शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

ठाण्यावर पाणीबाणीचे सावट

By admin | Updated: February 13, 2015 01:38 IST

जिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाला असला, तरी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सुमारे १४ टक्के कमी असल्याचे निदर्शनात आले आ

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाला असला, तरी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सुमारे १४ टक्के कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी धरणासहउल्हास नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे जिल्ह्णातील पाच महापालिका, दोन नगरपालिकांसह एमआयडीसीमध्ये आठवड्यातून एक दिवसाच्या पाणीकपातीचे धोरण लघुपाटबंधारे विभागाने लागू केले आहे. यामुळे सुमारे एक हजार ४८० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत होत आहे. वाढत्या लोकसंख्येस पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे पाऊस जास्त झाला असला तरी पाणीकपातीचे संकट मात्र राहणार, यात शंका नाही. यामुळे बारवीसह उल्हास नदीतून ठाणे मनपासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर या महापालिका तर अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांच्या एका दिवसाच्या सुमारे ७८० एमएलडी तर एमआयडीसीची सुमारे ७०० एमएलडी पाण्याची बचत करण्यात येणार आहे. १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र धरणात या वर्षी अल्प पाणीसाठा झाला आहे. तर बारवी धरणात १७०.२० पैकी गुरुवारपर्यंत १०३.४६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५७.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी आदींद्वारे सुमारे एक हजार ४८० एमएलडी पाणीपुरवठा दररोज केला जातो. या पाण्याच्या बचतीसाठी प्रत्येक महापालिकेने त्यांचा एक दिवसाचा पाणीपुरवठा बंद करून बचतीचे धोरण स्वीकारले आहे. एमआयडीसीसाठी वापरण्यात येणारा सुमारे ४९० एमएलडी म्हणजे ७० टक्के व उद्योगधंद्यावरील प्रक्रियेचा सुमारे २१० एमएलडी म्हणजे ३० टक्के पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवून त्याची बचत केली जात आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.