शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

ठाण्यावर पाणीबाणीचे सावट

By admin | Updated: February 13, 2015 01:38 IST

जिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाला असला, तरी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सुमारे १४ टक्के कमी असल्याचे निदर्शनात आले आ

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाला असला, तरी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सुमारे १४ टक्के कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी धरणासहउल्हास नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे जिल्ह्णातील पाच महापालिका, दोन नगरपालिकांसह एमआयडीसीमध्ये आठवड्यातून एक दिवसाच्या पाणीकपातीचे धोरण लघुपाटबंधारे विभागाने लागू केले आहे. यामुळे सुमारे एक हजार ४८० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत होत आहे. वाढत्या लोकसंख्येस पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे पाऊस जास्त झाला असला तरी पाणीकपातीचे संकट मात्र राहणार, यात शंका नाही. यामुळे बारवीसह उल्हास नदीतून ठाणे मनपासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर या महापालिका तर अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांच्या एका दिवसाच्या सुमारे ७८० एमएलडी तर एमआयडीसीची सुमारे ७०० एमएलडी पाण्याची बचत करण्यात येणार आहे. १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र धरणात या वर्षी अल्प पाणीसाठा झाला आहे. तर बारवी धरणात १७०.२० पैकी गुरुवारपर्यंत १०३.४६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५७.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी आदींद्वारे सुमारे एक हजार ४८० एमएलडी पाणीपुरवठा दररोज केला जातो. या पाण्याच्या बचतीसाठी प्रत्येक महापालिकेने त्यांचा एक दिवसाचा पाणीपुरवठा बंद करून बचतीचे धोरण स्वीकारले आहे. एमआयडीसीसाठी वापरण्यात येणारा सुमारे ४९० एमएलडी म्हणजे ७० टक्के व उद्योगधंद्यावरील प्रक्रियेचा सुमारे २१० एमएलडी म्हणजे ३० टक्के पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवून त्याची बचत केली जात आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.