शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यावर पाणीबाणीचे सावट

By admin | Updated: February 13, 2015 01:38 IST

जिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाला असला, तरी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सुमारे १४ टक्के कमी असल्याचे निदर्शनात आले आ

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाला असला, तरी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सुमारे १४ टक्के कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी धरणासहउल्हास नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे जिल्ह्णातील पाच महापालिका, दोन नगरपालिकांसह एमआयडीसीमध्ये आठवड्यातून एक दिवसाच्या पाणीकपातीचे धोरण लघुपाटबंधारे विभागाने लागू केले आहे. यामुळे सुमारे एक हजार ४८० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत होत आहे. वाढत्या लोकसंख्येस पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे पाऊस जास्त झाला असला तरी पाणीकपातीचे संकट मात्र राहणार, यात शंका नाही. यामुळे बारवीसह उल्हास नदीतून ठाणे मनपासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर या महापालिका तर अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांच्या एका दिवसाच्या सुमारे ७८० एमएलडी तर एमआयडीसीची सुमारे ७०० एमएलडी पाण्याची बचत करण्यात येणार आहे. १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र धरणात या वर्षी अल्प पाणीसाठा झाला आहे. तर बारवी धरणात १७०.२० पैकी गुरुवारपर्यंत १०३.४६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५७.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी आदींद्वारे सुमारे एक हजार ४८० एमएलडी पाणीपुरवठा दररोज केला जातो. या पाण्याच्या बचतीसाठी प्रत्येक महापालिकेने त्यांचा एक दिवसाचा पाणीपुरवठा बंद करून बचतीचे धोरण स्वीकारले आहे. एमआयडीसीसाठी वापरण्यात येणारा सुमारे ४९० एमएलडी म्हणजे ७० टक्के व उद्योगधंद्यावरील प्रक्रियेचा सुमारे २१० एमएलडी म्हणजे ३० टक्के पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवून त्याची बचत केली जात आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.