शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चालवू हा पुढे वारसा..!

By admin | Updated: February 7, 2017 23:48 IST

महाराष्ट्राचं राजकारण सोळा घराण्यांभोवती फिरत असे. आता ते आणखीकाही घरं पुढे येऊन चौसष्टहून अधिक घरांच्या पुढं गेलं आहे.

महाराष्ट्राचं राजकारण सोळा घराण्यांभोवती फिरत असे. आता ते आणखीकाही घरं पुढे येऊन चौसष्टहून अधिक घरांच्या पुढं गेलं आहे. गावागणिक नवी घराणी तयार झाली आहेत. आजवर बारामतीचे पवार, अकलुजचे मोहिते-पाटील, साताऱ्याचे भोसले, सांगलीचे पाटील, नाशिकचे हिरे, फलटणचे निंबाळकर, बीडचे क्षीरसागर, सोळुंके, नगरचे विखे, थोरात अशी काही नामांकित राजकीय घराणी महाराष्ट्राला सुपरिचित होती. या घराण्यांमधील पहिल्या-दुसऱ्या पिढीने सहकाराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधान भवानापर्यंत आपली छाप उमटवली. याच पिढीने राज्यात सहकारी साखर कारखानदारी रुजवली, दुग्धव्यवसाय वाढविला, फळबागा फुलविल्या आणि शिक्षणक्षेत्राची नवी दुकानंही उघडली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे, बाळासाहेब भारदे, वि.स. पागे, उद्धवराव पाटील, शरद पवार या धूरिणांनी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय संतुलन बिघडू दिलं नाही. अगदी निवडणुकीच्या काळातही प्रचाराची वैचारिक पातळी ढळू नये, यासाठी ते दक्ष असत. यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, डांगे, बॅ. नाथ पै, मधू दंडवते, बापू काळदाते आदींनी महाराष्ट्राचं राजकीय समाजजीवन वैचारिकदृष्ट्या समृद्ध केलं. तो वारसा आम्ही हरवून बसलो आहोत. हल्लीचा वारसा घराण्यांचा आहे. पण तो गायकीतील घराण्यांसारखा सुरेल नाही. गायकीतील घराण्यांची बैठक पक्की असते. सम, नियम, अरोह आणि अवरोहांशी बांधिलकी असते. आणि मुख्यत: ती गुरू-शिष्य परंपरेतून वृद्धिंगत झालेली असतात. मात्र राजकीय घराण्यांनी ‘गुरु’त्वाकर्षणानुसार आपली दिशा बदलती ठेवल्याने हल्लीचं राजकारण बरंच प्रवाहपतित झाल्याचं दिसतं.१९९५ पासून महाराष्ट्राच्या राजकारणाने कूस बदलली आणि राज्यात सत्तांतर घडून आले. हे परिवर्तन घडवून आणण्यात बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर अशा नव्या घराण्यांच्या प्रथमपुरुषांचा सिंहाचा वाटा होता. या राजकीय बदलातूनदेखील राज्यात नवी राजकीय घराणी उदयास आली. शिवसेनेतून पुढे आलेले एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, गणेश नाईकांची दुसरी पिढी राजकारणात आली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा, विलासराव देशमुख यांच्यानंतर अमित तर आर. आर. पाटील यांचा वारसा त्यांची कन्या चालवित आहे. तिकडे खडसे यांनीही स्नुषा रक्षा खडसे यांच्या माध्यमातून खासदारकी घरातच ठेवली आहे. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तर आपले अख्खे कुटुंबच गडचिरोली जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरविले आहे. समाजाच्या सर्वच क्षेत्रांत मागील पिढीचा वारसा पुढची पिढी चालवित असल्याने केवळ राजकीय घराणेशाहीबाबत एवढी चर्चा का, असा युक्तिवाद नेहमीच केला जातो. वरकरणी तो समर्थनीय वाटत असला तरी, राजकारण हे संधीचे क्षेत्र असल्याने अशा घराणेशाहीमुळे ज्यांच्या पाठीशी कोणीही नाही अशा होतकरू तरुणांची संधी नाकारली जाते. चार-चार पिढ्यांपर्यंत एकाच कुटुंबाच्या हाती सगळी सत्तासूत्रे गेल्याने दुर्बल घटकांतील कार्यकर्ते वंचित राहतात. मग सतरंज्या उचलण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे हीच बलुतेदारी करायची का? राजकीय घराण्यांच्या पलीकडचा विचार केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट खऱ्या अर्थाने विस्तारणार नाही. नेत्यांनी स्वत:च्या घरापेक्षा कार्यकर्त्यांचा विचार केला तर कवी जगदीश खेबुडकरांनी वरील गाण्यातून व्यक्त केलेली वारसदारी निश्चित अनुकरणीय ठरेल.- नंदकिशोर पाटील