत असे. आता ते आणखीकाही घरं पुढे येऊन चौसष्टहून अधिक घरांच्या पुढं गेलं आहे. गावागणिक नवी घराणी तयार झाली आहेत. आजवर बारामतीचे पवार, अकलुजचे मोहिते-पाटील, साताऱ्याचे भोसले, सांगलीचे पाटील, नाशिकचे हिरे, फलटणचे निंबाळकर, बीडचे क्षीरसागर, सोळुंके, नगरचे विखे, थोरात अशी काही नामांकित राजकीय घराणी महाराष्ट्राला सुपरिचित होती. या घराण्यांमधील पहिल्या-दुसऱ्या पिढीने सहकाराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधान भवानापर्यंत आपली छाप उमटवली. याच पिढीने राज्यात सहकारी साखर कारखानदारी रुजवली, दुग्धव्यवसाय वाढविला, फळबागा फुलविल्या आणि शिक्षणक्षेत्राची नवी दुकानंही उघडली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे, बाळासाहेब भारदे, वि.स. पागे, उद्धवराव पाटील, शरद पवार या धूरिणांनी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय संतुलन बिघडू दिलं नाही. अगदी निवडणुकीच्या काळातही प्रचाराची वैचारिक पातळी ढळू नये, यासाठी ते दक्ष असत. यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, डांगे, बॅ. नाथ पै, मधू दंडवते, बापू काळदाते आदींनी महाराष्ट्राचं राजकीय समाजजीवन वैचारिकदृष्ट्या समृद्ध केलं. तो वारसा आम्ही हरवून बसलो आहोत. हल्लीचा वारसा घराण्यांचा आहे. पण तो गायकीतील घराण्यांसारखा सुरेल नाही. गायकीतील घराण्यांची बैठक पक्की असते. सम, नियम, अरोह आणि अवरोहांशी बांधिलकी असते. आणि मुख्यत: ती गुरू-शिष्य परंपरेतून वृद्धिंगत झालेली असतात. मात्र राजकीय घराण्यांनी ‘गुरु’त्वाकर्षणानुसार आपली दिशा बदलती ठेवल्याने हल्लीचं राजकारण बरंच प्रवाहपतित झाल्याचं दिसतं.१९९५ पासून महाराष्ट्राच्या राजकारणाने कूस बदलली आणि राज्यात सत्तांतर घडून आले. हे परिवर्तन घडवून आणण्यात बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर अशा नव्या घराण्यांच्या प्रथमपुरुषांचा सिंहाचा वाटा होता. या राजकीय बदलातूनदेखील राज्यात नवी राजकीय घराणी उदयास आली. शिवसेनेतून पुढे आलेले एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, गणेश नाईकांची दुसरी पिढी राजकारणात आली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा, विलासराव देशमुख यांच्यानंतर अमित तर आर. आर. पाटील यांचा वारसा त्यांची कन्या चालवित आहे. तिकडे खडसे यांनीही स्नुषा रक्षा खडसे यांच्या माध्यमातून खासदारकी घरातच ठेवली आहे. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तर आपले अख्खे कुटुंबच गडचिरोली जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरविले आहे. समाजाच्या सर्वच क्षेत्रांत मागील पिढीचा वारसा पुढची पिढी चालवित असल्याने केवळ राजकीय घराणेशाहीबाबत एवढी चर्चा का, असा युक्तिवाद नेहमीच केला जातो. वरकरणी तो समर्थनीय वाटत असला तरी, राजकारण हे संधीचे क्षेत्र असल्याने अशा घराणेशाहीमुळे ज्यांच्या पाठीशी कोणीही नाही अशा होतकरू तरुणांची संधी नाकारली जाते. चार-चार पिढ्यांपर्यंत एकाच कुटुंबाच्या हाती सगळी सत्तासूत्रे गेल्याने दुर्बल घटकांतील कार्यकर्ते वंचित राहतात. मग सतरंज्या उचलण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे हीच बलुतेदारी करायची का? राजकीय घराण्यांच्या पलीकडचा विचार केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट खऱ्या अर्थाने विस्तारणार नाही. नेत्यांनी स्वत:च्या घरापेक्षा कार्यकर्त्यांचा विचार केला तर कवी जगदीश खेबुडकरांनी वरील गाण्यातून व्यक्त केलेली वारसदारी निश्चित अनुकरणीय ठरेल.- नंदकिशोर पाटील